शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपतींची वृथा धावपळ; संभाजीराजे यांना इतिहासातून बाहेर येता येईना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 07:25 IST

२६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारून प्रातिनिधिक संसदीय लोकशाही स्वीकारण्यात आली, तेव्हाच वारसा किंवा वारसदार ही पद्धत बंद झाली.

कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांना इतिहासातून बाहेर येता येईना. पूर्वजांच्या तेजोमय इतिहासामुळे आपल्या शिरावर कोणीतरी सोन्याचा मुकुट ठेवावा आणि आपण तो आपल्याच पराक्रमाने मिळविलेला आहे, असा भास होत राहिला, की काय होते, त्याचे हे उदाहरण!  हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वारसदारांची सातारा आणि कोल्हापूर ही मूळ वंशज घराणी! मराठेशाहीचा अस्त १८१८मध्ये पेशव्यांच्या पराभवाबरोबर झाला, असे मानले जाते. अखंड भारतात त्यानंतर ब्रिटिशांचा अंमल सुरू झाला. काँग्रेसच्या राष्ट्रीय आंदोलनातून १५ ऑगस्ट १९४७ रोजी अखंड भारताची फाळणी होऊन स्वातंत्र्य मिळाले. १२ सप्टेंबर १९४८ रोजी काही अपवाद वगळता सर्व संस्थाने खालसा झाली.

२६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारून प्रातिनिधिक संसदीय लोकशाही स्वीकारण्यात आली, तेव्हाच वारसा किंवा वारसदार ही पद्धत बंद झाली. तरीदेखील १९६९पर्यंत संस्थानिकांना तनखे दिले जात होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एका धडाकेबाज निर्णयाने हे तनखे बंद करून टाकले. संस्थानिकांचा अखेरचा दिवाही मालवला. अशा पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या राजघराण्याचे वारसदार संभाजीराजे छत्रपती यांना त्याच पूर्वपुण्याईवर काेणतीही राजकीय बंधने न घालता राज्यसभा या वरिष्ठ सभागृहाच्या सदस्यत्त्वासाठी सर्वच राजकीय पक्षांचा पाठिंबा हवा होता. ते घडले नाही. भारतीय जनता पक्ष यावर सहानुभूतीचे नक्राश्रू गाळत आहे. पण, सहा वर्षांपूर्वी भाजपने राजकीय हेतूनेच संभाजीराजे यांना राष्ट्रपती नियुक्त सदस्यांच्या कोट्यातून नियुक्त करण्याची शिफारस केली आणि राष्ट्रपतींनी त्यांची नियुक्ती केली. पाहता पाहता ती सहा वर्षे निघून गेली.

महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नासह संभाजीराजे गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचा विषय वारंवार मांडत राहिले. मराठा आरक्षणाची शिफारस किंवा कायदा टिकणारा नव्हता, याची कल्पना असूनही तो रेटण्याचा प्रयत्न करण्यात सहा वर्षे गेली.  मराठा समाजाच्या मूळ समस्यांवर घाव न घालता संभाजीराजे आरक्षणाच्या मागे  धावत राहिले. मराठा समाजबांधवांप्रमाणेच इतरही अनेक समाज घटक उपेक्षित आहेत. त्या साऱ्यांची आघाडी करण्याचे धैर्य आणि कौशल्य संभाजीराजे यांनी दाखविले नाही. म्हणून त्यांचे पिताश्री शाहू महाराज यांनीच शेवटी त्यांचे कान टोचले.  ही सारी पार्श्वभूमी मांडण्याचे कारण की, संभाजीराजे यांना कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करायचा नाही. पूर्वी भाजपने राष्ट्रपतीनियुक्त राज्यसभा सदस्यत्व बहाल केले, तशी जागा त्यांना पुन्हा हवी आहे. त्यांनी भाजपची मदत घेतली. पण, भाजपला कधी मदत केली नाही. भाजपला वाटले राजघराण्यातील व्यक्ती किंवा त्यांचे वारसदार आपल्याकडे असतील तर त्यांच्या प्रभावाखालील प्रदेशातील मते मिळत राहतील.

वास्तविक, या सर्व विद्यमान  वारसदारांचा कधी ना कधी पराभव झाला आहे. लोकसभेच्या २००९च्या लोकसभा निवडणुकीत संभाजीराजे यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळूनही कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला. उदयनराजे यांचा सातारा लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला. समरजित घाटगे यांचा कागल विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला. मतदार त्यांच्या प्रभावाखाली  आहेत, अशी परिस्थिती नाही. सर्वच राजकीय पक्ष राजघराण्यांना मान देतात. जनताही मान देते; पण जनतेची लोकप्रतिनिधी म्हणून अपेक्षा असते, ती पूर्ण करण्यासाठी लोकांमध्ये मिसळून काम करण्याची यांची (वारसदारांची) तयारी नसते.  शिवसेनेने मते द्यावीत; पण त्यांनी पक्षप्रवेशाचे बंधन घालू नये, ही संभाजीराजे यांची अट विचित्र होती.

उद्धव ठाकरे यांना शब्द देताना शिवबंधनाची अट घातली होती, त्यात काही गैर नाही.  हा छत्रपतींच्या घराण्याचा अपमान आहे, असे भाजपने म्हणणे ही अतिशयोक्तीच झाली. तो अपमान पुसून काढण्यासाठी भाजपच्या दोन जागा निवडून येऊ शकतात; त्यातून संभाजीराजांना उमेदवारी देता येऊ शकेल. या सर्व राजकारणात शिवसेनेने कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांना अचानकपणे पुढे करून उमेदवारी दिली. राजे मागे सरत असतील तर सामान्य शिवसैनिकाचा आम्ही सन्मान करतो, ही मोठी खेळी सेनेने खेळली. त्यात संजय पवार या माजी नगरसेवकास लॉटरी लागली. यातून आपला पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा, अठरापगड जातींचा  आहे, हे ठसविण्यात शिवसेना यशस्वी झाली. राजेंनी हातची संधी गमावली आणि शिवसेनेने मात्र सहानुभूती मिळविली.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीShiv Senaशिवसेना