शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

सैनिकाच्या सुटकेसाठी धावा

By admin | Updated: October 8, 2016 04:02 IST

भारतीय सैनिकाला पकडल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानने चार दिवसात कोलांटउडी मारली.

भारतीय सैनिकाला पकडल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानने चार दिवसात कोलांटउडी मारली. त्यामुळे चंदू चव्हाण याच्या सुटकेसाठी धावा केला जात आहे. ‘जय जवान, जय किसान’ हा नारा लालबहादूर शास्त्री यांनी दिला, त्यातून सैनिक आणि शेतकरी यांचे देशाच्या दृष्टीने असलेले महत्त्व अधोरेखित झाले. या दोन्ही घटकांविषयी सर्वसामान्य भारतीयांच्या मनात आदराची भावना आणखी बळावली. त्याचा प्रत्यय महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये बघायला मिळतो. गावामधील अनेक शेतकऱ्यांची मुले सैन्यात दाखल होतात. सैनिकांचे गाव म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख तयार झाली आहे.जळगाव जिल्ह्यातील सामनेर हे गाव त्यापैकीच एक आहे. गेल्या आठवड्यात ते अचानक प्रकाशझोतात आले. भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्याने देशभर आनंदोत्सव साजरा होत असतानाच चंदू चव्हाण या सैनिकाने चुकून नियंत्रण रेषा ओलांडल्याने त्याला पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतल्याची बातमी येताच सामनेरसह खान्देशला धक्का बसला. त्याचे मूळ गाव सामनेर (जि.जळगाव) आणि आजोळ बोरविहिर (जि.धुळे) येथील नातेवाईक व ग्रामस्थांनी ‘चंदूदादा’च्या सुटकेसाठी धावा सुरु केला. चंदू यांच्या सुटकेच्या मागणीसाठी सामनेरला ग्रामसभा घेऊन ठराव करण्यात आला. सरपंचांसह ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले. धुळ्यात विद्यार्थ्यांनी पाकिस्तानच्या विरोधात निदर्शने केली. ज्याला जो मार्ग योग्य वाटला, त्याने तो निवडून चंदू यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले. ग्रामस्थांची ही धडपड जशी चंदू चव्हाण यांच्यासाठी होती, तशीच ती प्रत्येक भारतीय सैनिकासाठी होती. भारतीय सैनिकांविषयी सर्वसामान्यांमध्ये असलेल्या आस्थेची ही अनुभूती होती. चंदू चव्हाण यांना पाकिस्तानी लष्कराने पकडल्याच्या बातमीच्या धक्क््याने त्याच्या आजीचे निधन झाले. मोठ्या भावासोबत आजी जामनगर (गुजराथ) येथे राहात होती. भाऊ भूषण चव्हाण हादेखील लष्करात कार्यरत आहे. आई-वडिलांचे अकाली निधन झाल्यानंतर चंदू आणि त्यांच्या भावंडांचे पालनपोषण या आजीने बोरविहिर येथे केले. चंदू परत येत नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थींचे विसर्जन न करण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतल्याने आजी-नातवाच्या ऋणानुबंधाचे दर्शन घडले. चंदू यांना पाकिस्तानी लष्कराने पकडणे, त्या धक्कयाने आजीचे निधन होणे, या दु:खद वार्ता चव्हाण कुटुुंबियांमध्ये घडत असताना भाच्याच्या आगमनाने एक सुखद झुळूक आली. इंदूर येथे असलेल्या रुपाली नामक बहिणीला मुलगा झाला. एखाद्या चित्रपटाच्या कथानकासारख्या या घडामोडी घडत आहेत. चंदू चव्हाण यांच्या सुटकेसाठी सरकार पातळीवर प्रयत्न सुरु असल्याची ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी चंदू यांच्या कुटुंबियांना दिली आहे. राजनाथसिह यांनी भूषण चव्हाण यांना फोन केला तर डॉ.भामरे हे स्वत: बोरविहिरला जाऊन आले. आजोबा चिंधा पाटील आणि भाऊ भूषण चव्हाण यांना भेटून थोडा अवधी लागेल, पण चंदू यांना परत आणू असा दिलासा दिला. ‘स्ट्रॅटेजीक स्ट्राईक’ नंतर बिथरलेल्या पाकिस्तान आणि तिथल्या प्रसार माध्यमांच्या कोलांटउड्यांनी चव्हाण कुटुुंबियांची चिंता वाढवली आहे. ‘डॉन न्यूज ’ नेच चंदू चव्हाण या भारतीय सैनिकाच्या अटकेचा दावा केला होता. भारतीय लष्कराने चंदू हा चुकून सीमा ओलांडून गेल्याचे सांगत पाकिस्तान लष्कराकडे त्याच्या सुटकेची मागणी केली. परंतु चार दिवसांनी पाकिस्तानने चंदू चव्हाण आमच्याकडे नाहीच असा कांगावा सुरु केला.पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे वारंवार होणारे उल्लंघन, कबुतरे, फुगे पाठवून निर्माण केलेले संभ्रमाचे वातावरण यामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. संबंध सुधारल्यानंतर चंदू चव्हाण यांच्या सुटकेसाठी प्रयत्न होतील, याची जाणीव सैनिक असलेल्या भावाला आहे. त्यामुळे परिस्थिती निवळण्याची सारे वाट पाहात आहेत.- मिलिंद कुलकर्णी