शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

पोलिसांच्या प्रतिष्ठेसाठी सर्वांनीच भान बाळगायला हवे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 07:35 IST

१९९२ व १९९३ साली मुंबईत झालेल्या दंगली आणि नंतर झालेले भयावह बॉम्बस्फोट या काळात मुंबईकर सुरक्षित राहिले, ते पोलिसांमुळेच.

कोरोनाच्या संकटामुळे मार्चच्या अखेरीपासून लाखो लोकांना घरातच बसून काम करावे लागत आहे, देशभरात कैक कोटी लोकांचा रोजगार गेला आहे. या आजाराचे केवळ आरोग्यावरच नव्हे, तर समाजस्वास्थ्यावर, अर्थव्यवस्थेवर, शिक्षणावर आणि दैनंदिन आयुष्यावर विपरीत परिणाम झाले आहेत. या काळात घरात बसावे लागल्याने लोक चिडले आहेत. मात्र मार्चपासून आजपर्यंत न चुकता रस्त्यांवर उभे राहून रोज आपले कर्तव्य बजावताना पोलिसांची जी बिकट अवस्था झाली आहे, त्याचा आपण फारसा विचार केलेला नाही. जेवणाची तर सोडाच; पण चहा मिळण्याची खात्री नसताना संसर्ग टाळण्यासाठी लोकांनी शारीरिक अंतर पाळावे यासाठी त्यांना आजही उन्हा-पावसात उभे राहावे लागत आहे. त्यामुळे राज्यातील ९७ हजारांपैकी २० हजारांहून अधिक पोलिसांनाच कोरोनाचा संसर्ग झाला आणि २०८ जणांचा तर बळीच गेला.

आतापर्यंत १६ हजार पोलीस बरे झाले असले तरी सर्वांना कामावर येणे अद्याप शक्य नाही. या पार्श्वभूमीवर पोलीस दलात आणखी १२ हजार ५२८ जणांची भरती करण्याचा जो निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, त्याचे स्वागतच करायला हवे. कोरोनाचे संकट किती काळ राहणार, हे सांगणे कठीण आहे. त्यातच कांदा निर्यातबंदीच्या विरोधात आणि मराठा आरक्षणासाठी लोक रस्त्यांवर उतरू लागले आहेत, इतर कारणांसाठीही आंदोलने होऊ लागली आहेत. आंदोलने असोत, अतिवृष्टी वा पूरपरिस्थिती असो वा गुन्हेगारी असो, सर्वांची भिस्त असते ती पोलिसांवरच. त्यामुळे ही पोलीस भरती लवकरात लवकर आणि अतिशय पारदर्शक पद्धतीने व्हायला हवी. अलीकडील काळातील ही सर्वात मोठी भरती आहे.

याआधी आर. आर. पाटील गृहमंत्री असताना मोठी पोलीस भरती झाली होती आणि मुख्य म्हणजे त्यात अजिबात वशिल्याचे तट्टू शिरले नव्हते. आताही सरकारने मंत्री, आमदार, नेते, कार्यकर्ते, अधिकारी यांच्या वशिलापत्रांना वा दबावाला बळी न पडता केवळ गुणवत्तेवर भरती करावी. पदवी, पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झालेले तरुण आता मिळेल ती नोकरी करायला तयार असतात. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक क्षमता तपासण्याबरोबर पोलीस दलात चांगले शिकलेले तरुण येतील, असा प्रयत्न करायला हवा. पोलिसांना कामाचे आठ तास आणि आठवड्यातून एक दिवस सुटी अशा घोषणा नेहमी होतात आणि अंमलबजावणी मात्र कधीच होत नाही.

या भरतीनंतर तरी ते होईल, अशी अपेक्षा आहे. कामाचा ताण, कित्येक तास काम, जेवणाची आबाळ, त्यामुळे मिळेल ते खाणे, त्यातून रक्तदाब, मधुमेह असे अनेक आजार, स्वत:ची आणि कुटुंबाची हेळसांड, राहायला घर नाही अशा अवस्थेत हजारो पोलीस कर्तव्ये पार पाडतात. त्यांच्याकडून समाजाच्या अपेक्षा प्रचंड असतात आणि सहानुभूती मात्र नसते. त्यामुळेच पोलिसांची बदनामी करण्याचे धाडस मुंबईशी संबंध नसलेली कंगना रानौतसारखी अभिनेत्री करते आणि आपणही गप्प बसून तिचे अप्रत्यक्ष समर्थन करतो. त्यावेळी अशोक कामटे, विजय साळसकर, हेमंत करकरे, तुकाराम ओंबाळे यांचे बलिदानही विसरतो. १९९२ व १९९३ साली मुंबईत झालेल्या दंगली आणि नंतर झालेले भयावह बॉम्बस्फोट या काळात मुंबईकर सुरक्षित राहिले, ते पोलिसांमुळेच.

आपल्याला केवळ संकटे आणि अडचणीच्या वेळीच पोलिसांची आठवण होते आणि एरवी मात्र सर्व पोलीस लाचखोर आहेत, हफ्ते गोळा करतात, अशी सरसकट विधाने आपण करीत राहतो. पोलिसांकडे गुन्हेगार म्हणून पाहण्याची ही वृत्ती भयावह आणि घातक आहे. ही यंत्रणा आपल्यासाठी आहे, तिची प्रतिष्ठा ही आपलीही जबाबदारी आहे, याचे भान सर्वांनीच बाळगायला हवे. तसे केले तरच पोलिसांमधील आत्मविश्वास वाढीस लागेल आणि त्यांची कार्यक्षमताही सुधारेल. पुरेसे मनुष्यबळ असेल तरच हे शक्य होते. त्यामुळे पोलीस भरतीचे स्वागत करताना त्यांचे इतर प्रश्नही सोडविले जातील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

टॅग्स :MumbaiमुंबईPoliceपोलिस