शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
4
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
5
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
6
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
7
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
8
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
9
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
10
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
11
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
12
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
13
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
14
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
15
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
16
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
17
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
18
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
19
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
20
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 

गोड बोला, सहिष्णू वागा !

By admin | Updated: January 14, 2016 04:03 IST

पुण्याच्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनातून जगाला कोणता संदेश द्यायचा असेल तर तो ‘गोड बोला, सहिष्णू वागा’ असा द्यायला हवा.

- विजय बाविस्करपुण्याच्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनातून जगाला कोणता संदेश द्यायचा असेल तर तो ‘गोड बोला, सहिष्णू वागा’ असा द्यायला हवा.तिळ-गूळ घ्या, गोड बोला...या पाच शब्दांत व संदेशात केवढे मोठे तत्त्वज्ञान व स्नेह साठवलेला आहे. देशात असहिष्णुतेवर मोठी चर्चा सुरू असताना, या पाच शब्दांच्या मंत्राला मोठे महत्त्व आले आहे. खरे तर ‘गोड बोला, सहिष्णू वागा’ असे म्हणण्याचा हा काळ आहे. देशातील साहित्यिकांनी असहिष्णुतेच्या कारणावरून ‘पुरस्कार वापसी’ सुरू केली असताना, पिंपरीत होणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले. सबनीस यांनी मोदी यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे भाजपाने संमेलनातून सबनीसांना ‘वापस’ करण्याचा इशारा दिला होता. सबनीसांनी दिलगिरी व्यक्त करीत, या वादावर पडदा टाकला व मराठीच्या उत्सवाचा रस्ता मोकळा केला याचे स्वागत केले पाहिजे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनीही हा वाद मिटविण्यासाठी नेमकेपणाने संतुलित परिपक्व भूमिका मांडून यशस्वी मध्यस्थी केली. ‘मोदींचा अनादर करणे हा माझा हेतू नव्हता. मोदी हे पाकिस्तानात आपले शिर तळहातावर घेऊन गेले होते. तेथे त्यांच्या जिवाला धोका संभवू शकला असता, या कळकळीतून आपण मोदींबाबत ते वक्तव्य केले’ असे सबनीस यांचे म्हणणे आहे. सबनीस यांना आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे व ते त्यांनी घेतले. त्यांनी पंतप्रधानांचा जो एकेरी उल्लेख केला तो मात्र अनेकांना खटकला. मतभेद स्वागतार्ह; पण एकमेकांच्या सन्मानाचा संकोच करायला नको, हे तत्त्व सबनीस यांनीही पाळायला हवे होते, असे अनेकांचे म्हणणे आहे. भाजपाच्या स्थानिक नेत्यांना सबनीस यांचे वक्तव्य खटकले; पण सबनीस यांच्याबाबत सनातन संस्थेचे कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांनी केलेले ‘टिष्ट्वट’ भाजपा, राज्यकर्ते व साहित्यिक या सर्वांनीच दुर्लक्षिले हे मात्र अनाकलनीय व आश्चर्यकारक आहे. ‘सबनीस मॉर्निंग वॉकला जात चला’ असा सल्ला पुनाळेकर यांनी ‘टिष्ट्वट’द्वारे दिला. हा सल्ला की धमकी, असा थेट प्रश्न पडावा, अशी दुर्दैवी उदाहरणे महाराष्ट्रात घडली आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे या विचारवंतांची हत्या मॉर्निंग वॉकदरम्यान घडली. या पार्श्वभूमीवर सबनीस यांना ‘मॉर्निंग वॉक’ला जाण्याचा सल्ला देऊन पुनाळेकर काय सुचवू इच्छितात? सबनीस यांनी पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख करणे जेवढे आक्षेपार्ह आहे, तेवढाच गंभीर हा गर्भित इशारा आहे; पण सबनीसांमागे मोठी संघटना नसल्याने याचा जाब पुनाळेकरांना कोण विचारणार? सबनीस यांच्या दिलगिरीनंतर त्यांच्या वक्तव्यावरुन सुरू झालेला गदारोळ थांबण्याची अपेक्षा असली, तरी पुनाळेकरांच्या टिष्ट्वटबाबत आतातरी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. संमेलन निर्विघ्नपणे पार पडेल, हे आता निश्चित झाले आहे. त्यामुळे संमेलनाच्या मांडवातून मकर संक्रांतीचा कोणता संदेश द्यायचा असेल, तर तो ‘गोड बोला, सहिष्णू वागा’ हाच असायला हवा. कृतीही सहिष्णू हवी. गोडव्याचा हा संदेश केवळ संक्रांतीच्या सणापुरता अपेक्षित नाही. आपल्या राज्यघटनेलाही हेच तत्त्व अभिप्रेत आहे. प्रत्येक व्यक्तीचा, धर्माचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करत आपण सामोपचाराने पुढे जाऊ, असे संविधान सांगते. प्रसंगी प्रखर, कठोर, परखड व रोखठोक बोलण्याची गरज असते. समाजहितासाठी ते आवश्यकही असते. पण, त्यात एक सभ्यता, विवेक व सुसंस्कृतता असावी. संक्रांतीचा सण देशात विविधतेने साजरा होतो. हा सण परस्परांतील माधुर्य वाढविण्याचा संदेश देतो. संक्रांतीच्या दिवशीच ‘भूगोल दिन’ही आहे. भूगोल हा विषय मानव व पर्यावरण यांच्यातील सहबंध सांगतो. ‘माणूस’ व ‘पर्यावरण’ यांना जोडतो. जोडणे हा जर निसर्गाचा स्वभावधर्म असेल, तर आपण दुराव्याची भाषा का करावी? संमेलनातून मने जोडणारा संवाद घडावा व तो पुढे जावा, ही माफक अपेक्षा आहे.