शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

संकल्प, साधने व सिद्धी! पंचवीस वर्षांच्या भारताच्या प्रवासाची सूचक मांडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 09:36 IST

थोडक्यात पंतप्रधान मोदींनी सोडलेला संकल्प, या संकल्पाच्या सिद्धीची साधने आणि अमृतकाळातील साध्य यावर गृहमंत्र्यांनी केलेली मांडणी पुढील पंचवीस वर्षांच्या भारताच्या प्रवासाचे सूचक आहे.

तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान देशाचे गृहमंत्री, भारतीय जनता पक्षाचे मुख्य धोरणकर्ते अमित शाह यांनी केलेली भाषणे, त्यातून दिलेला संदेश केवळ हे राज्यच नव्हे तर देशाच्या भविष्यातील वाटचालीचे पुरेसे स्पष्ट असा संकेत देणारा आहे. विधानसभेच्या दोन पोटनिवडणुकींचा प्रचार सुरू असल्याने पुणे, कोल्हापूर भागातील त्यांची भाषणे साहजिकच राजकीय राहिली. सहकारमंत्री म्हणून पुण्यात त्यांनी मांडलेल्या मतांनाही राजकीय संदर्भ आहेतच. ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा यांची जन्मशताब्दी आणि नागपूर ‘लोकमत’चा सुवर्णमहोत्सव यानिमित्ताने नागपुरात आयोजित विशेष साेहळ्यातील त्यांची मांडणी मात्र राजकारणाच्या पलीकडची, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व शताब्दी या अमृतकाळाच्या वाटचालीचे नेमके सूचन करणारी होती.

२०४७ साली भारत सर्वच क्षेत्रांमध्ये जगात श्रेष्ठ ठरावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडलेला संकल्प हरित ऊर्जा, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा ध्यास आणि समस्त देशवासीयांनी एक मन, एक दिशा व एक लक्ष्य ठरवून छोटे-छोटे संकल्प साकारले तरी देश सर्वश्रेष्ठ झाल्याशिवाय राहणार नाही, हा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला. देश केवळ सरकारमुळे महान होत नाही, तर जनतेची साथ असावी लागते. तेव्हा, वीज-पाणी वाचविण्यापासून ते वाहतुकीचे नियम पाळणे, माता-पिता व ज्येष्ठांचा सन्मान राखणे, अशा मार्गाने एकशे तीस कोटी भारतीयांनी एकेक पाऊल टाकले तरी श्रेष्ठतेच्या दिशेने कोट्यवधी पावले पडतील, असे आवाहन शाह यांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावरून देशवासीयांना केले.

प्रगतीचा मार्ग कायदा, सुव्यवस्थेतून, सामाजिक सौहार्द व स्थैर्यातून जातो. गृहमंत्री या नात्याने शाह त्यांनी जम्मू-काश्मीर, ईशान्य भारत आणि मध्य भारतातील माओवादी उच्छादाचा आढावा घेतला. राज्यघटनेचे ३७० कलम हटविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर टीका झाली. अजूनही सुरू आहे. ‘रक्ताचे पाट वाहतील’ या धमकीतला पाेकळपणा गृहमंत्र्यांनी ‘साधा गोटादेखील मारला गेला नाही,’ या शब्दात मांडला. वर्षभरात विक्रमी १ कोटी ७० लाख पर्यटकांनी भेट दिली म्हणजेच काश्मीर शांत आहे. ईशान्य भारतात आठ हजारांवर तरुण शस्त्रे टाकून मुख्य प्रवाहात आले. लष्करी व निमलष्करी दलांना विशेष संरक्षण देणारा अफस्पा कायदा हटविण्याच्या मुद्द्यावरील राजकीय मतांतरांचा उल्लेख शाह यांनी केला आणि हिंसाचार कमी झाल्यामुळे साठ टक्के भागात नैसर्गिकरीत्या त्या दलांऐवजी पोलिसच कायदा, सुव्यवस्था सांभाळत असल्याचे सांगितले.

गृहमंत्री शाह नागपूरमध्ये बोलत असल्याने विदर्भातील गडचिरोलीचा काही भाग वगळता माओवाद्यांचे अस्तित्व संपुष्टात आल्याचा उल्लेख स्वाभाविक होता. छत्तीसगडमधील बस्तरचा भाग वगळता झारखंड, मध्य प्रदेश व बिहारमधून माओवाद्यांचा हिंसाचार पूर्णपणे आटोक्यात आल्याचे सांगून त्यांनी उरलेल्या भागातही आपली संरक्षण दलेच विजयी होतील, अशा विश्वास व्यक्त केला. थोडक्यात पंतप्रधान मोदींनी सोडलेला संकल्प, या संकल्पाच्या सिद्धीची साधने आणि अमृतकाळातील साध्य यावर गृहमंत्र्यांनी केलेली मांडणी पुढील पंचवीस वर्षांच्या भारताच्या प्रवासाचे सूचक आहे.

शाह यांनी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि ‘लोकमत’च्या सुवर्ण महोत्सवी यशाचे गमक नेमकेपणाने मांडले. राजकीय-सामाजिक भूमिका व पत्रकारितेचा धर्म, व्यवसाय अशी बहुपेढी जबाबदारी पार पाडताना मूल्ये आणि परिस्थितीचा रेटा यातून एकाची निवड करण्याचे प्रसंग काेणाच्याही आयुष्यात दोन-तीन वेळाच येतात. त्यावेळी जे मूल्ये जपतात ते महान असतात. वृत्तपत्राचा धर्म पाळताना बाबूजींनी ते क्षण साधले, ही शाह यांनी सांगितलेली कसोटी सगळ्याच थोरांच्या कारकिर्दीसाठी वापरता येईल. पाया मजबूत असेल तरच एखादी संस्था यशस्वीरीत्या पन्नास वर्षे पूर्ण करते. सत्त्व, साहस व सातत्य या त्रिसूत्रीमुळेच ‘लोकमत’ यशस्वी झाला, हे त्यांनी सांगितले. शाह यांना भावलेली, त्यांनी जाहीरपणे बोलून दाखविलेली गोष्ट म्हणजे या सोहळ्याच्या निमित्ताने प्रारंभीपासून संपादकीय, वितरण, प्रसार, निर्मिती अशा ‘लोकमत’च्या विविध विभागांची जबाबदारी सांभाळणाऱ्या ज्येष्ठांचा सन्मान. मंदिराच्या कळसाचे तेज साजरे करताना पहिल्या पायरीचे दगड पूजायला हवेत, ही या सत्कारामागे ‘लोकमत’ची भावना होती. ती भावल्याचे गृहमंत्र्यांनी भारावून सांगितले. त्यांच्या या सद्भावनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच हे संस्कार, परंपरा पुढेही जपण्याचा शब्द आम्ही विनम्रपणे त्यांच्यासह सर्व हितचिंतकांना देतो.