शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मोठा वारसा आणि परंपरा असलेला काँग्रेस पक्ष चिखलफेकीत मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 03:45 IST

सोलापुरात काँग्रेस पक्षाच्यावतीने माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी व माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा कार्यक्रम रविवारी घेण्यात आला. त्यासाठी राज्यभरातून नेतेमंडळी आली होती

सोलापुरात काँग्रेस पक्षाच्यावतीने माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी व माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा कार्यक्रम रविवारी घेण्यात आला. त्यासाठी राज्यभरातून नेतेमंडळी आली होती. माजी राष्टÑपती प्रतिभाताई पाटील यांच्यासह चार माजी मुख्यमंत्री उपस्थित होते. अपवाद फक्त नारायण राणे यांचा. पण त्या चर्चेला कोणी तोंडच फोडले नाही किंबहुना कोणाला विषय वाढवण्याची संधी दिली नाही. मुळात हा कार्यक्रम जाहीर झाला तेव्हाच हा काँग्रेसचा मेळावा असेल असे अनेकांनी गृहित धरले. पण काँग्रेसने तसे होऊ दिले नाही. माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्री यांची उंची गाठणारा कार्यक्रम त्यांनी केला. स्व. इंदिराजी या ‘आयर्न लेडी’ म्हणून सा-या जगाला माहीत होत्या. या कणखर नेतृत्वाचा ऊहापोह सबंध कार्यक्रमात केला गेला. परमाणू ऊर्जा, सागरी संपत्ती, सौर ऊर्जा या क्षेत्रात भरीव प्रगती झाली असली तरी याची बिजे इंदिरा गांधी यांनी रोवली होती याची उजळणी नव्या पिढीसाठी महत्त्वाची होती. पाणी अडवा पाणी जिरवा, पाणलोट विकास या कल्पना स्व. वसंतदादा यांच्या होत्या. वोरोनोको प्रशालेच्या प्रांगणात भर पावसातही या कार्यक्रमाला झालेली खचाखच गर्दी पाहता हा एक सुनियोजित आणि पक्षविरहित समारंभ वाटला. याला पक्षीय वास येणार नाही याची काळजी घेतली गेली. त्यामुळे दिवंगत नेत्यांची असलेली उंची कायम ठेवण्यात पक्षाला यश आले. तत्पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सरकार आणि भाजपावर ताशेरे ओढले पण शताब्दी कार्यक्रमात मात्र भालचंद्र मुणगेकर वगळता कोणीच पक्ष किंवा सरकारवर टीका केली नाही. यामुळे या दिवंगत माजी नेत्यांच्या कार्यक्रमाला आलेल्या श्रोत्यांना त्यांच्या उंचीचा चांगलाच उजाळा मिळाला. आपला पक्ष किती मोठा याबरोबरच आपल्या पक्षाचे नेते किती मोठ्या उंचीचे आहेत, त्यांनी घेतलेल्या निर्णयाची फळे आज देश कशी चाखतोय हे लोकांना पटवून देण्यात आणि लोकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यात नेत्यांना यश आले. मुळात मोठा वारसा आणि परंपरा असलेला काँग्रेस पक्ष हा चिखलफेकीत मागे असतो आणि हीच काँग्रेसची परंपरा आहे हे पक्षातील नव्या नेत्यांनाही मनोमन पटले.