शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

विकासासोबत माणुसकी जागविण्याचा संकल्प गरजेचा

By किरण अग्रवाल | Updated: December 31, 2023 11:32 IST

New Year : २०२३ ला निरोप देऊन २०२४ चे स्वागत करतानाही तेच करायला हवे.

- किरण अग्रवाल

नव्या वर्षाचे स्वागत व संकल्प करताना सरणाऱ्या वर्षात अमूक तमूक राहून गेल्याचे उसासे टाकले जातात खरे, पण सकारात्मकतेने बघायचे तर; न झालेल्यापेक्षा झालेल्या गोष्टीच लक्षात घेतल्याने पुढचा प्रवास आश्वासक होण्यास मदत होते. २०२३ ला निरोप देऊन २०२४ चे स्वागत करतानाही तेच करायला हवे.

काळ लोटतो, तसे काही संदर्भही बदलत जातात. ते अपरिहार्यही असते. परिवर्तनशीलता ही सर्वच बाबतीत लागू होणारी बाब आहे. वर्ष बदलते तेव्हा कॅलेंडरच्या पानाबरोबर आपल्या आयुष्यात काय घडले, समाजजीवन कुठे होते व कुठे पोहोचले अशा बाबींचेही आत्मपरीक्षण करायला हवे. संस्था, आस्थापनांचे वर्धापनदिन आपण साजरे करतो त्यावेळी आपण जसा काल, आज व उद्याचा लेखाजोखा मांडतो; तसे वर्ष सरताना व्हायला हवे, पण अलीकडे अपवाद वगळता टीव्हीवरच्या अवॉर्डस् शोजमध्ये करमणूक शोधणारा व हॉटेल्समध्ये जाऊन ''एन्जॉय'' करणाराच वर्ग वाढताना दिसतो.

 

कुटुंबातील विभक्तता अलीकडे जशी वाढीस लागली आहे तसे मनामनातील एकारलेपणही पुढे येताना दिसत आहे. मी व माझ्यातल्या गुंतलेपणातून ही स्वमग्नता आकारास येते आहे. यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधणे गरजेचे आहे. नववर्षाचा संकल्प करताना काही जण जसे नुकसानकारक अगर वाईट सवयी सोडण्याचा संकल्प करतात, त्याच पद्धतीने या एकारलेपणातून कसे बाहेर पडता येईल हे बघायला हवे. आज प्रत्येकाच्या हाती मोबाईल आहे, प्रत्येक जण सोशल मीडियावर सक्रिय असतो; पण तो खरंच सोशल होऊ शकला का हा प्रश्नच ठरावा.

 

सर्वच बाबतीत परिवर्तन घडून येत आहे, पण सामान्यांच्या मानसिकतेचे परिवर्तन घडायला हवे. सामाजिक जाणिवेचे भान जागायला हवे. साऱ्या अपेक्षा सरकार वा यंत्रणांकडून ठेवताना माणूस म्हणून आपण आपली भूमिका कशी निभावतो, हेदेखील बघायला हवे. ते जेव्हा बघितले जाईल तेव्हा राहून गेलेले कमी व घडून आलेले अधिक दिसून आल्याखेरीज राहणार नाही. त्यादृष्टीने बघता गेल्या काळात बरंच काही बदललंय व बदलतंय. आपले शहर, परिसर तेथील व्यवस्था बदलताहेत. नवनव्या गोष्टी साकारताहेत. शासन आपल्या गतीने व पद्धतीने विकास करीतच आहे. सार्वजनिक स्वरूपातील रस्ते, पाण्यापासून ते व्यक्तिगत लाभाच्या योजनांवर कोट्यवधी खर्च केले जात आहेत. दुर्बल घटकासाठी मोफत रेशन, निराधारांना अर्थसाहाय्य ते एसटीमध्ये महिला भगिनींना अर्धे तिकीट दरासारख्या मदतीच्या अनेक योजना सुरू आहेत. हे सारे लोकोपयोगीच आहे.

 

सरत्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात आपण या भूमीतील संत गाडगेबाबा व संत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादनाचे कार्यक्रम केलेत. हे करीत असताना त्यांच्या विचारांचा जो जागर घडून आला तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविला गेला पाहिजे. एकीकडे चांद्रयान मोहिमेच्या यशस्वीतेचा आनंद साजरा करीत असताना दुसरीकडे समाज पारंपरिक अंधश्रद्धीय, अवैज्ञानिक जळमटांमध्ये अडकून असेल तर वैज्ञानिक जाणिवा रुजविण्यासाठी पुढे यायला हवे. संत तुकडोजींनी आपल्याला ग्रामगीता दिली, तर गाडगेबाबांनी ग्राम स्वच्छतेचे महत्त्व सांगितले; या बाबींचा जागर घडवायला हवा. सामाजिक उत्तरदायित्वाच्या कर्तव्य भावनेचाही संकल्प करायला हवा.

सारांशात, सरत्या वर्षात काय राहून गेले या चर्चेत अडकून न राहता जे साकारले गेले त्याचा आनंद व समाधान मनी ठेवून नव्या वर्षातील पुढची वाटचाल करण्यासाठी सज्ज व सिद्ध होऊया. हातात हात घेऊन विकासाचा रथ पुढे नेताना माणुसकीचा गहिवर जपण्यासाठीही संकल्पबद्ध होत नववर्षाचे स्वागत करूया...