शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

पुन्हा ‘संतोष’ जाहला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 14:21 IST

भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी पुन्हा एकदा राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हातावर बांधले

मिलिंद कुलकर्णीभुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी पुन्हा एकदा राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हातावर बांधले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर चौधरी यांनी घेतलेला हा निर्णय त्यांच्या निर्णयक्षमता, समयसुचकतेचा परिचय करुन देणारा आहे. पालिका निवडणुकीतील पराभवानंतर राजकीय पटलावरुन काहीसे बाजूला पडलेले चौधरी पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत, असाच याचा अर्थ आहे. एकेकाळी भुसावळ म्हणजे संतोष चौधरी असे समीकरण होते.स्थानिक नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे सदस्य, बाजार समिती, जिल्हा बँकेचे संचालकपद अशी सत्तेची सर्व पदे चौधरी यांच्या समर्थकांकडे असायची. जिल्हा नेते सुरेशदादा जैन आणि एकनाथराव खडसे यांनी एकत्र येऊन चौधरी यांची पालिकेतील सद्दी संपविण्यासाठी प्रयत्न करुनही यश मिळालेले नव्हते. चौधरी हे स्वत: पक्ष आहेत. ते ज्या पक्षात जातील, त्या पक्षाची सत्ता याठिकाणांवर येत असे. नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार अशा चढत्या क्रमाने पदे पादाक्रांत करणाऱ्या चौधरी यांनी शिवसेना, राष्टÑवादी, पुन्हा शिवसेना आणि पुन्हा राष्टÑवादी काँग्रेस व्हाया जनआधार पार्टी असा प्रवास केला. पदे न मिळाल्यास नेत्यांशी संघर्ष करुन पक्षबदल करण्याचा पायंडा चौधरी यांनी पाडला. पण निसर्गनियमानुसार प्रत्येकाचा काळ असतो. ठराविक काळानंतर मावळती येतेच तसेच झाले. भाजीविक्रीचा व्यवसाय करत असताना तारुण्यात ते शिवसेनेकडे आकर्षिले गेले. सेनेतून राजकीय कारकिर्द सुरु केल्यानंतर आमदारकीसाठी पक्षाने तिकीट नाकारल्यावर बंडखोरी केली. राष्टÑवादीत असताना मंत्रिपद दिले नाही, म्हणून पक्षनेतृत्वावर टीका करीत बंड पुकारले. परंतु वैशिष्टय असे की, पक्ष बदलला तरी कार्यकर्ते चौधरी यांच्यासोबत राहिले. काहींनी दगा दिला, पण त्यांनी पर्वा केली नाही. भुसावळ विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यावर चौधरी यांनी त्यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या संजय सावकारे यांना उमेदवारी दिली आणि निवडून आणले. मंत्रिपद न मिळाल्याने पक्षाविरुध्द बंड ठोकणाºया चौधरी यांच्याच समर्थक सावकारे यांना राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने राज्यमंत्रीपद व पालकमंत्रीपद दिले. जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार होता. त्यामुळे चौधरी यांनी २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला. सावकारे यांनीही भाजपामध्ये प्रवेश करुन आमदारकी टिकवली. एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वामुळे सावकारे यांनी पुढे पालिकेत भाजपाची सत्ता आणण्यात वाटा उचलला. चौधरी यांच्या सत्तेला सुरुंग लागला. सेनेत राहूनही त्यांनी पालिकेत जनआधार नावाच्या स्वत:च्या आघाडीमार्फत निवडणुका लढवल्या. आता राष्टÑवादीत पुन्हा प्रवेश करुन त्यांनी काय साधले, याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क केले जात आहे. त्यांचे धाकटे बंधू अनिल चौधरी यापूर्वीच भाजपामध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे २०१९ मध्ये सत्ता कुणाचीही आली तरी चौधरी बंधूंपैकी एक जण सत्ताधारी पक्षासोबत राहील, हे निश्चित. 

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव