शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

साहेब, नाणार की जाणार?

By अतुल कुलकर्णी | Updated: July 4, 2018 05:42 IST

आपलं तर डोकंच काम करेनासं झालंय. आपण म्हणालात नाणार होणार नाही, तर ते लगेच म्हणाले होणार म्हणजे होणार... आता आपलं खरं मानायचं की त्यांचं...? दरवेळी साहेब, आपल्याला ते तोंडावर का पाडतात.

(एका कार्यकर्त्याने बांद्रेच्या साहेबांना लिहिलेलं पत्र दादासाहेबांना मिळालं ते असं)

प्रिय साहेब,आपलं तर डोकंच काम करेनासं झालंय. आपण म्हणालात नाणार होणार नाही, तर ते लगेच म्हणाले होणार म्हणजे होणार... आता आपलं खरं मानायचं की त्यांचं...? दरवेळी साहेब, आपल्याला ते तोंडावर का पाडतात. खरेतर आपण मोठे भाऊ होतो. पण त्यांनी आपल्याला एकदम लहान भाऊ करून टाकलं. आता लहान भावाचं ऐकणं तर दूरच; ते नीट बोलतसुद्धा नाहीत आपल्याशी. तरी साहेब आम्ही आधीपासून सांगत होतो की, एकाच घरात राहायचं तर नीट वाटण्या करून घ्या. नाहीतर रोज भांड्याला भांडं लागणार. आता भांडी आपटून आपटून भंगारात न्यायची वेळ झालीयं साहेब...आपला अपमान करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. एवढी आपण प्लास्टिक बंदी केली तर त्यांना त्याचं काही नाही. त्यांनी एकदा तरी जाहीर भूमिका घेतली का? एका शब्दानं तरी त्यांनी आपल्या पर्यावरण प्रेमी प्रमुखाचं कौतुक केलं का? उलट खबऱ्यांना सांगून आपल्या पर्यावरण पे्रमी प्रमुखाचा पुत्र प्लास्टिकच्या बाटल्यांचा कारखाना चालवतो असल्या बातम्या पसरवल्या. त्याहून कहर म्हणजे या विषयावर चर्चा करायची म्हणून परवा मंत्रालयात आपल्या युवराजांना बोलावून घेतलं भेटायला. पण साहेब प्रत्यक्षात भेटवलं कुणाला? तर त्यांच्या प्रधान सचिवांना... ही काय पध्दत झाली का साहेब? किती घोर अपमान आपल्या युवराजांचा. त्याच्या दोन दिवस आधी दिल्लीहून प्रधानसेवक आले, त्यांनी आपल्या राज्यात उद्योगधंदे करणाºया सगळ्यांना बोलावलं पण उद्योगप्रमुखपद आपल्याकडं असताना आपल्याला हिंग लावूनही विचारलं नाही. ही काय पध्दत झाली का साहेब...?ते तर जाऊ द्या साहेब, सगळी मुंबई यांनी खोदून ठेवलीय आणि रस्त्यावर पाणी साचलं तर आपल्या नावानं बिलं फाडत फिरतात त्यांचे चेलेचपाटे... म्हणतात कसे, त्यांचं जलयुक्त शिवार आणि आपलं जलयुक्त आवार... ही काय पध्दत झाली का साहेब? हे झालं राज्यातलं. परवा तिकडे दिल्लीत आपल्या सेनापतींना न बोलावताच कोकणात नाणार आणायचा म्हणून वाटाघाटीही करून टाकल्या त्यांनी. त्यावर आपण नाणार नाही म्हणजे नाही! अशी वाघगर्जना केली की घाबरल्याचं नाटक करून आपल्या भेटीची वेळ मागत आले. पण बरं झालं साहेब, आपण भेटणार नाही, जा तिकडंऽऽऽ असं खडसावून सांगितलं... पण एवढ्यावर गप्प बसतील तर ते कसले. लगेच दुसºया दिवशी म्हणतात, चर्चा करून प्रश्न सोडवू, पण नाणार कोकण भूमीतच करू... सध्या ते मोठे भाऊ म्हणून वावरतात, त्यामुळे प्रजेला पण त्यांचं खरं वाटतं. शिवाय आपल्याशी चर्चा केली की प्रश्न सुटतो असं म्हणताना त्यांनी चर्चा या शब्दावर नको तेवढा जास्तीचा जोर दिल्यामुळे आम्हाला आपली नाही पण आमचीच काळजी वाटू लागली साहेब. त्यामुळेच आपल्याला कुणी गंभीरपणे घेत नाही साहेब.जाता जाता साहेब, एक विचारू, सगळे म्हणतात की आपल्या मंत्र्यांचे राजीनामे भिजू नयेत म्हणून प्लास्टिकच्या पिशवीत ठेवले म्हणे. खरं आहे का साहेब ते...?(तिरकस)

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे