शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

रोहित, पायल आणि असंख्य प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 16:21 IST

जळगावची लेक डॉ.पायल तडवीच्या आत्महत्येने असंख्य प्रश्नांची मालिका उभी केली आहे

मिलिंद कुलकर्णीजळगावची लेक डॉ.पायल तडवीच्या आत्महत्येने असंख्य प्रश्नांची मालिका उभी केली आहे. रोहित वेमुला या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर पायलची आत्महत्या ही प्रगत, पुढारलेल्या समाजाला कलंक आहे. एकविसावे शतक, माहिती तंत्रज्ञानाचे युग असा टेंभा आम्ही मिरवत असलो तरी शिक्षणाच्या क्षेत्रात अजूनही जातीय मानसिकता अस्तित्व राखून आहे, हे मोठे धक्कादायक चित्र आहे.शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत होतो, असे म्हणतात. पण याच शैक्षणिक क्षेत्रात अद्यापही वर्णवाद, वर्गवादाचा पगडा असेल, तर आम्ही आदिम काळातच वावरत आहोत की, काय असा प्रश्न उपस्थित व्हावा.दुर्देवाने समाज आरक्षणसमर्थक आणि विरोधक असा दुभंगलेला आहे. आरक्षणाचा लाभ मिळालेल्या व्यक्तीकडे लाभार्थी म्हणून बघणे ही संकुचित मानसिकता आहे. इतिहासाचा अभ्यास नसलेली, संस्कृतीविषयी ज्ञान नसलेली मंडळी उच्चरवाने मांडणी करीत असली म्हणजे ते खरे असे मानण्याचा अलिकडे प्रघात पडू लागला आहे. पण तसे ते नाही, हे लक्षात घ्यायला हवे.दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्य समाजाच्या उत्थानासाठी आरक्षणाची आवश्यकता आहे आणि समाज उन्नत, प्रगत होत नाही, तोपर्यंत ते सुरु राहील, हे माहित असूनही काही मंडळी त्याविषयी अपप्रचार करीत असतात. काही उघडपणे तर काही कुजबूजीतून विरोधी मते पसरवत असतात. संविधानाने दिलेला अधिकार नाकारता येणार नाही, याची कल्पना असतानाही अशा गोष्टी होत आहेत. त्यामुळेच समाजात दुभंगलेपण आले आहे.रोहिम वेमुलाच्यावेळी असेच घडले. डॉ.पायल तडवीच्या वेळी त्याची पुनरुक्ती होत आहे. पण आता मात्र समाज संघर्षाच्या पवित्र्यात आहे. तरुण संतप्त आहेत. समाजमाध्यमांद्वारे हा विषय ज्या पध्दतीने हाताळला गेला, त्यावरुन या माध्यमाची शक्तीदेखील लक्षात आली. प्रशासनाला समाजाच्या व्यापक विरोधाची दखल घ्यावी लागली आहे. कार्यवाही करण्यास भाग पाडले आहे. मात्र प्रशासनाने या गोष्टी घडणार नाही, यासाठी कठोर उपाययोजना करायला हव्यात. औपचारिकता म्हणून रॅगिंग विरोधी समिती गठीत करणे आणि ती सक्रीय असणे यात महदअंतर असल्याचे दिसून आले. पायल आणि तिच्या कुटुंबियांच्या तक्रारीची वेळीच दखल घेतली गेली असती तर पायल वाचली असती.शिक्षणक्षेत्राने आता अधिक सजग, सतर्क होण्याची आवश्यकता आहे. संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक, विविध समितींचे पदाधिकारी, विद्यार्थी संघटना यांनी अशा गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष घालायला हवे. असे प्रकार घडत असतील, तर वेळीच त्याची दखल घेतली गेली पाहिजे. कोणताही दबाव आला तरी कारवाई करण्यास टाळाटाळ होऊ नये. प्रशासनाने यासंदर्भात उपाययोजना कठोर केलेल्या असल्या तरी त्याची अंमलबजावणी होत नाही. दोषींना शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा केला गेला तर पुन्हा कुणी असे करण्याचे धाडस करणार नाही.मुळात मुलींचे प्रमाण कमी होत आहे, त्यातही शिक्षणात गळतीचे प्रमाण मुलींमध्ये सर्वाधिक आहे. एवढ्या विपरीत परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या मुलींना प्रोत्साहनपर, उत्साहवर्धक वातावरण निर्माण करणार आहोत की, नाही? अशा घटना घडल्यास कोणते पालक आपल्या मुलींना शिक्षणासाठी पाठवतील, हे लक्षात घ्यायला हवे. मध्यंतरी मुक्ताईनगर तालुक्यातील आदिवासी मुलींचे विदर्भातील एका आश्रमशाळेत लैंगिक शोषण केले गेल्याची घटना उघडकीस आली. त्या गावातील सुमारे ३०-३५ मुलींनी शिक्षण सोडून देऊन गावाची वाट धरली. त्यांचे भविष्य झाकोळले. शासन सगळ्या सुविधा देत असेल, पण जर वातावरण पूरक आणि पोषक नसेल तर त्याचा उपयोग काय? एकीकडे आरक्षणाचे लाभार्थी म्हणून उच्चवणीय, उच्चवर्गीय मंडळी विरोधात आहेत, दुसरीकडे आरक्षणाचे लाभ देखील सहजसाध्य राहिलेले नाहीत, तेथेही हक्क असूनही लाचारी, अजिजीने ते मिळत आहेत. कसे बदलणार हे वातावरण हा मोठा प्रश्न आहे. दुभंगलेपण सांधले जाणार कसे हा देखील प्रश्न आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरJalgaonजळगाव