शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
5
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
6
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
7
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
8
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
9
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
10
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
11
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
12
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
13
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
14
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
15
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
16
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
17
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
18
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
19
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती

आरोग्य क्षेत्रात क्रांती व्हावी

By admin | Updated: August 9, 2015 03:15 IST

आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवून आणायची असल्यास त्यासाठी करोडोंनी पैसा, जास्त मनुष्यबळ खर्ची पाडून क्रांती होईल, ही अपेक्षा बाळगणे योग्य नाही. ‘तुज आहे तुजपाशी’ अशी स्थिती सध्या आहे.

- डॉ. रवी अभ्यंकर

आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवून आणायची असल्यास त्यासाठी करोडोंनी पैसा, जास्त मनुष्यबळ खर्ची पाडून क्रांती होईल, ही अपेक्षा बाळगणे योग्य नाही. ‘तुज आहे तुजपाशी’ अशी स्थिती सध्या आहे. वैद्यकीय क्षेत्रात क्रांती होण्याची आवश्यकता आहे, पण त्यासाठी प्रत्येकाने स्वत:पासून सुरुवात करण्याची गरज आहे. प्रत्येकाला आरोग्य सुविधा मिळण्याचा अधिकार आहे. पण अजूनही तो ग्रामीण भागातील व्यक्तींना, गरीब व्यक्तींना मिळत नाही. सर्दी, ताप, खोकल्यासारख्या साध्या आजारापासून ते मलेरिया, टीबीसारख्या आजारांसाठी उपचार उपलब्ध नाहीत. एका बाजूला ही परिस्थिती असताना दुसरीकडे वैद्यकीय क्षेत्रात येणाऱ्या नवीन तंत्रज्ञानामुळे प्रगतीची उंच शिखरे गाठली आहेत. हायटेक ट्रीटमेंटच्या माध्यमातून अनेक दुर्धर आजारांवर उपचार केले जात आहेत. सध्या भारतात मेंदूत इलेक्ट्रोड बसवणे, स्टेम सेल थेरपीचा वापर करणे अशा अत्याधुनिक उपचार पद्धती वापरल्या जात आहेत. पण या उपचारांसाठी येणारा खर्च सामान्यांना परवडण्यासारखा नाही. अत्याधुनिक उपचारपद्धती रास्त दरात सर्वांना उपलब्ध व्हावी, तळागाळातील लोकांपर्यंत ही उपचारपद्धती पोचावी, यासाठी सरकारने विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. क्युबासारख्या छोट्या देशात सर्वांना मोफत उपचार दिले जातात. आपल्याकडे अशी पद्धती राबवता येईल की नाही, हे सांगता येत नाही. पण त्यादृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे. सध्या उपचारांसाठी पैसे जास्त खर्च होतात. हे टाळण्यासाठी स्वत:पासून सुरुवात केली पाहिजे. आजारी पडणेच आपल्याला टाळता आले पाहिजे. औषधोपचार रास्त दरात सर्वांना उपलब्ध झाल्यास वैद्यकीय क्षेत्रात क्रांती होईल. कारण यामुळे सर्वांना अत्याधुनिक औषधोपचार मिळतील. त्यांचा हक्क त्यांना मिळेल.

(लेखक मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)