शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

म्हणे, विकासासाठी...

By admin | Updated: April 24, 2017 00:18 IST

सर्वोच्च न्यायालयाने महामार्गांवर दारूविक्री बंद केली म्हणून काय झाले? काही झाले तरी आम्हाला दारूविक्री जोरात करायची आहे

सर्वोच्च न्यायालयाने महामार्गांवर दारूविक्री बंद केली म्हणून काय झाले? काही झाले तरी आम्हाला दारूविक्री जोरात करायची आहे आणि त्यातून महसुलापोटी सात हजार कोटींची माया जमा करायची आहे. यात स्वार्थ कसला? राज्य चालवायचे म्हटले तर पैसा लागणारच. तो आणायचा कोठून? राज्यात २०१६ या वर्षात दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या तब्बल १.०८ लाख चालकांवर कारवाई करण्यात आली. या वाहनचालकांकडून हजारो अपघात होतात. अनेक बळी जातात. म्हणून काय महामार्गावरील दारूविक्री बंद करायची? विकास हाच संकल्प घेऊन सत्तेत आलेल्या सरकारला राज्याचा विकास करायचा म्हटला तर पैसा लागणारच. भले तो कुठल्याही मार्गाने मिळविलेला असेल. त्याचमुळे जनहित डोळ्यासमोर ठेवून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निकालातून पळवाट काढण्यासाठी बार मालकांसोबतच राज्य सरकारचीही धडपड सुरू आहे. राष्ट्रीय-राज्य महामार्गाचे हस्तांतरण मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण किंवा अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांकडे केले जात आहे. मुंबईसह यवतमाळ, लातूरने हेच केले. आता पुणे, नांदेड, जालना आदी शहरेही याच मार्गांनी जात आहेत. कर्मचाऱ्यांचा पगार करण्याची ऐपत नसलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था या रस्त्यांची देखभाल करू शकणार नाहीत. रस्त्यांची वाट लागेल. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांमुळे होणारे अपघात वाढतीलच, सोबत खराब रस्त्यांमुळेही ते वाढतील. पण त्याहीपेक्षा राज्याचा विकास आवश्यक आणि तो करण्यासाठी महसूलही तेवढाच आवश्यक. विमानात बसण्यापूर्वी वैमानिकाची चाचणी होते. पोलिसांकडील अपुरे मुनष्यबळ आणि वाहनांची प्रचंड संख्या यामुळे प्रत्येक वाहनचालकाची अशी चाचणी ठरविली तरी होऊ शकत नाही. हे शक्य नाही म्हणून महामार्गावरील दारूविक्री थोडीच बंद करायची? मृत्यू आणि रोगनिर्मिती करणाऱ्या जगातील सर्वोच्च दहा कारणांमध्ये दारू एक कारण आहे. त्यामुळे दारूची उपलब्धता कमी केली आणि किमती वाढविल्या की दारूचा वापर कमी होतो. पण तसे करून सात हजार कोटींच्या महसुलावर थोडेच पाणी सोडायचे? सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे जनहित समोर ठेवून राज्य सरकार तसे करेलही. पण मग राज्याच्या विकासाचे काय? दुखावल्या जाणाऱ्या व्यापाऱ्यांचे काय? येणाऱ्या निवडणुकांचे काय? हाच विचार राज्य सरकारनेही केला असावा. त्यामुळे हळूहळू सर्व शहरे याच मार्गावर जाताना दिसतील. या सर्व रस्त्यांचे हस्तांतरण करण्यासाठी वेळ तर लागणारच. तोपर्यंत महसुलात होणारा तोटा भरून कसा काढणार? तेवढी तरी कळ कशाला सोसायची? त्यावरही उपाय शोधत राज्य सरकारने पेट्रोलवरील अधिभार थेट तीन रुपयांनी वाढविला. दारूमुळे संसार उद्ध्वस्त होतील. अपघात वाढतील. महागाईमुळे जगणे कठीण होईल. विकासाच्या केवळ गप्पा मारणाऱ्या या सरकारला निवडून दिले कोणी? सर्वसामान्य मतदारांनी केवळ घरात बसून चिंता केली तर हे असे होणारच.