शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
2
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
3
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
4
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
5
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
6
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
7
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
8
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
9
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
10
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
11
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
12
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
13
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
14
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
15
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
16
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
17
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
18
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
19
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
20
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...

छत्रपतींची वृथा धावपळ; संभाजीराजे यांना इतिहासातून बाहेर येता येईना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 07:25 IST

२६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारून प्रातिनिधिक संसदीय लोकशाही स्वीकारण्यात आली, तेव्हाच वारसा किंवा वारसदार ही पद्धत बंद झाली.

कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांना इतिहासातून बाहेर येता येईना. पूर्वजांच्या तेजोमय इतिहासामुळे आपल्या शिरावर कोणीतरी सोन्याचा मुकुट ठेवावा आणि आपण तो आपल्याच पराक्रमाने मिळविलेला आहे, असा भास होत राहिला, की काय होते, त्याचे हे उदाहरण!  हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वारसदारांची सातारा आणि कोल्हापूर ही मूळ वंशज घराणी! मराठेशाहीचा अस्त १८१८मध्ये पेशव्यांच्या पराभवाबरोबर झाला, असे मानले जाते. अखंड भारतात त्यानंतर ब्रिटिशांचा अंमल सुरू झाला. काँग्रेसच्या राष्ट्रीय आंदोलनातून १५ ऑगस्ट १९४७ रोजी अखंड भारताची फाळणी होऊन स्वातंत्र्य मिळाले. १२ सप्टेंबर १९४८ रोजी काही अपवाद वगळता सर्व संस्थाने खालसा झाली.

२६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारून प्रातिनिधिक संसदीय लोकशाही स्वीकारण्यात आली, तेव्हाच वारसा किंवा वारसदार ही पद्धत बंद झाली. तरीदेखील १९६९पर्यंत संस्थानिकांना तनखे दिले जात होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एका धडाकेबाज निर्णयाने हे तनखे बंद करून टाकले. संस्थानिकांचा अखेरचा दिवाही मालवला. अशा पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या राजघराण्याचे वारसदार संभाजीराजे छत्रपती यांना त्याच पूर्वपुण्याईवर काेणतीही राजकीय बंधने न घालता राज्यसभा या वरिष्ठ सभागृहाच्या सदस्यत्त्वासाठी सर्वच राजकीय पक्षांचा पाठिंबा हवा होता. ते घडले नाही. भारतीय जनता पक्ष यावर सहानुभूतीचे नक्राश्रू गाळत आहे. पण, सहा वर्षांपूर्वी भाजपने राजकीय हेतूनेच संभाजीराजे यांना राष्ट्रपती नियुक्त सदस्यांच्या कोट्यातून नियुक्त करण्याची शिफारस केली आणि राष्ट्रपतींनी त्यांची नियुक्ती केली. पाहता पाहता ती सहा वर्षे निघून गेली.

महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नासह संभाजीराजे गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचा विषय वारंवार मांडत राहिले. मराठा आरक्षणाची शिफारस किंवा कायदा टिकणारा नव्हता, याची कल्पना असूनही तो रेटण्याचा प्रयत्न करण्यात सहा वर्षे गेली.  मराठा समाजाच्या मूळ समस्यांवर घाव न घालता संभाजीराजे आरक्षणाच्या मागे  धावत राहिले. मराठा समाजबांधवांप्रमाणेच इतरही अनेक समाज घटक उपेक्षित आहेत. त्या साऱ्यांची आघाडी करण्याचे धैर्य आणि कौशल्य संभाजीराजे यांनी दाखविले नाही. म्हणून त्यांचे पिताश्री शाहू महाराज यांनीच शेवटी त्यांचे कान टोचले.  ही सारी पार्श्वभूमी मांडण्याचे कारण की, संभाजीराजे यांना कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करायचा नाही. पूर्वी भाजपने राष्ट्रपतीनियुक्त राज्यसभा सदस्यत्व बहाल केले, तशी जागा त्यांना पुन्हा हवी आहे. त्यांनी भाजपची मदत घेतली. पण, भाजपला कधी मदत केली नाही. भाजपला वाटले राजघराण्यातील व्यक्ती किंवा त्यांचे वारसदार आपल्याकडे असतील तर त्यांच्या प्रभावाखालील प्रदेशातील मते मिळत राहतील.

वास्तविक, या सर्व विद्यमान  वारसदारांचा कधी ना कधी पराभव झाला आहे. लोकसभेच्या २००९च्या लोकसभा निवडणुकीत संभाजीराजे यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळूनही कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला. उदयनराजे यांचा सातारा लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला. समरजित घाटगे यांचा कागल विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला. मतदार त्यांच्या प्रभावाखाली  आहेत, अशी परिस्थिती नाही. सर्वच राजकीय पक्ष राजघराण्यांना मान देतात. जनताही मान देते; पण जनतेची लोकप्रतिनिधी म्हणून अपेक्षा असते, ती पूर्ण करण्यासाठी लोकांमध्ये मिसळून काम करण्याची यांची (वारसदारांची) तयारी नसते.  शिवसेनेने मते द्यावीत; पण त्यांनी पक्षप्रवेशाचे बंधन घालू नये, ही संभाजीराजे यांची अट विचित्र होती.

उद्धव ठाकरे यांना शब्द देताना शिवबंधनाची अट घातली होती, त्यात काही गैर नाही.  हा छत्रपतींच्या घराण्याचा अपमान आहे, असे भाजपने म्हणणे ही अतिशयोक्तीच झाली. तो अपमान पुसून काढण्यासाठी भाजपच्या दोन जागा निवडून येऊ शकतात; त्यातून संभाजीराजांना उमेदवारी देता येऊ शकेल. या सर्व राजकारणात शिवसेनेने कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांना अचानकपणे पुढे करून उमेदवारी दिली. राजे मागे सरत असतील तर सामान्य शिवसैनिकाचा आम्ही सन्मान करतो, ही मोठी खेळी सेनेने खेळली. त्यात संजय पवार या माजी नगरसेवकास लॉटरी लागली. यातून आपला पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा, अठरापगड जातींचा  आहे, हे ठसविण्यात शिवसेना यशस्वी झाली. राजेंनी हातची संधी गमावली आणि शिवसेनेने मात्र सहानुभूती मिळविली.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीShiv Senaशिवसेना