शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
3
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
4
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
5
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
6
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
7
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
8
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
9
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
10
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
11
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
12
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
13
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
14
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
15
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
16
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
17
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
18
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
19
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
20
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

हॉटेल्सच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या पोटात खड्डा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2021 08:47 IST

वाढत्या महागाईमुळे हॉटेलांच्या दरात वाढ होणे स्वाभाविक असले तरी सर्वसामान्यांना या महागाईचे चटके बसणार नाही, याचीही काळजी घ्यायला हवी

- प्रसाद जोशी

गेल्या दोन महिन्यांपासून देशातील इंधनाच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. इंधनाच्या दरवाढीचा फटका हा सर्वच क्षेत्रांना बसत असल्यामुळे सर्वच गोष्टींची दरवाढ झाली आहे. त्यातच आता हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनेने तीस टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्याचे सूतोवाच केले आहे. आधीच मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्यांना या दरवाढीमुळे मोठाच फटका बसणार आहे.

गेल्या सुमारे दीड वर्षांपासून कोरोनाच्या निर्बंधांमुळे सर्वांच्याच आयुष्यामध्ये अनेक बदल घडून आले आहेत. या निर्बंधांचा सर्वाधिक फटका बसलेल्या क्षेत्रांमध्ये हॉटेल व्यवसाय हा अग्रस्थानी आहे. सुमारे पाऊण वर्ष या क्षेत्राला बंदचा सामना करावा लागला. त्यामुळे हॉटेल चालकांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. त्यातच आता वाढत असलेले इंधनाचे, विजेचे दर यामुळे हे क्षेत्र मोडकळीला आले, ही बाब सत्य असली तरी त्यासाठी ३० टक्क्यांपर्यंत दरवाढ ही खूपच जास्त आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोणतीही दरवाढ केली नसल्याचे हॉटेल चालकांच्या संघटनेचे म्हणणे असले तरी संघटना पातळीवर नसली तरी वैयक्तिक पातळीवर दरवाढ केली गेली आहे. त्याबाबत कोणीच तक्रारही केलेली नाही. मात्र आता एकदम मोठी दरवाढ करणे अन्यायकारक वाटते.

कोरोनाच्या निर्बंधांमुळे अनेकांचे रोजगार गेले. पगारदारांचे पगार कमी झाले आहेत. त्यामुळे त्यांचेही उत्पन्न घटलेच आहे. शिवाय अन्य ठिकाणी होत असलेली महागाईही सर्वांनाच सहनच करावी लागते आहे. आता हॉटेलांची दरवाढ झाल्यास सामान्यांना पोटाला चिमटा काढूनच रहावे लागेल, अशी स्थिती आहे. आज अनेक शहरांमध्ये हॉटेलमध्ये जेवणे हे अत्यावश्यक झाले आहे. नव्हे तर, बदललेल्या परिस्थितीमुळे ती काळाची गरज बनली आहे. अनेक जण नोकरी, व्यवसाय तसेच शिक्षणासाठी एकेकटे रहात असतात. त्यांना हॉटेल अथवा खानावळीत जेवण्याशिवाय अन्य पर्याय उपलब्ध नसतो. मात्र मोठी दरवाढ झाल्यास आधीच मिळत असलेले तुटपुंजे उत्पन्न आणखी कमी होईल. त्याचा परिणाम अन्य गरजा कमी करणे व बचतीचे प्रमाण घटण्यामध्ये होऊ शकतो. त्यामधून मागणी कमी होऊन वस्तूंची विक्री काही प्रमाणात घटण्याची शक्यता दिसते. परिणामी अर्थव्यवस्थेच्या वाढीलाही खीळ बसू शकते.

हॉटेलांच्या दरवाढीला मुख्यत: कारणीभूत ठरत आहे ती, व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरची दरवाढ. याबाबत सरकारनेही आपला व्यावसायिक दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरामध्ये दररोज बदल करण्याचा निर्णय घेताना त्यामुळे सामान्यांना एकदम दरवाढीची झळ बसणार नाही तसेच कंपन्यांनाही तोटा सहन करावा लागणार नाही, असे सांगितले गेले. हे खरे असले तरी त्याचा केवळ उत्तरार्धच खरा झाला आहे. सामान्यांच्या खिशाला लागायची ती कात्री लागतेच आहे. मात्र कंपन्यांना तोटा सहन करावा लागत नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारात दर कपात झाल्यास त्याचा लाभ सामान्यांना न मिळता तो सरकार आणि कंपन्याच लाटत आहेत. कंपन्यांनी दर कमी केले तर, सरकार लगेच कर वाढवून आपले खिसे भरत असल्याचे चित्र गेल्या अनेक वर्षांपासून सर्वजण बघत आहेत. निवडणुका आल्या की, सामान्यांचा पुळका येऊन दरवाढ थांबते आणि निवडणुका संपताच पुन्हा पहिले पाढे पंचावन्न असे सुरू होते. त्यामुळे सरकारनेही व्यापारी वृत्ती सोडून आपले कल्याणकारी स्वरुप धारण करणे गरजेचे आहे. सरकारने असे धोरण स्वीकारल्यास एकदम होणारी दरवाढ ही नागरिक आणि व्यावसायिक यांना सहन करावी लागणार नाही. सरकारला मात्र काही प्रमाणात कराचा महसूल मिळविण्यासाठी अन्य पर्यायांचा मार्ग शोधावा लागेल.

कोणत्याही व्यवसायात ग्राहक हा देव मानला जातो. हॉटेल व्यवसायही त्याला अपवाद नाही. त्यामुळे मोठी दरवाढ करून या व्यावसायिकांचे उत्पन्न कायम राहणार असले तरी, ग्राहकांची संख्या कमी झाल्यास दरवाढीनंतरही आधीच्या उत्पन्नाएवढेही पैसे न मिळाल्यास तोटाच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा सर्वांगीण विचार करून हॉटेल चालकांनीही दरवाढीचे प्रमाण कमी ठेवणे गरजेचे आहे. नाहीतर सर्वसामान्यांच्या पोटाला मोठाच फटका बसेल.

टॅग्स :hotelहॉटेल