शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

निरक्षरांना मज्जाव

By admin | Updated: December 10, 2015 23:45 IST

लोकशाहीमध्ये निरक्षरांना स्थान नाही, जे लोकांचे प्रतिनिधित्व करु इच्छितात त्यांना किमान अक्षरओळख तरी असली पाहिजे असा विचार करुन ग्राम पातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

लोकशाहीमध्ये निरक्षरांना स्थान नाही, जे लोकांचे प्रतिनिधित्व करु इच्छितात त्यांना किमान अक्षरओळख तरी असली पाहिजे असा विचार करुन ग्राम पातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत साक्षरतेची अर्हता अनिवार्य करण्याचे हरयाणासारख्या राज्याला सुचावे याचे खरे तर कौतुकच केले पाहिजे. त्या राज्याने त्याकरिता संबंधित निवडणूक कायद्यात बदल केले खरे पण त्या बदलांना थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले. परंतु हे आव्हान फेटाळून लावून सर्वोच्च न्यायालयाने अगोदरच हरयाणा राज्याचे एकप्रकारे अभिनंदन केले आहे. पंचायत राज निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांच्या घरात स्वच्छतागृह अनिवार्य करण्याच्या सुधारणेसही न्यायालयाने मान्यता दिली आहे. पुरुषांकरिता दहावी उत्तीर्ण, महिलांसाठी आठवी उत्तीर्ण आणि मागासवर्गीयांकरिता पाचवी पास इतकीच मर्यादित अनिवार्यता या कायद्यात समाविष्ट केली गेली आहे. पण तिला विरोध करणाऱ्या याचिककर्त्यांच्या मते ही अनिवार्यता लागू केली तर ग्रामीण विभगातील किमान ८३ तर शहरी विभागातील ६७ टक्के महिला निवडणूक लढविण्यास अपात्र ठरुन निवडणुकीपासून वंचित राहतील. हरयाणा सरकारने कायद्यातील दुरुस्तीद्वारे कृषी कर्जे थकविणाऱ्या आणि वीज देयकांचा भरणा न करणाऱ्यांनाही निवडणुकीपासून दूर ठेवले आहे. याचिकाकर्त्यांच्या मते हरयाणा राज्य मूलत: कृषीप्रधान असल्याने व राज्य तसेच केन्द्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शिक्षणाची आबाळ होतानाच कर्जांची वेळच्या वेळी परतफेड करणेदेखील दुरापास्तच आहे. न्यायालयाने मात्र हा युक्तिवाद अग्राह्य ठरविला आहे. पंचायतींचा कारभार निरक्षरांच्या हाती सोपविणे म्हणजे संबंधित गावावर अन्याय करण्यासारखेच ठरु शकते. वास्तविक पाहता जे हरयाणा सरकारने केले त्याचे अनुकरण देशातील अन्य राज्यांनीदेखील करण्याची आज गरज आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या ६८ वर्षानंतरही किमान साक्षरतेचा आग्रह धरायचा नाही तर मग तो केव्हां धरायचा? अवजड वाहतूक करणारी वाहने चालविण्याच्या परवान्यासाठी राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना अशीच किमान शिक्षणाची अट लागू केली, तेव्हां संघटित झुंडशाहीच्या जोरावर ती जशी हाणून पाडली गेली, तसा प्रकार हरयाणाच्या बाबतीत होऊ नये म्हणजे मिळविली.