शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, नाणार की जाणार?

By अतुल कुलकर्णी | Updated: July 4, 2018 05:42 IST

आपलं तर डोकंच काम करेनासं झालंय. आपण म्हणालात नाणार होणार नाही, तर ते लगेच म्हणाले होणार म्हणजे होणार... आता आपलं खरं मानायचं की त्यांचं...? दरवेळी साहेब, आपल्याला ते तोंडावर का पाडतात.

(एका कार्यकर्त्याने बांद्रेच्या साहेबांना लिहिलेलं पत्र दादासाहेबांना मिळालं ते असं)

प्रिय साहेब,आपलं तर डोकंच काम करेनासं झालंय. आपण म्हणालात नाणार होणार नाही, तर ते लगेच म्हणाले होणार म्हणजे होणार... आता आपलं खरं मानायचं की त्यांचं...? दरवेळी साहेब, आपल्याला ते तोंडावर का पाडतात. खरेतर आपण मोठे भाऊ होतो. पण त्यांनी आपल्याला एकदम लहान भाऊ करून टाकलं. आता लहान भावाचं ऐकणं तर दूरच; ते नीट बोलतसुद्धा नाहीत आपल्याशी. तरी साहेब आम्ही आधीपासून सांगत होतो की, एकाच घरात राहायचं तर नीट वाटण्या करून घ्या. नाहीतर रोज भांड्याला भांडं लागणार. आता भांडी आपटून आपटून भंगारात न्यायची वेळ झालीयं साहेब...आपला अपमान करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. एवढी आपण प्लास्टिक बंदी केली तर त्यांना त्याचं काही नाही. त्यांनी एकदा तरी जाहीर भूमिका घेतली का? एका शब्दानं तरी त्यांनी आपल्या पर्यावरण प्रेमी प्रमुखाचं कौतुक केलं का? उलट खबऱ्यांना सांगून आपल्या पर्यावरण पे्रमी प्रमुखाचा पुत्र प्लास्टिकच्या बाटल्यांचा कारखाना चालवतो असल्या बातम्या पसरवल्या. त्याहून कहर म्हणजे या विषयावर चर्चा करायची म्हणून परवा मंत्रालयात आपल्या युवराजांना बोलावून घेतलं भेटायला. पण साहेब प्रत्यक्षात भेटवलं कुणाला? तर त्यांच्या प्रधान सचिवांना... ही काय पध्दत झाली का साहेब? किती घोर अपमान आपल्या युवराजांचा. त्याच्या दोन दिवस आधी दिल्लीहून प्रधानसेवक आले, त्यांनी आपल्या राज्यात उद्योगधंदे करणाºया सगळ्यांना बोलावलं पण उद्योगप्रमुखपद आपल्याकडं असताना आपल्याला हिंग लावूनही विचारलं नाही. ही काय पध्दत झाली का साहेब...?ते तर जाऊ द्या साहेब, सगळी मुंबई यांनी खोदून ठेवलीय आणि रस्त्यावर पाणी साचलं तर आपल्या नावानं बिलं फाडत फिरतात त्यांचे चेलेचपाटे... म्हणतात कसे, त्यांचं जलयुक्त शिवार आणि आपलं जलयुक्त आवार... ही काय पध्दत झाली का साहेब? हे झालं राज्यातलं. परवा तिकडे दिल्लीत आपल्या सेनापतींना न बोलावताच कोकणात नाणार आणायचा म्हणून वाटाघाटीही करून टाकल्या त्यांनी. त्यावर आपण नाणार नाही म्हणजे नाही! अशी वाघगर्जना केली की घाबरल्याचं नाटक करून आपल्या भेटीची वेळ मागत आले. पण बरं झालं साहेब, आपण भेटणार नाही, जा तिकडंऽऽऽ असं खडसावून सांगितलं... पण एवढ्यावर गप्प बसतील तर ते कसले. लगेच दुसºया दिवशी म्हणतात, चर्चा करून प्रश्न सोडवू, पण नाणार कोकण भूमीतच करू... सध्या ते मोठे भाऊ म्हणून वावरतात, त्यामुळे प्रजेला पण त्यांचं खरं वाटतं. शिवाय आपल्याशी चर्चा केली की प्रश्न सुटतो असं म्हणताना त्यांनी चर्चा या शब्दावर नको तेवढा जास्तीचा जोर दिल्यामुळे आम्हाला आपली नाही पण आमचीच काळजी वाटू लागली साहेब. त्यामुळेच आपल्याला कुणी गंभीरपणे घेत नाही साहेब.जाता जाता साहेब, एक विचारू, सगळे म्हणतात की आपल्या मंत्र्यांचे राजीनामे भिजू नयेत म्हणून प्लास्टिकच्या पिशवीत ठेवले म्हणे. खरं आहे का साहेब ते...?(तिरकस)

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे