शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

विकासासोबत माणुसकी जागविण्याचा संकल्प गरजेचा

By किरण अग्रवाल | Updated: December 31, 2023 11:32 IST

New Year : २०२३ ला निरोप देऊन २०२४ चे स्वागत करतानाही तेच करायला हवे.

- किरण अग्रवाल

नव्या वर्षाचे स्वागत व संकल्प करताना सरणाऱ्या वर्षात अमूक तमूक राहून गेल्याचे उसासे टाकले जातात खरे, पण सकारात्मकतेने बघायचे तर; न झालेल्यापेक्षा झालेल्या गोष्टीच लक्षात घेतल्याने पुढचा प्रवास आश्वासक होण्यास मदत होते. २०२३ ला निरोप देऊन २०२४ चे स्वागत करतानाही तेच करायला हवे.

काळ लोटतो, तसे काही संदर्भही बदलत जातात. ते अपरिहार्यही असते. परिवर्तनशीलता ही सर्वच बाबतीत लागू होणारी बाब आहे. वर्ष बदलते तेव्हा कॅलेंडरच्या पानाबरोबर आपल्या आयुष्यात काय घडले, समाजजीवन कुठे होते व कुठे पोहोचले अशा बाबींचेही आत्मपरीक्षण करायला हवे. संस्था, आस्थापनांचे वर्धापनदिन आपण साजरे करतो त्यावेळी आपण जसा काल, आज व उद्याचा लेखाजोखा मांडतो; तसे वर्ष सरताना व्हायला हवे, पण अलीकडे अपवाद वगळता टीव्हीवरच्या अवॉर्डस् शोजमध्ये करमणूक शोधणारा व हॉटेल्समध्ये जाऊन ''एन्जॉय'' करणाराच वर्ग वाढताना दिसतो.

 

कुटुंबातील विभक्तता अलीकडे जशी वाढीस लागली आहे तसे मनामनातील एकारलेपणही पुढे येताना दिसत आहे. मी व माझ्यातल्या गुंतलेपणातून ही स्वमग्नता आकारास येते आहे. यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधणे गरजेचे आहे. नववर्षाचा संकल्प करताना काही जण जसे नुकसानकारक अगर वाईट सवयी सोडण्याचा संकल्प करतात, त्याच पद्धतीने या एकारलेपणातून कसे बाहेर पडता येईल हे बघायला हवे. आज प्रत्येकाच्या हाती मोबाईल आहे, प्रत्येक जण सोशल मीडियावर सक्रिय असतो; पण तो खरंच सोशल होऊ शकला का हा प्रश्नच ठरावा.

 

सर्वच बाबतीत परिवर्तन घडून येत आहे, पण सामान्यांच्या मानसिकतेचे परिवर्तन घडायला हवे. सामाजिक जाणिवेचे भान जागायला हवे. साऱ्या अपेक्षा सरकार वा यंत्रणांकडून ठेवताना माणूस म्हणून आपण आपली भूमिका कशी निभावतो, हेदेखील बघायला हवे. ते जेव्हा बघितले जाईल तेव्हा राहून गेलेले कमी व घडून आलेले अधिक दिसून आल्याखेरीज राहणार नाही. त्यादृष्टीने बघता गेल्या काळात बरंच काही बदललंय व बदलतंय. आपले शहर, परिसर तेथील व्यवस्था बदलताहेत. नवनव्या गोष्टी साकारताहेत. शासन आपल्या गतीने व पद्धतीने विकास करीतच आहे. सार्वजनिक स्वरूपातील रस्ते, पाण्यापासून ते व्यक्तिगत लाभाच्या योजनांवर कोट्यवधी खर्च केले जात आहेत. दुर्बल घटकासाठी मोफत रेशन, निराधारांना अर्थसाहाय्य ते एसटीमध्ये महिला भगिनींना अर्धे तिकीट दरासारख्या मदतीच्या अनेक योजना सुरू आहेत. हे सारे लोकोपयोगीच आहे.

 

सरत्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात आपण या भूमीतील संत गाडगेबाबा व संत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादनाचे कार्यक्रम केलेत. हे करीत असताना त्यांच्या विचारांचा जो जागर घडून आला तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविला गेला पाहिजे. एकीकडे चांद्रयान मोहिमेच्या यशस्वीतेचा आनंद साजरा करीत असताना दुसरीकडे समाज पारंपरिक अंधश्रद्धीय, अवैज्ञानिक जळमटांमध्ये अडकून असेल तर वैज्ञानिक जाणिवा रुजविण्यासाठी पुढे यायला हवे. संत तुकडोजींनी आपल्याला ग्रामगीता दिली, तर गाडगेबाबांनी ग्राम स्वच्छतेचे महत्त्व सांगितले; या बाबींचा जागर घडवायला हवा. सामाजिक उत्तरदायित्वाच्या कर्तव्य भावनेचाही संकल्प करायला हवा.

सारांशात, सरत्या वर्षात काय राहून गेले या चर्चेत अडकून न राहता जे साकारले गेले त्याचा आनंद व समाधान मनी ठेवून नव्या वर्षातील पुढची वाटचाल करण्यासाठी सज्ज व सिद्ध होऊया. हातात हात घेऊन विकासाचा रथ पुढे नेताना माणुसकीचा गहिवर जपण्यासाठीही संकल्पबद्ध होत नववर्षाचे स्वागत करूया...