शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

गोड बोला, सहिष्णू वागा !

By admin | Updated: January 14, 2016 04:03 IST

पुण्याच्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनातून जगाला कोणता संदेश द्यायचा असेल तर तो ‘गोड बोला, सहिष्णू वागा’ असा द्यायला हवा.

- विजय बाविस्करपुण्याच्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनातून जगाला कोणता संदेश द्यायचा असेल तर तो ‘गोड बोला, सहिष्णू वागा’ असा द्यायला हवा.तिळ-गूळ घ्या, गोड बोला...या पाच शब्दांत व संदेशात केवढे मोठे तत्त्वज्ञान व स्नेह साठवलेला आहे. देशात असहिष्णुतेवर मोठी चर्चा सुरू असताना, या पाच शब्दांच्या मंत्राला मोठे महत्त्व आले आहे. खरे तर ‘गोड बोला, सहिष्णू वागा’ असे म्हणण्याचा हा काळ आहे. देशातील साहित्यिकांनी असहिष्णुतेच्या कारणावरून ‘पुरस्कार वापसी’ सुरू केली असताना, पिंपरीत होणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले. सबनीस यांनी मोदी यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे भाजपाने संमेलनातून सबनीसांना ‘वापस’ करण्याचा इशारा दिला होता. सबनीसांनी दिलगिरी व्यक्त करीत, या वादावर पडदा टाकला व मराठीच्या उत्सवाचा रस्ता मोकळा केला याचे स्वागत केले पाहिजे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनीही हा वाद मिटविण्यासाठी नेमकेपणाने संतुलित परिपक्व भूमिका मांडून यशस्वी मध्यस्थी केली. ‘मोदींचा अनादर करणे हा माझा हेतू नव्हता. मोदी हे पाकिस्तानात आपले शिर तळहातावर घेऊन गेले होते. तेथे त्यांच्या जिवाला धोका संभवू शकला असता, या कळकळीतून आपण मोदींबाबत ते वक्तव्य केले’ असे सबनीस यांचे म्हणणे आहे. सबनीस यांना आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे व ते त्यांनी घेतले. त्यांनी पंतप्रधानांचा जो एकेरी उल्लेख केला तो मात्र अनेकांना खटकला. मतभेद स्वागतार्ह; पण एकमेकांच्या सन्मानाचा संकोच करायला नको, हे तत्त्व सबनीस यांनीही पाळायला हवे होते, असे अनेकांचे म्हणणे आहे. भाजपाच्या स्थानिक नेत्यांना सबनीस यांचे वक्तव्य खटकले; पण सबनीस यांच्याबाबत सनातन संस्थेचे कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांनी केलेले ‘टिष्ट्वट’ भाजपा, राज्यकर्ते व साहित्यिक या सर्वांनीच दुर्लक्षिले हे मात्र अनाकलनीय व आश्चर्यकारक आहे. ‘सबनीस मॉर्निंग वॉकला जात चला’ असा सल्ला पुनाळेकर यांनी ‘टिष्ट्वट’द्वारे दिला. हा सल्ला की धमकी, असा थेट प्रश्न पडावा, अशी दुर्दैवी उदाहरणे महाराष्ट्रात घडली आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे या विचारवंतांची हत्या मॉर्निंग वॉकदरम्यान घडली. या पार्श्वभूमीवर सबनीस यांना ‘मॉर्निंग वॉक’ला जाण्याचा सल्ला देऊन पुनाळेकर काय सुचवू इच्छितात? सबनीस यांनी पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख करणे जेवढे आक्षेपार्ह आहे, तेवढाच गंभीर हा गर्भित इशारा आहे; पण सबनीसांमागे मोठी संघटना नसल्याने याचा जाब पुनाळेकरांना कोण विचारणार? सबनीस यांच्या दिलगिरीनंतर त्यांच्या वक्तव्यावरुन सुरू झालेला गदारोळ थांबण्याची अपेक्षा असली, तरी पुनाळेकरांच्या टिष्ट्वटबाबत आतातरी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. संमेलन निर्विघ्नपणे पार पडेल, हे आता निश्चित झाले आहे. त्यामुळे संमेलनाच्या मांडवातून मकर संक्रांतीचा कोणता संदेश द्यायचा असेल, तर तो ‘गोड बोला, सहिष्णू वागा’ हाच असायला हवा. कृतीही सहिष्णू हवी. गोडव्याचा हा संदेश केवळ संक्रांतीच्या सणापुरता अपेक्षित नाही. आपल्या राज्यघटनेलाही हेच तत्त्व अभिप्रेत आहे. प्रत्येक व्यक्तीचा, धर्माचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करत आपण सामोपचाराने पुढे जाऊ, असे संविधान सांगते. प्रसंगी प्रखर, कठोर, परखड व रोखठोक बोलण्याची गरज असते. समाजहितासाठी ते आवश्यकही असते. पण, त्यात एक सभ्यता, विवेक व सुसंस्कृतता असावी. संक्रांतीचा सण देशात विविधतेने साजरा होतो. हा सण परस्परांतील माधुर्य वाढविण्याचा संदेश देतो. संक्रांतीच्या दिवशीच ‘भूगोल दिन’ही आहे. भूगोल हा विषय मानव व पर्यावरण यांच्यातील सहबंध सांगतो. ‘माणूस’ व ‘पर्यावरण’ यांना जोडतो. जोडणे हा जर निसर्गाचा स्वभावधर्म असेल, तर आपण दुराव्याची भाषा का करावी? संमेलनातून मने जोडणारा संवाद घडावा व तो पुढे जावा, ही माफक अपेक्षा आहे.