शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

आजचा अग्रलेख: गायरानाचे कुरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2022 09:23 IST

कधीकाळी गोधनाला चरण्यासाठी म्हणून गावशिवारात राखीव ठेवलेल्या जमिनी म्हणजे गायरान. 

नागपूरचा सुपरिचित गारठा गायब असताना, महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मात्र थंड थंड वाटत असतानाच, दुसऱ्या आठवड्याची सुरुवात दोन धमाक्याने झाली. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील युती सरकारमधील दोन मंत्री अब्दुल सत्तार व संजय राठोड यांनी केलेल्या जमिनींच्या कथित घोटाळ्याचे मुद्दे महाविकास आघाडीच्या हाती लागले. साहजिकच विधिमंडळाचा सोमवार व मंगळवारचा दिवस दोन्ही मंत्र्यांवरील तुफानी टीकेने गाजला. दोघांचीही प्रकरणे वाशिम जिल्ह्यातील गायरान म्हणजे ई-क्लास जमिनींशी संबंधित आहेत. कधीकाळी गोधनाला चरण्यासाठी म्हणून गावशिवारात राखीव ठेवलेल्या जमिनी म्हणजे गायरान. 

अशा जमिनींवरील अतिक्रमणे नियमित करता येत नाहीत. त्या जमिनी खासगी व्यक्ती किंवा संस्थांना देता येत नाहीत. इतके सारे स्पष्ट असताना, सध्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आधीच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री असताना तब्बल ३५ एकर, तर त्याही आधीच्या भाजप-शिवसेना सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री असताना संजय राठोड यांनी पाच एकर जमीन खासगी व्यक्तींना दिल्याचे हे प्रकरण आहे. सत्तार यांच्याशी संबंधित प्रकरण उच्च न्यायालयात गेले असून, त्यांच्या आदेशाला स्थगिती देताना न्यायालयाने काही गंभीर ताशेरे ओढले आहेत. त्याची बातमी सर्वप्रथम 'लोकमत'मध्ये प्रकाशित झाली. 

संजय राठोड यांनी तर संबंधित मंगरूळपीर तालुक्याचे तहसीलदार व वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांचा अभिप्राय धुडकावून गायरान जमिनीवरील खासगी व्यक्तीचे अतिक्रमण नियमित केल्याचा भांडाफोड 'लोकमत'ने केला. संजय राठोड यांची आधीच्या सरकारमधून एका तरुणीच्या आत्महत्येमुळे गच्छंती झाली होती. महसूल खात्याचे मंत्री व राज्यमंत्र्यांना जमिनीशी संबंधित अर्धन्यायिक निवाडे देण्याचे अधिकार असतात. इतर मंत्र्यांनाही त्यांच्या खात्याशी संबंधित निवाड्याचे अधिकार असतात. परंतु, हे निवाडे देताना ते कायद्यानुसार आहेत की नाही, हे तपासून घेणे अपेक्षित असते. जेव्हा ते प्रचलित कायद्याशी सुसंगत नसतात, तेव्हा ती प्रकरणे घोटाळा बनतात. देवस्थान जमिनींशी संबंधित असेच एक मोठे प्रकरण गेल्या महिन्यात सुरेश धस या मराठवाड्यातील नेत्यावर शेकले गेल्याचे उदाहरण ताजे आहे. महत्त्वाचे म्हणजे असे निवाडे केवळ न्यायदान म्हणून किंवा नि:स्पृह बाण्याने घेतले जातात, असे समजणे भाबडेपणाचे आहे. 

बहुतेकवेळा त्यासाठी मोठे आर्थिक व्यवहार होतात. जमिनींशी संबंधित वर्तुळाला त्या व्यवहारांची चांगली कल्पना असते. अब्दुल सत्तार व संजय राठोड यांची ही प्रकरणे समोर येण्याआधी गेल्या आठवड्यात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या एका निर्णयाने वादंग माजले होते. नागपूर सुधार प्रन्यासने झोपडपट्टीवासीयांच्या घरांसाठी आरक्षित केलेले भूखंड अतिक्रमणाच्याच अनुषंगाने खासगी व्यक्तींना दिल्याचे ते प्रकरण सरकारसाठी डोकेदुखी होईल, असे वाटले होते. तथापि, उच्च न्यायालयाने आधीच त्या प्रकरणात नगरविकास मंत्री या नात्याने शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिली होती. त्या भूखंडांचा मामला न्यायप्रविष्ट असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली नाही, असा बचाव करीत नगरविकास खात्याने आधीचा निर्णय रद्द केला व तसे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दिल्याने वादाचा मुद्दा निष्प्रभ झाला. 

आताही सत्तार व राठोड यांच्या प्रकरणांमध्ये योग्य ती चौकशी व कारवाई करण्याचा शब्द सरकारकडून देण्यात आला असला, तरी अशा चौकशा संबंधित व्यक्ती मंत्रिपदावर कायम असताना निष्पक्षपणे होऊ शकतात का, हा प्रश्न आहे. त्यामुळेच आधी या मंत्र्यांचे राजीनामे घ्या व नंतर चौकशी पूर्ण करा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. मंत्री व अधिकाऱ्यांचा डोळा सरकारी जमिनींवरच का असतो किंवा शहरांमधील आरक्षणे बदलण्यात अतिक्रमणे नियमित करण्यात नगरविकास खात्याला अधिक रस का असतो, हे उघड आहे. 

कारण ही गायराने चराईऐवजी कमाईचे कुरण बनतात. मुळात ही भूसंपदा शासकीय म्हणजे अंतिमतः जनतेच्याच मालकीची असते. मंत्री व अधिकारी तिचे विश्वस्त असतात. त्याचे भान सोडून आपणच मालक समजून हवे तसे निर्णय घेतले जातात. स्वार्थाची जनावरे मोकाट सुटतात व गायरानात धुडगूस घालतात, तेव्हा कपाळाला हात लावण्याशिवाय जनता नावाच्या मायबापाच्या हाती काहीच शिल्लक राहात नाही. आपण निवडून दिलेली बाळे असे चाळे करायला लागली की, मतदारांनी त्यांना वेळीच वेसण घालणे आवश्यक ठरते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडLokmatलोकमतLokmat Impactलोकमत इम्पॅक्ट