शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रप्रेमाची भावनाच घडवेल क्रांती

By admin | Updated: August 9, 2015 01:40 IST

औद्योगिक क्षेत्रात क्रांती घडवायची असेल तर भारताला सर्वप्रथम पेट्रोलियम पदार्थांच्या बाबतीत स्वयंपूर्णता मिळवावी लागेल. आज आपला देश ९ लाख कोटी रुपयांचे क्रुड आॅइल (कच्चे तेल) आयात करतो.

- सत्यनारायण नुवालऔद्योगिक क्षेत्रात क्रांती घडवायची असेल तर भारताला सर्वप्रथम पेट्रोलियम पदार्थांच्या बाबतीत स्वयंपूर्णता मिळवावी लागेल. आज आपला देश ९ लाख कोटी रुपयांचे क्रुड आॅइल (कच्चे तेल) आयात करतो. हा आपल्या अर्थव्यवस्थेवर फार मोठा बोजा आहे. आपल्या देशात कोलबेड मिथेन (सीबीएम), शेलगॅस आणि गॅस हायड्रेड्सचे भरपूर साठे आहेत. पण अजून आपण त्या साठ्यांचा उपयोगही करायला सुरुवात केलेली नाही. अमेरिकेमध्ये एकट्या शेलगॅसपासून इंधनाची ८० टक्के गरज भागविली जाते. पाकिस्तानसारख्या देशातही शेलगॅसपासून इंधन बनविणे सुरू झाले आहे. भारतातही हे घडायला हवे. आपल्याला क्रुड आॅइलसाठी मध्य-पूर्वेतील देशांवर अवलंबून राहावे लागत असल्याने आपली अर्थव्यवस्था पांगळी झाली आहे. त्यामुळे इंधनाच्या बाबतीत आपल्याला स्वयंपूर्ण होणे अत्यावश्यक आहे.गेल्या वर्षीपासून आपण ‘मेक इन इंडिया’चा उद्घोष करतो आहोत. पण ‘मेक इन इंडिया’ची खरी गरज देशाच्या संरक्षणासाठी आहे. सैन्याला जी शस्त्रे, दारूगोळा लागतो त्या सामग्रीमध्ये स्वयंपूर्णता मिळविण्यासाठी त्याचा वापर व्हायला पाहिजे. आपले दोन शेजारी पाकिस्तान आणि चीन हे भारताचे मोठे शत्रू आहेत, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. आज जवळपास सगळी संरक्षण उत्पादने आयात केली जात असून, त्यावर हजारो कोटी रुपये खर्च होतो. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे शेती आणि उद्योग या क्षेत्रांत गतिमानता आणण्यासाठी आपल्याला पाण्याचे व्यवस्थापन करावे लागणार आहे. आपल्या देशात मुबलक पाणी आहे. सुपीक जमीन आहे, सूर्यप्रकाश आहे आणि मनुष्यबळही आहे. इतर देशांच्या तुलनेत ही भारतासाठी खूप मोठी पर्वणी आहे. कारण कोणत्याच देशाजवळ शेतीसाठी एवढी आदर्श परिस्थिती नाही. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण नद्या जोडण्याची गोष्ट करीत आहोत, पण अजूनही ही योजना कागदावरच राहिली आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे आमच्या नेत्यांमध्ये असलेला राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हे आहे. नद्यांना जोडण्याचे एक काम आपण करू शकलो तरी देशात एकाच वेळी कृषी आणि औद्योगिक क्रांती घडवून आणता येईल. विशेष म्हणजे त्यानंतर आपल्याला युनोच्या दारात उभे राहण्याची गरज भासणार नाही. उलट सर्व जग भारताकडे खाद्यान्न, क्रुड आॅइल, नैसर्गिक वायू, प्रशिक्षित मनुष्यबळ, संरक्षण सामग्रीसाठी आणि सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे आध्यात्मिकता यासाठी आशेने पाहू लागेल. विदर्भात रेंगाळलेले सर्व सिंचन प्रकल्प प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. पश्चिम महाराष्ट्र, पंजाब या प्रदेशांमध्ये कृषी क्रांती केवळ सिंचनामुळे झाली. ती विदर्भातही व्हायला हवी. याचबरोबर औद्योगिक क्रांतीसाठी विदर्भात सवलतीच्या दरात वीज देणे आवश्यक आहे. विदर्भात जमीन, जंगल, खनिजसंपदा मुबलक प्रमाणात आहे. स्वस्त वीज मिळाली तर त्यातून औद्योगिक क्रांती घडू शकेल. हवेतर विदर्भासाठी वेगळी वीज वितरण कंपनी करण्याची तयारी सरकारने ठेवली पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागपूरच्या ‘मिहान’मध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आपण उभ्या केल्या, पण अद्याप त्याचा उपयोगच झाला नाही. परिणामी हा एवढा मोठा प्रकल्प निरुपयोगी ठरला.

(लेखक हे संरक्षण सामग्री क्षेत्रातील उद्योगपती आहेत.)