शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या प्रतिष्ठेसाठी सर्वांनीच भान बाळगायला हवे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 07:35 IST

१९९२ व १९९३ साली मुंबईत झालेल्या दंगली आणि नंतर झालेले भयावह बॉम्बस्फोट या काळात मुंबईकर सुरक्षित राहिले, ते पोलिसांमुळेच.

कोरोनाच्या संकटामुळे मार्चच्या अखेरीपासून लाखो लोकांना घरातच बसून काम करावे लागत आहे, देशभरात कैक कोटी लोकांचा रोजगार गेला आहे. या आजाराचे केवळ आरोग्यावरच नव्हे, तर समाजस्वास्थ्यावर, अर्थव्यवस्थेवर, शिक्षणावर आणि दैनंदिन आयुष्यावर विपरीत परिणाम झाले आहेत. या काळात घरात बसावे लागल्याने लोक चिडले आहेत. मात्र मार्चपासून आजपर्यंत न चुकता रस्त्यांवर उभे राहून रोज आपले कर्तव्य बजावताना पोलिसांची जी बिकट अवस्था झाली आहे, त्याचा आपण फारसा विचार केलेला नाही. जेवणाची तर सोडाच; पण चहा मिळण्याची खात्री नसताना संसर्ग टाळण्यासाठी लोकांनी शारीरिक अंतर पाळावे यासाठी त्यांना आजही उन्हा-पावसात उभे राहावे लागत आहे. त्यामुळे राज्यातील ९७ हजारांपैकी २० हजारांहून अधिक पोलिसांनाच कोरोनाचा संसर्ग झाला आणि २०८ जणांचा तर बळीच गेला.

आतापर्यंत १६ हजार पोलीस बरे झाले असले तरी सर्वांना कामावर येणे अद्याप शक्य नाही. या पार्श्वभूमीवर पोलीस दलात आणखी १२ हजार ५२८ जणांची भरती करण्याचा जो निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, त्याचे स्वागतच करायला हवे. कोरोनाचे संकट किती काळ राहणार, हे सांगणे कठीण आहे. त्यातच कांदा निर्यातबंदीच्या विरोधात आणि मराठा आरक्षणासाठी लोक रस्त्यांवर उतरू लागले आहेत, इतर कारणांसाठीही आंदोलने होऊ लागली आहेत. आंदोलने असोत, अतिवृष्टी वा पूरपरिस्थिती असो वा गुन्हेगारी असो, सर्वांची भिस्त असते ती पोलिसांवरच. त्यामुळे ही पोलीस भरती लवकरात लवकर आणि अतिशय पारदर्शक पद्धतीने व्हायला हवी. अलीकडील काळातील ही सर्वात मोठी भरती आहे.

याआधी आर. आर. पाटील गृहमंत्री असताना मोठी पोलीस भरती झाली होती आणि मुख्य म्हणजे त्यात अजिबात वशिल्याचे तट्टू शिरले नव्हते. आताही सरकारने मंत्री, आमदार, नेते, कार्यकर्ते, अधिकारी यांच्या वशिलापत्रांना वा दबावाला बळी न पडता केवळ गुणवत्तेवर भरती करावी. पदवी, पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झालेले तरुण आता मिळेल ती नोकरी करायला तयार असतात. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक क्षमता तपासण्याबरोबर पोलीस दलात चांगले शिकलेले तरुण येतील, असा प्रयत्न करायला हवा. पोलिसांना कामाचे आठ तास आणि आठवड्यातून एक दिवस सुटी अशा घोषणा नेहमी होतात आणि अंमलबजावणी मात्र कधीच होत नाही.

या भरतीनंतर तरी ते होईल, अशी अपेक्षा आहे. कामाचा ताण, कित्येक तास काम, जेवणाची आबाळ, त्यामुळे मिळेल ते खाणे, त्यातून रक्तदाब, मधुमेह असे अनेक आजार, स्वत:ची आणि कुटुंबाची हेळसांड, राहायला घर नाही अशा अवस्थेत हजारो पोलीस कर्तव्ये पार पाडतात. त्यांच्याकडून समाजाच्या अपेक्षा प्रचंड असतात आणि सहानुभूती मात्र नसते. त्यामुळेच पोलिसांची बदनामी करण्याचे धाडस मुंबईशी संबंध नसलेली कंगना रानौतसारखी अभिनेत्री करते आणि आपणही गप्प बसून तिचे अप्रत्यक्ष समर्थन करतो. त्यावेळी अशोक कामटे, विजय साळसकर, हेमंत करकरे, तुकाराम ओंबाळे यांचे बलिदानही विसरतो. १९९२ व १९९३ साली मुंबईत झालेल्या दंगली आणि नंतर झालेले भयावह बॉम्बस्फोट या काळात मुंबईकर सुरक्षित राहिले, ते पोलिसांमुळेच.

आपल्याला केवळ संकटे आणि अडचणीच्या वेळीच पोलिसांची आठवण होते आणि एरवी मात्र सर्व पोलीस लाचखोर आहेत, हफ्ते गोळा करतात, अशी सरसकट विधाने आपण करीत राहतो. पोलिसांकडे गुन्हेगार म्हणून पाहण्याची ही वृत्ती भयावह आणि घातक आहे. ही यंत्रणा आपल्यासाठी आहे, तिची प्रतिष्ठा ही आपलीही जबाबदारी आहे, याचे भान सर्वांनीच बाळगायला हवे. तसे केले तरच पोलिसांमधील आत्मविश्वास वाढीस लागेल आणि त्यांची कार्यक्षमताही सुधारेल. पुरेसे मनुष्यबळ असेल तरच हे शक्य होते. त्यामुळे पोलीस भरतीचे स्वागत करताना त्यांचे इतर प्रश्नही सोडविले जातील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

टॅग्स :MumbaiमुंबईPoliceपोलिस