शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

क्रांतिकारी फडणवीस, वैयक्तिक उंची निश्चितच मोठी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 02:33 IST

‘भारताचे संविधान हे कुणीही बदलू शकत नाही. तसा विचार करणेही राष्ट्रदोह ठरेल‘ असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकदाचे सांगून टाकले. हे एका अर्थाने बरे झाले. फडणवीस यांनी हे विधान ज्या ठिकाणी केले, त्या स्थळाला भारताच्या इतिहासात ऐतिहासिक महत्त्व आहे.

‘भारताचे संविधान हे कुणीही बदलू शकत नाही. तसा विचार करणेही राष्ट्रदोह ठरेल‘ असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकदाचे सांगून टाकले. हे एका अर्थाने बरे झाले. फडणवीस यांनी हे विधान ज्या ठिकाणी केले, त्या स्थळाला भारताच्या इतिहासात ऐतिहासिक महत्त्व आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा आपल्या लाखो अनुयायांसह याच दीक्षाभूमीवर घेतली. भारताची राज्यघटना लिहित असताना बाबासाहेबांनी या देशातील दलित, शोषित, वंचितांच्या कल्याणाचा विचार आपल्या डोळ्यासमोर ठेवला होता. हा देश समताधिष्ठित राहावा, सर्वधर्मसमभाव हा देशाचा गाभा आहे, ही जाणीव बाबासाहेबांना होती. म्हणूनच राज्यघटना लिहिताना त्यांनी हा देश एकसंघ कसा राहील, याकडे कटाक्षाने लक्ष दिले. परंतु, या देशातील काही संकुचित मनोवृत्तीच्या लोकांना या राज्यघटनेतील काही मूल्ये सतत खुपत असतात. त्यामुळे ही राज्यघटना बदलविण्यात यावी, असा सूर या मंडळींकडून अधूनमधून व्यक्त होत असतो. राज्यघटना बदलविण्याची मागणी करणारे लोक प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांच्या वैचारिक परिवारातील म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असतात. याच मंडळींना राज्यघटनेबद्दल आक्षेप असतो. तत्कालीन सरसंघचालक सुदर्शन यांनी तर ‘ही राज्यघटना कचºयाच्या टोपलीत टाकण्याच्या लायकीची आहे’ असे निर्लज्ज विधान केले होते. त्याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी घनिष्ठ नाते असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा असे आश्वासक आणि लोकशाहीला मजबूत करणारे विधान करतात तेव्हा त्यांचे स्वागतच करायला हवे. फडणवीसांचा पिंड हा तसा झापडबंद स्वयंसेवकाचा नाही. ते सुधारणावादी आहेत, संघपरिवाराच्या अनेक गोष्टींना न बोलता आपल्या कृतीतून ते विरोधही करीत असतात. मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील ‘देशद्रोह’ या शब्दामुळे संघ परिवार आणि हिंदुत्ववादी संघटनांमधील काही कट्टर प्रवृत्ती दुखावणे स्वाभाविक आहे. कारण त्यांनी यापुढे राज्यघटना बदलविण्याची मागणी केली तर फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे ते ‘देशद्रोही’ ठरण्याची शक्यता राहील. दीक्षाभूमीवरील फडणवीसांच्या क्रांतिकारी भाषणामुळे संघ परिवारात चलबिचल होणे स्वाभाविक आहे. फडणवीस स्वतंत्र विचारांचे आहेत. हरियाणाचे मनोहरलाल खट्टर किंवा उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ या मुख्यमंत्र्यांसारखे बुरसटलेल्या मनोवृत्तीचे नाहीत. त्यामुळे त्यांचे हे विचार संघ परिवाराला आवडो ना आवडो पण, फडणवीसांची वैयक्तिक उंची यामुळे निश्चितच मोठी होणार आहे

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा