शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

व्यथा राजेश्वरीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:39 IST

कुणाचे नशीब केव्हा पालटेल हे सांगता येत नाही. आता आपल्या महिला किकेट संघाचेच बघा, महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सुरु होण्यापूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघाविषयी देशात फारशी चर्चा नव्हती किंवा या स्पर्धेविषयी कुणाला फारसे औत्सुक्य नव्हते.

कुणाचे नशीब केव्हा पालटेल हे सांगता येत नाही. आता आपल्या महिला किकेट संघाचेच बघा, महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सुरु होण्यापूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघाविषयी देशात फारशी चर्चा नव्हती किंवा या स्पर्धेविषयी कुणाला फारसे औत्सुक्य नव्हते. एव्हढेच काय मिताली राज, झुलन गोस्वामी, हरमनप्रित कौर यासारखी काही नावे सोडली तर संघातील इतर महिला खेळाडूंची नावेही कुणाला ठावूक असण्याचे कारण नव्हते. पण विश्वचषक स्पर्धा सुरु झाली आणि आपल्या महिलांनी मैदान गाजविण्यास सुरुवात केली तेव्हा कुठे आम्ही त्यांचे गुणगान सुरु केले. या महिलांनी एक एक किल्ला सर करीत जेव्हा उपांत्य फेरीत दिग्गज आॅस्ट्रेलिया संघाला धूळ चारून अंतिम फेरीत प्रवेश केला तेव्हा तर समस्त भारत वर्षाने या संघाला अक्षरश: डोक्यावर घेतले. विश्वकप हातात यायच्या आधीच महिला खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव होऊ लागला. अंतिम सामन्यात दुर्दैवाने हातातोंडाशी आलेला घास दूर गेला. पण पराभूत होऊन मायदेशी परतलेल्या या संघाचे विजयी योद्ध्याप्रमाणे स्वागत झाले. एरव्ही पराभूत झालेल्या संघाला तोंड लपवित परतावे लागते. खेळाडूंच्या घरांवर दगडफेक केली जाते. पोलीस संरक्षणात त्यांना घरी सोडावे लागते. यावेळचा नजाराच काही वेगळा होता. आजही या महिला खेळाडूंना विविध राज्य सरकारे, संघटना यांच्याकडून बक्षिसे दिली जात आहेत. स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारी २६ वर्षीय गोलंदाज राजेश्वरी गायकवाड हिला कर्नाटक सरकारने परवाच पाच लाखांची कार बक्षीस म्हणून जाहीर केली. पण काय आश्चर्य राजेश्वरीने अतिशय विनयाने हे गिफ्ट घेण्यास नकार दिला. का दिला तिने हा नकार? तिच्याकडे आधीच भरपूर कार आहेत म्हणून की, केवळ पाच लाखांची क्षुल्लक वस्तू आहे म्हणून. कारण वेगळेच आहे. राजेश्वरी ही सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी. भाड्याच्या घरात राहणारी. ती म्हणते, ‘मी कार घेऊन काय करणार, मला डोक्यावर छत हवे आहे’. अटकेपार झेंडा रोवून आलेल्या या मुलीची ही हतबलता खरंच मन विदीर्ण करणारी आहे. केवळ राजेश्वरीच नव्हे तर बहुतांश महिला खेळाडूंची थोड्याफार फरकाने हीच अवस्था आहे. याउलट भारतीय पुरुष क्रिकेट संघातील खेळाडूंची स्थिती बघा! सर्वच कोट्यवधींच्या घरात खेळणारे. खेळोत बिचारे, त्यांचे नशीब. पण येथे बीसीसीआयचा रोल महत्त्वाचा आहे. आपल्या क्रिकेट नियंत्रण मंडळाने नेहमी पुरुषांनच झुकते माप दिले. त्या तुलनेत महिला संघ दुर्लक्षितच राहिला. एकाच छताखाली खेळणाºया या दोन संघांना भिन्न वागणूक देणे, ‘एकाला छप्पर फाडके तर दुसºयाला छतच नाही’ अन्यायकारक आहे. महिला संघांच्या आताच्या देदीप्यमान कामगिरीमुळे आतातरी मंडळाचे डोळे उघडतील आणि महिला संघाला अगदीच समान नसली तरी सन्मान्य वागणूक मिळेल अशी आशा करू या.