शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

बालहक्क रक्षणाचा संकल्प करू या..!

By admin | Updated: January 1, 2015 02:53 IST

२०१४चे नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी ३५ वर्षांपूर्वी ‘बचपन बचाओ’ आंदोलनाची सुरुवात केली. बालमजुरीला मूठमाती देण्याच्या कार्यासाठी त्यांनी जीवन वेचले.

२०१४चे नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी ३५ वर्षांपूर्वी ‘बचपन बचाओ’ आंदोलनाची सुरुवात केली. बालमजुरीला मूठमाती देण्याच्या कार्यासाठी त्यांनी जीवन वेचले. या कार्यात त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. तसेच त्यांना अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संस्थांचे साहाय्यही मिळाले. सत्यार्थी सध्या १४४ देशांत काम करणाऱ्या ‘ग्लोबल मार्च अगेन्स्ट चाइल्ड लेबर’ या संस्थेचे सहसंस्थापक आहेत.बालमजुरी ही देशातील फार मोठी समस्या आहे. तिचे निवारण करण्यासाठी आपण सर्वांनी संघटित व्हावे. नव्या वर्षात बालहक्कांच्या संरक्षणाचा संकल्प करावा. मी स्वत: तर बालमजुरी पूर्णत: इतिहासजमा केल्याविना मुळीच उसंत न घेण्याचा दृढनिश्चय केला आहे.बालमजुरी हा देशाला काळिमा आहे आणि तो नष्ट करण्यात होणाऱ्या दिरंगाईमुळे अनेकांचे बालपण कुस्करले जात आहे. लहान मुलांचे शोषण हेच देशातील गरिबीचे मुख्य कारण आहे आणि दर्जेदार शिक्षणानेच त्यावर मात करता येऊ शकते. बालमजुरी सुधारणा विधेयक २०१२, संसदेत दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. या विलंबामुळे देशातील लक्षवधी मुलांचे बाल्य नैराश्याच्या दिशेने जात आहे. हे विधेयक पारित झाल्यानंतर १४ वर्षे वयापर्यंतच्या कोणत्याही मुलाकडून कोणत्याही प्रकारची मजुरी करून घेणे आणि १८ वर्षांपर्यंतच्या मुलांकडून धोकादायक कामे करवून घेणे बेकायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे हे सुधारणा विधेयक बालमजुरीचे समूळ उच्चाटन करण्यास विशेष साहाय्यकारी ठरणारे आहे. जगभरातील सुमारे ७० देशांनी बालमजुरीविरोधातील आंतरराष्ट्रीय कायद्यांना संमती दिली आहे. ते याला कॉर्पोरेट - सामाजिक भागीदारीचाच एक भाग समजतात. आपल्या देशात किती बालमजूर असतील याच नेमका अंदाज बांधणे कठीण आहे. परंतु सुमारे ५० लाख बालक बेकायदेशीर कामांमध्ये गुंतलेले आहेत, ज्यामुळे त्यांचे बालपण उद्ध्वस्त होत आहे. ते वाचविण्याच्या कामी प्रत्येक भारतीयाने यथाशक्ती हातभार लावावा, असे आवाहन मी ‘लोकमत’च्या माध्यमातून करीत आहे. प्रतिसादाची अपेक्षा केवळ एका चांगल्या बदलाच्या हेतूपोटी आहे. (शब्दांकन : नितीन अग्रवाल)कैलाश सत्यार्थी