शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

बालहक्क रक्षणाचा संकल्प करू या..!

By admin | Updated: January 1, 2015 02:53 IST

२०१४चे नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी ३५ वर्षांपूर्वी ‘बचपन बचाओ’ आंदोलनाची सुरुवात केली. बालमजुरीला मूठमाती देण्याच्या कार्यासाठी त्यांनी जीवन वेचले.

२०१४चे नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी ३५ वर्षांपूर्वी ‘बचपन बचाओ’ आंदोलनाची सुरुवात केली. बालमजुरीला मूठमाती देण्याच्या कार्यासाठी त्यांनी जीवन वेचले. या कार्यात त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. तसेच त्यांना अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संस्थांचे साहाय्यही मिळाले. सत्यार्थी सध्या १४४ देशांत काम करणाऱ्या ‘ग्लोबल मार्च अगेन्स्ट चाइल्ड लेबर’ या संस्थेचे सहसंस्थापक आहेत.बालमजुरी ही देशातील फार मोठी समस्या आहे. तिचे निवारण करण्यासाठी आपण सर्वांनी संघटित व्हावे. नव्या वर्षात बालहक्कांच्या संरक्षणाचा संकल्प करावा. मी स्वत: तर बालमजुरी पूर्णत: इतिहासजमा केल्याविना मुळीच उसंत न घेण्याचा दृढनिश्चय केला आहे.बालमजुरी हा देशाला काळिमा आहे आणि तो नष्ट करण्यात होणाऱ्या दिरंगाईमुळे अनेकांचे बालपण कुस्करले जात आहे. लहान मुलांचे शोषण हेच देशातील गरिबीचे मुख्य कारण आहे आणि दर्जेदार शिक्षणानेच त्यावर मात करता येऊ शकते. बालमजुरी सुधारणा विधेयक २०१२, संसदेत दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. या विलंबामुळे देशातील लक्षवधी मुलांचे बाल्य नैराश्याच्या दिशेने जात आहे. हे विधेयक पारित झाल्यानंतर १४ वर्षे वयापर्यंतच्या कोणत्याही मुलाकडून कोणत्याही प्रकारची मजुरी करून घेणे आणि १८ वर्षांपर्यंतच्या मुलांकडून धोकादायक कामे करवून घेणे बेकायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे हे सुधारणा विधेयक बालमजुरीचे समूळ उच्चाटन करण्यास विशेष साहाय्यकारी ठरणारे आहे. जगभरातील सुमारे ७० देशांनी बालमजुरीविरोधातील आंतरराष्ट्रीय कायद्यांना संमती दिली आहे. ते याला कॉर्पोरेट - सामाजिक भागीदारीचाच एक भाग समजतात. आपल्या देशात किती बालमजूर असतील याच नेमका अंदाज बांधणे कठीण आहे. परंतु सुमारे ५० लाख बालक बेकायदेशीर कामांमध्ये गुंतलेले आहेत, ज्यामुळे त्यांचे बालपण उद्ध्वस्त होत आहे. ते वाचविण्याच्या कामी प्रत्येक भारतीयाने यथाशक्ती हातभार लावावा, असे आवाहन मी ‘लोकमत’च्या माध्यमातून करीत आहे. प्रतिसादाची अपेक्षा केवळ एका चांगल्या बदलाच्या हेतूपोटी आहे. (शब्दांकन : नितीन अग्रवाल)कैलाश सत्यार्थी