शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
2
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
3
IND VS SA 3rd ODI : कुलदीप यादवसह प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! दक्षिण आफ्रिकेचा संघ २७० धावांत आटोपला
4
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
महामानवाला अभिवादन! CM फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थना; PM मोदींनीही वाहिली आदरांजली
6
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
7
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
8
Video - "मी नवरदेव आहे, पण स्वतःच्या लग्नालाच..."; इंडिगोमुळे अडकले प्रवासी, मांडली व्यथा
9
"आमच्या बॅगा कुठायत? घराची चावी त्यात आहे, भिकारी वाटलो का..."; मुंबई एअरपोर्टवर तुफान राडा
10
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
11
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
12
'रुपयाबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही..,' घसरत्या चलनावर निर्मला सीतारमण काय म्हणाल्या?
13
२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!
14
हुमायूं कबीर यांनी मुर्शिदाबादमध्ये केली बाबरी मशिदीची पायाभरणी, भाजपा-तृणमूलचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप  
15
IND vs SA : जड्डूच्या गोलंदाजीवर फसला बावुमा! कॅच घेतल्यावर कोहलीनं अशी घेतली मजा (VIDEO)
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: विशेष व्रत करा; वर्षभर पुण्य-लाभ, विनायक कल्याण-मंगल करेल!
17
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; कॅन्सरसह 'या' आजारांचा धोका, आताच बदला सवय
18
अमेरिका सोडून भारतात परत का आली माधुरी दीक्षित? म्हणाली, "बऱ्याच गोष्टी घडल्या..."
19
'कल्कि'च्या सीक्वेलमध्ये दीपिका पादुकोणच्या जागी प्रियंका चोप्रा?, 'देसी गर्ल'नेही ठेवली 'ही' अट
20
Video - गेमर नवरा! विधी राहिल्या बाजुला 'तो' फोनमध्ये मग्न: लग्नमंडपात खेळत होता फ्री फायर
Daily Top 2Weekly Top 5

हेच ते ‘सॅबोच्युअर्स’?

By admin | Updated: December 17, 2015 02:52 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि त्यांचे परराष्ट्र धोरणविषयक सल्लागार सरताज अझीझ यांची भेट घेऊन आल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि त्यांचे परराष्ट्र धोरणविषयक सल्लागार सरताज अझीझ यांची भेट घेऊन आल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत हिन्दीतून निवेदन करताना ‘सॅबोच्युअर’ याच शब्दाचा वापर केला. बहुधा हिन्दी भाषेत त्यांना या कुविशेषणाचा प्रतिशब्द सापडला नसावा. अर्थात मराठीतही तसा तंतोतंत शब्द नाही. पौराणिक काळात ऋषीमुनींच्या यज्ञात हाडके टाकण्याचा उद्योग काही राक्षस करीत असत असे सांगतात. हे राक्षस म्हणजेच सॅबोच्युअर्स असे म्हणता येईल. तूर्तास त्यांना घातपाती लोक असे म्हणता येईल. सुषमा स्वराज यांनी अशा घातपात्यांकडे स्पष्ट निर्देश केला नसला तरी इशारा बहुधा हुरियतच्या नेत्यांकडे असावा. कारण स्वराज पाकिस्तानातून परतत नाहीत तोच या नेत्यांनी पाकिस्तानचे भारतातील राजदूत अब्दुल बासीत यांची भेट घेतली (त्यांनीही ती दिली) व भारत-पाक दरम्यान होणाऱ्या चर्चेच्या वेळी पाकिस्तानने कोणती भूमिका घ्यावी याचे मार्गदर्शनही केले. काश्मीर हा विवाद्य मुद्दा असल्याचे आणि काश्मिरातून तत्काळ सैन्य मागे घेण्याचे भारत मान्य करीत नाही तोवर चर्चा होऊ शकत नाही ही भूमिका पाकिस्तानने घ्यावी असे जहालपंथी आणि पाकधार्जिणे हुरियत नेते सैय्यद अली शाह गिलानी यांनी बासीत यांना सांगितले. त्यांच्या या भेटीवर काँग्रेस पक्षाने सडकून टीकादेखील केली आहे. अर्थात गिलानी आणि बासीत यांच्यातील चर्चेला एक वेगळी पार्श्वभूमीदेखील आहे. भारताचे पाकमधील राजदूत टी.सी.ए.राघवन यांनी याच सप्ताहात पाकिस्तानमध्ये एका जाहीर कार्यक्रमात बोलताना, उभय देशांदरम्यानच्या चर्चेत काश्मिरचा मुद्दा नक्की असेल आणि असलाच पाहिजे पण काश्मीर कोणते तर आज पाकिस्तानने ज्याला वेढून ठेवले आहे, ते! त्यांच्या या स्पष्ट विधानामुळे हुरियत नेते पिसाळले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान चीनच्या दौऱ्यावर असलेल्या नवाज शरीफ यांनी अलीकडच्या काळात ते स्वत: आणि मोदी व स्वराज यांच्या दरम्यान जी चर्चा झाली ती अत्यंत सकारात्मक असल्याचे चिनी नेत्यांना आवर्जून सांगितले. पण एकीकडे असे प्रमाणपत्र द्यायचे आणि दुसरीकडे हुरियतच्या नेत्यांना गोंजारत राहायचे हा पाकिस्तानचा नेहमीचाच उद्योग राहिला आहे. तशातच भारताने मात्र प्रथमपासून आपली भूमिका स्वच्छ ठेवली आहे आणि ती म्हणजे चर्चा केवळ द्विपक्षीयच राहील तिच्यात तिसऱ्या पक्षाला म्हणजे हुरियतला कोणतेही स्थान राहणार नाही. हे सारे पाहिल्यानंतर सुषमा स्वराज यांना आलेला अनुभव व त्याआधारे त्यांनी व्यक्त केलेला आशावाद गाळूनच घेतलेला बरा.