शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

व्यथा राजेश्वरीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:39 IST

कुणाचे नशीब केव्हा पालटेल हे सांगता येत नाही. आता आपल्या महिला किकेट संघाचेच बघा, महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सुरु होण्यापूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघाविषयी देशात फारशी चर्चा नव्हती किंवा या स्पर्धेविषयी कुणाला फारसे औत्सुक्य नव्हते.

कुणाचे नशीब केव्हा पालटेल हे सांगता येत नाही. आता आपल्या महिला किकेट संघाचेच बघा, महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सुरु होण्यापूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघाविषयी देशात फारशी चर्चा नव्हती किंवा या स्पर्धेविषयी कुणाला फारसे औत्सुक्य नव्हते. एव्हढेच काय मिताली राज, झुलन गोस्वामी, हरमनप्रित कौर यासारखी काही नावे सोडली तर संघातील इतर महिला खेळाडूंची नावेही कुणाला ठावूक असण्याचे कारण नव्हते. पण विश्वचषक स्पर्धा सुरु झाली आणि आपल्या महिलांनी मैदान गाजविण्यास सुरुवात केली तेव्हा कुठे आम्ही त्यांचे गुणगान सुरु केले. या महिलांनी एक एक किल्ला सर करीत जेव्हा उपांत्य फेरीत दिग्गज आॅस्ट्रेलिया संघाला धूळ चारून अंतिम फेरीत प्रवेश केला तेव्हा तर समस्त भारत वर्षाने या संघाला अक्षरश: डोक्यावर घेतले. विश्वकप हातात यायच्या आधीच महिला खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव होऊ लागला. अंतिम सामन्यात दुर्दैवाने हातातोंडाशी आलेला घास दूर गेला. पण पराभूत होऊन मायदेशी परतलेल्या या संघाचे विजयी योद्ध्याप्रमाणे स्वागत झाले. एरव्ही पराभूत झालेल्या संघाला तोंड लपवित परतावे लागते. खेळाडूंच्या घरांवर दगडफेक केली जाते. पोलीस संरक्षणात त्यांना घरी सोडावे लागते. यावेळचा नजाराच काही वेगळा होता. आजही या महिला खेळाडूंना विविध राज्य सरकारे, संघटना यांच्याकडून बक्षिसे दिली जात आहेत. स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारी २६ वर्षीय गोलंदाज राजेश्वरी गायकवाड हिला कर्नाटक सरकारने परवाच पाच लाखांची कार बक्षीस म्हणून जाहीर केली. पण काय आश्चर्य राजेश्वरीने अतिशय विनयाने हे गिफ्ट घेण्यास नकार दिला. का दिला तिने हा नकार? तिच्याकडे आधीच भरपूर कार आहेत म्हणून की, केवळ पाच लाखांची क्षुल्लक वस्तू आहे म्हणून. कारण वेगळेच आहे. राजेश्वरी ही सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी. भाड्याच्या घरात राहणारी. ती म्हणते, ‘मी कार घेऊन काय करणार, मला डोक्यावर छत हवे आहे’. अटकेपार झेंडा रोवून आलेल्या या मुलीची ही हतबलता खरंच मन विदीर्ण करणारी आहे. केवळ राजेश्वरीच नव्हे तर बहुतांश महिला खेळाडूंची थोड्याफार फरकाने हीच अवस्था आहे. याउलट भारतीय पुरुष क्रिकेट संघातील खेळाडूंची स्थिती बघा! सर्वच कोट्यवधींच्या घरात खेळणारे. खेळोत बिचारे, त्यांचे नशीब. पण येथे बीसीसीआयचा रोल महत्त्वाचा आहे. आपल्या क्रिकेट नियंत्रण मंडळाने नेहमी पुरुषांनच झुकते माप दिले. त्या तुलनेत महिला संघ दुर्लक्षितच राहिला. एकाच छताखाली खेळणाºया या दोन संघांना भिन्न वागणूक देणे, ‘एकाला छप्पर फाडके तर दुसºयाला छतच नाही’ अन्यायकारक आहे. महिला संघांच्या आताच्या देदीप्यमान कामगिरीमुळे आतातरी मंडळाचे डोळे उघडतील आणि महिला संघाला अगदीच समान नसली तरी सन्मान्य वागणूक मिळेल अशी आशा करू या.