शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

प्रेमस्वातंत्र्याचा अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 04:11 IST

वयात आलेल्या मुला-मुलींनी लग्न करून किंवा लग्नावाचून एकत्र राहता येईल आणि त्यांच्या तशा सहजीवनाला त्यांचे आईवडील, जातभाई, नातेवाईक, पोलीस किंवा न्यायालये विरोध करू शकणार नाहीत

वयात आलेल्या मुला-मुलींनी लग्न करून किंवा लग्नावाचून एकत्र राहता येईल आणि त्यांच्या तशा सहजीवनाला त्यांचे आईवडील, जातभाई, नातेवाईक, पोलीस किंवा न्यायालये विरोध करू शकणार नाहीत असा महत्त्वाचा व समाजजीवनावर दीर्घकालीन परिणाम करणारा निर्णय देऊन सर्वोच्च न्यायालयाने आजच्या तरुण-तरुणींची पारंपरिक जाचातून मुक्तता केली आहे. वयाच्या १८ व्या वर्षी मतदानाचा अधिकार प्राप्त होत असेल तर तशा मुला-मुलींना त्यांचे आयुष्याचे निर्णयही स्वतंत्रपणे घेता आले पाहिजेत असे सांगून न्यायालयाने त्यांच्या सहजीवनाला व लग्नाला असलेली वयोमर्यादाही (मुलांसाठी २१ व मुलींसाठी १८) रद्द केली आहे. अशा मुला-मुलींनी आईवडिलांच्या मर्जीविरुद्ध जाऊन विवाह केला वा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला तर तो सज्ञानांचा निर्णय म्हणून कायदा व समाज यांना मान्य करावा लागेल असे सांगून न्यायालयाने नव्या पिढ्यांना जुन्या पिढ्यांच्या ताब्यातून मुक्तच केले आहे. नंदकुमार (२० वर्षे) व तुषारा (१९ वर्षे) या केरळातील मुला-मुलींनी तिरुअनंतपुरमच्या मंदिरात जाऊन एकमेकांना विवाहमाळ घातली. नंदकुमारचे वय कमी म्हणून तुषाराच्या आईवडिलांनी ते लग्न रद्द करण्याची व मुलीला आपल्या ताब्यात देण्याची विनंती केरळच्या उच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे केली. त्या न्यायालयाने ती मान्य करून तुषाराला तिच्या आईवडिलांच्या स्वाधीन केले. मात्र या निकालाविरुद्ध नंदकुमारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका त्या न्यायालयाने मान्य करून केरळ उच्च न्यायालयाचा निकाल रद्द केला व नंदकुमार आणि तुषाराला एकत्र राहू देण्याचा निर्णय दिला. तो देताना त्या न्यायालयाने सज्ञान मुला-मुलींचे विवाह व सहजीवनाचे स्वातंत्र्य मान्य केले. तसा अधिकार त्यांना असल्याचेही जाहीर केले. ही मुले त्यांच्या मर्जीने एकत्र राहत असतील तर त्यांचे वय कायदेशीर अर्थाने पूर्ण असो वा नसो त्यांना तसे राहता येईल. त्यांचे कुटुंब, पोलीस व न्यायालयेही त्यांची ताटातूट करू शकणार नाहीत असेही त्याने जाहीर केले. देशातील तरुणाईला विवाह स्वातंत्र्य व प्रेमाचे अधिकार बहाल करणारा निकालच यातून सर्वोच्च न्यायालयाने दिला. एकत्र राहणाऱ्या वा विवाह केलेल्या अशा जोडप्यांपैकी एखाद्याचे वय कायद्याने सांगितलेल्या मर्यादेहून कमी असेल तर ते वय पूर्ण झाल्यानंतर त्याला तो विवाह वा सहजीवन मोडता येईल हेही सांगून न्यायालयाने विवाह हे जन्मभराचे धार्मिक वा ईश्वरी बंधन नाही, तसाच तो आयुष्यभराचा भार नाही हेही स्पष्ट केले. मताचा अधिकार आहे मात्र मत वापरण्याचा अधिकार नाही ही सध्याची अवस्था कायदा व समाज या दोन्ही दृष्टींनी विसंगत आहे. याच विसंगतीचा फायदा घेऊन आपल्या मर्जीविरुद्ध व जातीबाह्य लग्न करणाºया मुला-मुलींना देहदंडापर्यंतच्या बेकायदेशीर शिक्षा आपल्यातील खाप पंचायती सुनावत आल्या. त्यापायी अनेक चांगल्या तरुण-तरुणींचे प्राणही या पंचायतींनी घेतले. प्रेम ही एक स्वाभाविक गोष्ट आहे. तीत फसवणूक व बळजोरी असणे हाच अपराध आहे. प्रेम निखळ व परस्परसंमत असेल तर परंपरांनी व कायद्यांनी प्रेमीजीवांच्या आड येण्याचे कारण नाही असा याचा अर्थ आहे. लव्ह-जिहादच्या घाणेरड्या नावाने मुला-मुलींना छळणाºया धर्मांधांच्या टोळ्यांना या निकालामुळे आळा बसेल. मात्र याहून महत्त्वाची बाब देशातील तरुणाईला लाभणाºया प्रेमस्वातंत्र्याची आहे. सारे स्वातंत्र्य आहे मात्र जे जीवाला सर्वाधिक भावणारे स्वातंत्र्य आहे तेच नाकारले जात असणे ही आजवरची या तरुण मुला-मुलींच्या मनाची कोंडी या निकालाने संपविली आहे. त्याचवेळी आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहांनी वा तशा सहजीवनात राहू इच्छिणाºया तरुणांनाही हवी ती मोकळीक देऊन मानवी संबंधांवरील पारंपरिक रूढींचे नियंत्रणही न्यायालयाने हटविले आहे. प्रेम मुक्त करणे आणि त्यावरचा इतरांचा नकाराधिकार संपविणे हा या निकालाचा परिणाम कमालीचा क्रांतिकारक व तरुणांकडून स्वागत व्हावा असा आहे.