अध्यात्म
श्री मुनी तरुणसागरजीजसे गाडीला ब्रेक आवश्यक आहेत, तसे जीवनातही ब्रेक आवश्यक आहेत. गुरू जीवनाच्या गाडीचे ब्रेक आहेत. बिना ब्रेकची गाडी बेकार निरुपयोगी आहे आणि गुरूविना जीवन बेकार व्यर्थ आहे. जीवनात एक गुरू, आवश्यक आहे, मग भलेही ते मातीचे द्रोणाचार्य असोत.गुरू एक प्रकारे फॅमिली डॉक्टर आहेत. जे मनाचा उपचार करतात. शरीर तर कधीमधी आजारी होते; परंतु मन सदैव आजारी राहते. याचे औषध गोळी नव्हे सद्गुरूची बोली होय.***अमृत बाजारात मिळत नाहीत. अमृत संतांच्या वाणीत असते, देह मृत आहे. संतांची वाणी अमृत होय. आपणास माहिती असेल, जेव्हा समुद्रमंथन झाले, तेव्हा त्यातून विष आणि अमृत दोन्ही निघाले. अमृत तर देवांनी पिऊन टाकले; पण विष प्यायला कोणी तयार झाले नाही.अंतत: हलाहल शिवशंकराला प्यावे लागले. कथेचा संकेत आहे ज्यांनी अमृत प्याले ते देव झाले आणि ज्यांनी हसत हसत विष पिऊन टाकले ते महादेव झाले.***मुखाग्नी कशाला म्हणतात? जो प्रेताच्या चितेला दिला जातो तो नव्हे, तर जेव्हा कोणी बिडी, सिगारेट पितो आणि त्याच्या मुखात जो अग्नी असतो, तो मुखाग्नी होय. अर्थ स्पष्ट आहे. बिडी, सिगारेट ओढणारे स्वत:ला जिवंतपणीचा मुखाग्नी देत आहेत.देशाच्या युवकांच्या खांद्यावर स्वर्णिम भारत निर्मितीची जबाबदारी आहे. तेव्हा त्यांनी लक्षात घ्यावे की, भारताचे निर्माण झुरक्यांचे लोट सोडून नव्हे, तर कठोर परिश्रमाने होऊ शकते.