शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

रितेऽऽऽश, ‘तो’ चेहरा लक्षात ठेवा !

By राजा माने | Updated: July 9, 2018 04:56 IST

आजआपला इंद्रलोकांचा मराठी भूमीतील स्टार रिपोर्टर यमके खूप नाराज आणि वैतागलेला होता. या आठवड्यात इंद्रलोकांना मराठी भूमीतील कुठलाही रिपोर्ट न पाठविण्याचा निर्णय त्याने घेतला आणि महागुरू नारदांना फोन लावला...

आजआपला इंद्रलोकांचा मराठी भूमीतील स्टार रिपोर्टर यमके खूप नाराज आणि वैतागलेला होता. या आठवड्यात इंद्रलोकांना मराठी भूमीतील कुठलाही रिपोर्ट न पाठविण्याचा निर्णय त्याने घेतला आणि महागुरू नारदांना फोन लावला... नारदांची तिकडून डायलर टोन सुरू झाली, नारायण.. नारायण ... नारदांनी फोन उचलला आणि यमकेने त्यांना या आठवड्यात कुठलाही रिपोर्ट नसल्याचे सांगून टाकले. शिष्याच्या अशा वागण्याने नारदही बुचकळ्यात पडले आणि बोलू लागले...नारद : अरे शिष्या, असे काय घडले की ज्यामुळे तू एवढा वैतागलेला आहेस?यमके : गुरुदेव काय सांगू तुम्हाला! अहो काल रात्रीपासून मला सतत फोन येताहेत आणि तिकडून फक्त रागारागात एकच वाक्य ती व्यक्ती बोलते आणि फोन लगेच फोन कट करते..नारद : कोणतं वाक्य?यमके : यमकेऽऽऽ.. हा चेहरा लक्षात ठेव.. हा चेहरा लक्षात ठेव..नारद : मग त्यात काय एवढं?त्याला फक्त हो म्हणायचं आणि लय भारी सिनेमा पाहायला पाठवून द्यायचं..यमके : तेवढं सोप नाही. कारण तो फोन चक्क लातूर जिल्ह्यातल्या बाभळगावातून होता.नारद : मग, त्याचे काय म्हणणे आहे?यमके : तो म्हणतोय रितेशच्या रायगड फोटोवर एक शब्दाचा पण रिपोर्ट इंद्रदेवांना द्यायचा नाही...नारद : पण तुझे तर रिपोर्ट देणे कर्तव्यच आहे!यमके : गुरुदेव, रितेशने रायगडावर शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीवर फोटोसेशन केले आणि त्यास टीकेला सामोरे जावे लागले.नारद : मग...यमके: महाराजांच्या चरणाजवळ बसण्यामागे भक्तिभाव होता, कुणाला दुखावण्याचा हेतू नव्हता, परंतु या कृत्यामुळे कुणी दुखावले असेल तर त्यांची माफी मागतो, अशी पोस्ट रितेशने फेसबुकवर लिहून माफीही मागून टाकली.नारद : बरं... हा रिपोर्ट दे इंद्रदेवांना...यमके : गुरुदेव, मी तुमचा शिष्य असलो तरी रितेशचाही फॅन आहे, हे तुम्ही जाणताच.नारद : हो, पण आपण कर्तव्यात कसूर करू नये. तू जे सत्य आहे ते कळव.यमके : देवा सत्य तुम्ही जाणताच! त्यामुळे तुम्हीच इंद्रदेवांना रिपोर्ट द्या.नारद : ठीक आहे मग, तू या आठवड्यात काय करणार आहेस?यमके : मी रितेशला निरोप धाडणार आहे की, छत्रपती शिवरायांबद्दल त्याच्या मनात किती श्रद्धाभाव आहे, हे त्याच्या सर्वच फॅनना माहिती आहे. पण त्या तुझ्या रामगोपालच्या नादात त्या पितामहांचे आसन गेले होते. त्यांचे चेहरे तू कसा विसरू शकतोस? आंबेपुराण गाजूनही काही न घडण्याच्या जमान्यात त्याच्यासारख्या कलाकारांनी ताकही फुंकून प्यायला नको का? म्हणून त्याला तमाम फॅन्सच्या वतीने म्हणावे वाटते... ‘‘रितेऽऽऽश.. ‘‘तो’’ चेहरा लक्षात ठेव...काळजीने वाग, त्याला सांगावाच धाडणार आहे. 

टॅग्स :Ritesh Deshmukhरितेश देशमुखnewsबातम्या