शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

क्रांतिकारी फडणवीस, वैयक्तिक उंची निश्चितच मोठी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 02:33 IST

‘भारताचे संविधान हे कुणीही बदलू शकत नाही. तसा विचार करणेही राष्ट्रदोह ठरेल‘ असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकदाचे सांगून टाकले. हे एका अर्थाने बरे झाले. फडणवीस यांनी हे विधान ज्या ठिकाणी केले, त्या स्थळाला भारताच्या इतिहासात ऐतिहासिक महत्त्व आहे.

‘भारताचे संविधान हे कुणीही बदलू शकत नाही. तसा विचार करणेही राष्ट्रदोह ठरेल‘ असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकदाचे सांगून टाकले. हे एका अर्थाने बरे झाले. फडणवीस यांनी हे विधान ज्या ठिकाणी केले, त्या स्थळाला भारताच्या इतिहासात ऐतिहासिक महत्त्व आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा आपल्या लाखो अनुयायांसह याच दीक्षाभूमीवर घेतली. भारताची राज्यघटना लिहित असताना बाबासाहेबांनी या देशातील दलित, शोषित, वंचितांच्या कल्याणाचा विचार आपल्या डोळ्यासमोर ठेवला होता. हा देश समताधिष्ठित राहावा, सर्वधर्मसमभाव हा देशाचा गाभा आहे, ही जाणीव बाबासाहेबांना होती. म्हणूनच राज्यघटना लिहिताना त्यांनी हा देश एकसंघ कसा राहील, याकडे कटाक्षाने लक्ष दिले. परंतु, या देशातील काही संकुचित मनोवृत्तीच्या लोकांना या राज्यघटनेतील काही मूल्ये सतत खुपत असतात. त्यामुळे ही राज्यघटना बदलविण्यात यावी, असा सूर या मंडळींकडून अधूनमधून व्यक्त होत असतो. राज्यघटना बदलविण्याची मागणी करणारे लोक प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांच्या वैचारिक परिवारातील म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असतात. याच मंडळींना राज्यघटनेबद्दल आक्षेप असतो. तत्कालीन सरसंघचालक सुदर्शन यांनी तर ‘ही राज्यघटना कचºयाच्या टोपलीत टाकण्याच्या लायकीची आहे’ असे निर्लज्ज विधान केले होते. त्याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी घनिष्ठ नाते असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा असे आश्वासक आणि लोकशाहीला मजबूत करणारे विधान करतात तेव्हा त्यांचे स्वागतच करायला हवे. फडणवीसांचा पिंड हा तसा झापडबंद स्वयंसेवकाचा नाही. ते सुधारणावादी आहेत, संघपरिवाराच्या अनेक गोष्टींना न बोलता आपल्या कृतीतून ते विरोधही करीत असतात. मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील ‘देशद्रोह’ या शब्दामुळे संघ परिवार आणि हिंदुत्ववादी संघटनांमधील काही कट्टर प्रवृत्ती दुखावणे स्वाभाविक आहे. कारण त्यांनी यापुढे राज्यघटना बदलविण्याची मागणी केली तर फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे ते ‘देशद्रोही’ ठरण्याची शक्यता राहील. दीक्षाभूमीवरील फडणवीसांच्या क्रांतिकारी भाषणामुळे संघ परिवारात चलबिचल होणे स्वाभाविक आहे. फडणवीस स्वतंत्र विचारांचे आहेत. हरियाणाचे मनोहरलाल खट्टर किंवा उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ या मुख्यमंत्र्यांसारखे बुरसटलेल्या मनोवृत्तीचे नाहीत. त्यामुळे त्यांचे हे विचार संघ परिवाराला आवडो ना आवडो पण, फडणवीसांची वैयक्तिक उंची यामुळे निश्चितच मोठी होणार आहे

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा