शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
3
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
6
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
7
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
8
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
9
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
10
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
11
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
12
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
13
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
14
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
15
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
16
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
17
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
18
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
19
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
20
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  

सदाभाऊ, दगडांचा मार आता लागला का ?

By वसंत भोसले | Updated: February 27, 2018 00:29 IST

सोलापूर जिल्ह्यात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या वाहनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्यामुळे सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी यांच्यातील वाद पुन्हा तीव्र झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या वाहनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्यामुळे सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी यांच्यातील वाद पुन्हा तीव्र झाला आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. या संघर्षात शेतकºयांचेच नुकसान होणार आहे.शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी भाजपबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा ‘गिधाडे राजहंस कधी झाली’ असा सवाल करत ‘स्वाभिमान’ सिद्ध करण्याची शपथ राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत या तरुण कार्यकर्त्यांनी घेतली होती. त्याची पार्श्वभूमी अशी होती की, ‘सर्व राजकीय पक्षांचे नेते शेतकरीविरोधी आहेत आणि भाजप-शिवसेनेचे नेते जातीयवादाचा आधार घेणारी गिधाडे आहेत,’ अशी जहरी टीका त्यांनी केली होती. राजकारण्यांमुळे शेतकरी चळवळीचे अतोनात नुकसान होते, यावर त्यांची ठाम मते होती. याच संघर्षातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना एकविसाव्या शतकाच्या पहाटे झाली.सुमारे वीस वर्षे सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांनी खांद्याला खांदा लावून शेतकºयांच्या हितासाठी म्हणून चळवळ केली. भाजपसारख्या राजकीय पक्षाशी आघाडी करायलाही त्यांचा ठाम विरोध होता. त्याचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर वारेमाप आरोप करण्यात येत होते. दरवर्षी गळीत हंगामाच्या प्रारंभी जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) येथे होणाºया ऊस परिषदेत ‘मुलुखमैदान तोफ’ म्हणून सदाभाऊ खोत मिरवत होते. या विशेषणाने त्यांना भरते यायचे आणि शरद पवार, आर. आर. पाटील, अजित पवार, विलासराव देशमुख आदींच्यावर ते जोरदार टीका करायचे.उसाला किफायतशीर भाव मिळावा म्हणून झालेल्या अनेक आंदोलनांत दगडांचा वापर झालाच नाही, असे छातीवर हात ठेवून सदाभाऊ यांनी राजू शेट्टी यांना सांगून टाकावे, म्हणजे एकदा लोकांना ‘कालचे राजहंस आज गिधाडा’सारखे एकमेकांचे लचके कसे तोडत आहेत, हे तरी समजेल. राजू शेट्टी म्हणतात, हा शेतकºयांचा संताप आहे. सदाभाऊ त्यांच्या गाडीत असते तर त्यांच्या पुढची भाषा बोलून मोकळे झाले असते. आपण ‘मुलखावेगळे तोफखाने’ आहोत, हे सिद्ध केले असते.राजू शेट्टी यांना लवकर समजले की, भाजपची धोरणे काही शेतकºयांच्या हिताची नाहीत. सदाभाऊ खोतांना मंत्रिपदावर असेपर्यंत असे वाटणे शक्य नाही; पूर्वी दगडफेक करणारी शेतकरी चळवळ होती आणि आता दगडफेक झाल्यावर अंगाला मार लागतो का? चार क्रांतिकारी निर्णय सदाभाऊ खोत यांनी राज्याचे कृषिमंत्री म्हणून घेतल्याचे सांगावे. मंत्री होताच दररोज आठवडी बाजारपेठांचे उद्घाटन करत होता, त्यापैकी एकतरी सुरू असल्याचे दाखवावे. कोल्हापूर बाजारसमितीलाच गूळ खरेदी करण्याचा प्रस्ताव आपण दिला होता. किती रवे खरेदी झाले ते जाहीर करावे? चाळीस हजार एकराला पाणी देणारी तुमच्या जिल्ह्यातील (सांगली) म्हैशाळ पाणी उपसा योजना या वर्षी सुरू करता आली नाही, हे अपयश कुणाचे आहे?काही तरी कामे करा, शेतकरी चळवळ करण्यासाठी आंदोलने करताना दगड उचलू नये; असे धोरण आधीपासून (तीस वर्षे शेतकरी चळवळीत आपण घालविली) स्वीकारले असते, तर त्याचा मार आता लागला नसता. तुरीविषयी सरकारचे काही चुकलेच नाही, तरीसुद्धा लातूर बाजारसमितीत तूर टाकून शेतकरी रडत- रडत घरी परतला, हे आपण सत्तेवर आल्यानंतर घडलेच नाही, असे कुणी मानावे; तो मान्य करा असा तुमचा हट्ट असेल तर तो कोण पुरा करणार? हट्ट पुरविण्यास आता तुम्ही दोघे (सदाभाऊ व राजू शेट्टी) लहान राहिला नाहीत. तुमच्या भांडणातून महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीचे कसे भले होणार, हे तरी एकदा सांगून टाका, म्हणजे शेतकरी चाबकाचा नाद सोडतील.- वसंत भोसले (  bhosale.vasant@lokmat.com)

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Raju Shettyराजू शेट्टी