शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

क्रांतिकारी फडणवीस, वैयक्तिक उंची निश्चितच मोठी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 02:33 IST

‘भारताचे संविधान हे कुणीही बदलू शकत नाही. तसा विचार करणेही राष्ट्रदोह ठरेल‘ असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकदाचे सांगून टाकले. हे एका अर्थाने बरे झाले. फडणवीस यांनी हे विधान ज्या ठिकाणी केले, त्या स्थळाला भारताच्या इतिहासात ऐतिहासिक महत्त्व आहे.

‘भारताचे संविधान हे कुणीही बदलू शकत नाही. तसा विचार करणेही राष्ट्रदोह ठरेल‘ असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकदाचे सांगून टाकले. हे एका अर्थाने बरे झाले. फडणवीस यांनी हे विधान ज्या ठिकाणी केले, त्या स्थळाला भारताच्या इतिहासात ऐतिहासिक महत्त्व आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा आपल्या लाखो अनुयायांसह याच दीक्षाभूमीवर घेतली. भारताची राज्यघटना लिहित असताना बाबासाहेबांनी या देशातील दलित, शोषित, वंचितांच्या कल्याणाचा विचार आपल्या डोळ्यासमोर ठेवला होता. हा देश समताधिष्ठित राहावा, सर्वधर्मसमभाव हा देशाचा गाभा आहे, ही जाणीव बाबासाहेबांना होती. म्हणूनच राज्यघटना लिहिताना त्यांनी हा देश एकसंघ कसा राहील, याकडे कटाक्षाने लक्ष दिले. परंतु, या देशातील काही संकुचित मनोवृत्तीच्या लोकांना या राज्यघटनेतील काही मूल्ये सतत खुपत असतात. त्यामुळे ही राज्यघटना बदलविण्यात यावी, असा सूर या मंडळींकडून अधूनमधून व्यक्त होत असतो. राज्यघटना बदलविण्याची मागणी करणारे लोक प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांच्या वैचारिक परिवारातील म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असतात. याच मंडळींना राज्यघटनेबद्दल आक्षेप असतो. तत्कालीन सरसंघचालक सुदर्शन यांनी तर ‘ही राज्यघटना कचºयाच्या टोपलीत टाकण्याच्या लायकीची आहे’ असे निर्लज्ज विधान केले होते. त्याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी घनिष्ठ नाते असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा असे आश्वासक आणि लोकशाहीला मजबूत करणारे विधान करतात तेव्हा त्यांचे स्वागतच करायला हवे. फडणवीसांचा पिंड हा तसा झापडबंद स्वयंसेवकाचा नाही. ते सुधारणावादी आहेत, संघपरिवाराच्या अनेक गोष्टींना न बोलता आपल्या कृतीतून ते विरोधही करीत असतात. मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील ‘देशद्रोह’ या शब्दामुळे संघ परिवार आणि हिंदुत्ववादी संघटनांमधील काही कट्टर प्रवृत्ती दुखावणे स्वाभाविक आहे. कारण त्यांनी यापुढे राज्यघटना बदलविण्याची मागणी केली तर फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे ते ‘देशद्रोही’ ठरण्याची शक्यता राहील. दीक्षाभूमीवरील फडणवीसांच्या क्रांतिकारी भाषणामुळे संघ परिवारात चलबिचल होणे स्वाभाविक आहे. फडणवीस स्वतंत्र विचारांचे आहेत. हरियाणाचे मनोहरलाल खट्टर किंवा उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ या मुख्यमंत्र्यांसारखे बुरसटलेल्या मनोवृत्तीचे नाहीत. त्यामुळे त्यांचे हे विचार संघ परिवाराला आवडो ना आवडो पण, फडणवीसांची वैयक्तिक उंची यामुळे निश्चितच मोठी होणार आहे

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा