शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

विकासासोबत माणुसकी जागविण्याचा संकल्प गरजेचा

By किरण अग्रवाल | Updated: December 31, 2023 11:32 IST

New Year : २०२३ ला निरोप देऊन २०२४ चे स्वागत करतानाही तेच करायला हवे.

- किरण अग्रवाल

नव्या वर्षाचे स्वागत व संकल्प करताना सरणाऱ्या वर्षात अमूक तमूक राहून गेल्याचे उसासे टाकले जातात खरे, पण सकारात्मकतेने बघायचे तर; न झालेल्यापेक्षा झालेल्या गोष्टीच लक्षात घेतल्याने पुढचा प्रवास आश्वासक होण्यास मदत होते. २०२३ ला निरोप देऊन २०२४ चे स्वागत करतानाही तेच करायला हवे.

काळ लोटतो, तसे काही संदर्भही बदलत जातात. ते अपरिहार्यही असते. परिवर्तनशीलता ही सर्वच बाबतीत लागू होणारी बाब आहे. वर्ष बदलते तेव्हा कॅलेंडरच्या पानाबरोबर आपल्या आयुष्यात काय घडले, समाजजीवन कुठे होते व कुठे पोहोचले अशा बाबींचेही आत्मपरीक्षण करायला हवे. संस्था, आस्थापनांचे वर्धापनदिन आपण साजरे करतो त्यावेळी आपण जसा काल, आज व उद्याचा लेखाजोखा मांडतो; तसे वर्ष सरताना व्हायला हवे, पण अलीकडे अपवाद वगळता टीव्हीवरच्या अवॉर्डस् शोजमध्ये करमणूक शोधणारा व हॉटेल्समध्ये जाऊन ''एन्जॉय'' करणाराच वर्ग वाढताना दिसतो.

 

कुटुंबातील विभक्तता अलीकडे जशी वाढीस लागली आहे तसे मनामनातील एकारलेपणही पुढे येताना दिसत आहे. मी व माझ्यातल्या गुंतलेपणातून ही स्वमग्नता आकारास येते आहे. यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधणे गरजेचे आहे. नववर्षाचा संकल्प करताना काही जण जसे नुकसानकारक अगर वाईट सवयी सोडण्याचा संकल्प करतात, त्याच पद्धतीने या एकारलेपणातून कसे बाहेर पडता येईल हे बघायला हवे. आज प्रत्येकाच्या हाती मोबाईल आहे, प्रत्येक जण सोशल मीडियावर सक्रिय असतो; पण तो खरंच सोशल होऊ शकला का हा प्रश्नच ठरावा.

 

सर्वच बाबतीत परिवर्तन घडून येत आहे, पण सामान्यांच्या मानसिकतेचे परिवर्तन घडायला हवे. सामाजिक जाणिवेचे भान जागायला हवे. साऱ्या अपेक्षा सरकार वा यंत्रणांकडून ठेवताना माणूस म्हणून आपण आपली भूमिका कशी निभावतो, हेदेखील बघायला हवे. ते जेव्हा बघितले जाईल तेव्हा राहून गेलेले कमी व घडून आलेले अधिक दिसून आल्याखेरीज राहणार नाही. त्यादृष्टीने बघता गेल्या काळात बरंच काही बदललंय व बदलतंय. आपले शहर, परिसर तेथील व्यवस्था बदलताहेत. नवनव्या गोष्टी साकारताहेत. शासन आपल्या गतीने व पद्धतीने विकास करीतच आहे. सार्वजनिक स्वरूपातील रस्ते, पाण्यापासून ते व्यक्तिगत लाभाच्या योजनांवर कोट्यवधी खर्च केले जात आहेत. दुर्बल घटकासाठी मोफत रेशन, निराधारांना अर्थसाहाय्य ते एसटीमध्ये महिला भगिनींना अर्धे तिकीट दरासारख्या मदतीच्या अनेक योजना सुरू आहेत. हे सारे लोकोपयोगीच आहे.

 

सरत्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात आपण या भूमीतील संत गाडगेबाबा व संत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादनाचे कार्यक्रम केलेत. हे करीत असताना त्यांच्या विचारांचा जो जागर घडून आला तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविला गेला पाहिजे. एकीकडे चांद्रयान मोहिमेच्या यशस्वीतेचा आनंद साजरा करीत असताना दुसरीकडे समाज पारंपरिक अंधश्रद्धीय, अवैज्ञानिक जळमटांमध्ये अडकून असेल तर वैज्ञानिक जाणिवा रुजविण्यासाठी पुढे यायला हवे. संत तुकडोजींनी आपल्याला ग्रामगीता दिली, तर गाडगेबाबांनी ग्राम स्वच्छतेचे महत्त्व सांगितले; या बाबींचा जागर घडवायला हवा. सामाजिक उत्तरदायित्वाच्या कर्तव्य भावनेचाही संकल्प करायला हवा.

सारांशात, सरत्या वर्षात काय राहून गेले या चर्चेत अडकून न राहता जे साकारले गेले त्याचा आनंद व समाधान मनी ठेवून नव्या वर्षातील पुढची वाटचाल करण्यासाठी सज्ज व सिद्ध होऊया. हातात हात घेऊन विकासाचा रथ पुढे नेताना माणुसकीचा गहिवर जपण्यासाठीही संकल्पबद्ध होत नववर्षाचे स्वागत करूया...