शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
5
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
6
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
7
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
8
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
9
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
10
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
11
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
12
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
13
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
14
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
15
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
16
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
17
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
18
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
19
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
20
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

जपानी सुपरमार्केट्समधून तांदूळ गायब!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 08:13 IST

Japan News: जपानमध्ये तांदुळाची मागणी दिवसेंदिवस वाढतेच आहे. त्यात वादळांची शक्यता निर्माण झाल्यानं लोक हवालदिल झाले आहेत. तांदुळाच्या पुरवण्यासाठी लोकांनी रस्त्यावर येऊन आंदोलनं आणि प्रदर्शन सुरू केली आहेत. एरवी जपानी समाज अतिशय शिस्तप्रिय आणि शांतताप्रिय मानला जातो; पण तांदुळाच्या मागणीसाठी काही ठिकाणी ही आंदोलनं हिंसकही झाली.

भूकंप, चक्रीवादळं, वादळं... या गोष्टी जपानला नवीन नाहीत. त्यामुळे आजवर त्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे; पण याच नैसर्गिक रुद्रावतारात कमीतकमी नुकसान होईल, अशा पर्यायी गोष्टीही त्यांनी आधुनिक विज्ञानाच्या साहाय्यानं विकसित करून ठेवल्या आहेत. त्यामुळे या नैसर्गिक प्रकोपात जपानमध्ये कमी नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं. तरीही अशी आपत्ती आल्यावर सामान्यांच्या जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होतोच. 

जपानमध्ये वर्षभर काही ना काही नैसर्गिक आपत्ती सुरूच असतात. त्यातही मे ते नोव्हेंबर हा कालावधी जपानमध्ये अतिशय धोकादायक मानला जातो. या काळात लहान-मोठी सुमारे वीस-पंचवीस वादळं येतात. त्यामुळे त्याला ‘टायफून सीझन’ असंही मानलं जातं. अतिवृष्टी, भूस्खलन, नद्यांना पूर येणं... अशा अनेक गोष्टी या काळात घडतात. त्यातही ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात जपानमध्ये सर्वाधिक वादळं येतात. यंदाही या वादळांचं प्रमाण मोठं असण्याची शक्यता आहे. त्यामुळे जपान सरकारनं नागरिकांना आधीच सावधानतेचा इशारा दिला आहे. अशावेळी जगात कुठेही सर्वसामान्य माणसाची जी मानसिक स्थिती होते, तीच जपानी नागरिकांचीही झाली आहे. या वादळाच्या काळात आपल्याला किती काळ घरात डांबून राहावं लागेल याची भीती जपानी नागरिकांना वाटते आहे. त्यामुळे किमान खाण्यापिण्याचे तरी हाल होऊ नयेत म्हणून जपानी नागरिकांनी घरांत तांदुळाचा साठा करून ठेवण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे जपानमध्ये तांदुळाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. 

जपानमध्ये ‘ओबोन फेस्टिव्हल’ अतिशय महत्त्वाचा मानला जातो. हा महोत्सव तिथे नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या काळात जपानी लोक आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करतात. त्यांच्या स्मृती जागवतात. या काळात अनेक जपानी नागरिक सुट्टीवरही असतात. त्यामुळे या कालावधीत तांदुळाची मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढते. यंदाही ती तशी वाढली. 

याशिवाय यंदा जपानमध्ये विदेशी पर्यटक खूप मोठ्या संख्येने आले. जपानच्या ‘नॅशनल टुरिझम ऑर्गनायझेशन’च्या अहवालानुसार यावर्षी केवळ जून महिन्यापर्यंतच ३१ लाखांपेक्षाही अधिक विदेशी पर्यटकांनी जपानला भेट दिली. त्यामुळेही तांदुळाची मोठ्या प्रमाणात गरज निर्माण झाली. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या ‘फॉरिन ॲग्रिकल्चर सर्व्हिस’च्या अहवालानुसार जपानमध्ये २०२३ ते २०२४ या काळात आतापर्यंत तांदुळाचं एकूण उत्पादन ७.३ दशलक्ष टन झालं; पण त्यांची मागणी त्यापेक्षा कितीतरी अधिक होती. या काळात तांदुळाची एकूण विक्री ८.१ दशलक्ष टन झाली. 

जपानमध्ये तांदुळाची मागणी दिवसेंदिवस वाढतेच आहे. त्यात वादळांची शक्यता निर्माण झाल्यानं लोक हवालदिल झाले आहेत. तांदुळाच्या पुरवण्यासाठी लोकांनी रस्त्यावर येऊन आंदोलनं आणि प्रदर्शन सुरू केली आहेत. एरवी जपानी समाज अतिशय शिस्तप्रिय आणि शांतताप्रिय मानला जातो; पण तांदुळाच्या मागणीसाठी काही ठिकाणी ही आंदोलनं हिंसकही झाली. निदर्शनांदरम्यान आंदोलकांनी काही ठिकाणी तांदुळाची स्टोअर्स, दुकाने जाळली. याशिवाय अनेक ठिकाणी जाळपोळ आणि लूटमारही झाली. जपानी नागरिक सहसा हिंसक होत नाहीत; पण त्यांच्या या कृतीनं सरकारही अस्वस्थ झालं आहे. नागरिकांनी शांत राहावं, संयम राखावा, सरकार त्यासाठी पूर्ण प्रयत्न करीत आहे आणि लवकरच तांदुळाचा पुरवठा पूर्ववत केला जाईल, असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं आहे; पण नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. 

खबरदारीचा उपाय म्हणून जपान सरकारने आता तांदुळाचे रेशनिंग सुरू केले आहे. जपानमधील सुपरमार्केट्समध्ये ‘प्रत्येक व्यक्तीनं तांदुळाची जास्तीत जास्त एकच बॅग खरेदी करावी’, असे फलक लावण्यात आले आहेत. ज्या थोड्या सुपरमार्केट्समध्ये तांदूळ शिल्लक आहे, तिथून नागरिकांनी केवळ गरजेपुरताच तांदूळ खरेदी करावा, असं आवाहन केलं जात आहे. जून १९९९नंतर जपानमध्ये पहिल्यांदाच अशी स्थिती ओढवली आहे. 

पंतप्रधानांनी दिला होता राजीनामा!जुलै १९१८ मध्येही जपानमध्ये तांदुळाची कमतरता आणि दरवाढीमुळे मोठं आंदोलन झालं होतं. शेतकरी आणि सर्वसामान्य जनता रस्त्यावर आली होती. हा प्रश्न लवकर न सुटल्यानं शांततेत सुरू झालेलं हे आंदोलन लवकरच तीव्र झालं होतं. अनेक ठिकाणी जाळपोळ, लुटालूट झाली. सरकारी कार्यालयांवर हल्ले झाले. याप्रकरणी तब्बल २५ हजार आंदोलकांना अटक करण्यात आली होती.  इतकंच काय, या आंदोलनामुळे तत्कालीन पंतप्रधान तेराउची मसाताके यांना राजीनामाही द्यावा लागला होता. 

टॅग्स :JapanजपानInternationalआंतरराष्ट्रीय