शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
3
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
4
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
5
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
6
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
7
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
8
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
9
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
10
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
11
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
12
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
13
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
14
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
15
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
16
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
17
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
18
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
19
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
20
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर

Remdesivir Injection : रेमडेसिविरसाठी वणवण करण्याची वेळ का आली?

By अतुल कुलकर्णी | Updated: April 17, 2021 05:19 IST

Remdesivir Injection: हे इंजेक्शन म्हणजे संजीवनी नव्हे, असे तज्ज्ञ कळवळून सांगत आहेत. तरीही लोकांची वणवण संपत नाही आणि केंद्राचे मौन  सुटत नाही!

- अतुल कुलकर्णी(वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत)

काेरोनामुळे दवाखान्यात दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णाला रेमडेसिविर हवे आहे. रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिविरची इंजेक्शन घेऊन जातात व आमच्या पेशंटला हे द्या, असे सांगताना दिसतात. सरकारी हॉस्पिटलमध्ये या इंजेक्शनचा प्रोटोकॉल ठरवून दिलेला असला तरी तो पाळला जातो का, हे कळत नाही. एबोलाची साथ आल्यावर जिलाद सायन्सेस या कंपनीने हे औषध बनवले, तेव्हा ते फार चालले नाही.

कोरोनावर याचा उपयोग होत असताना त्यावरून जागतिक राजकारण झाले.  अगदी सुरुवातीच्या काळात हे इंजेक्शन आले तेव्हा त्यावर बॅन होता. द्यायचे की नाही यावरून वाद होते. किंमत नऊ ते दहा हजार रुपये होती. कोरोनावर अधिकृत मान्यता मिळालेले हे औषध नाही.  ठरावीक काळात वापर केला तरच ते रुग्णांना उपयोगी पडते. जागतिक आरोग्य संघटनेने ऑक्टोबर २०२० मध्ये हे इंजेक्शन निरुपयोगी आहे असे जाहीर केले, पण ते का वापरायचे नाही याची कोणतीही कारणे दिली नाहीत. आता ते वापरले जात आहे तरीही त्याची कारणमीमांसा जागतिक आरोग्य संघटनेने केलेली नाही. महाराष्ट्रातल्या कोरोना टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी रेमडेसिविरच्या वापरासाठी थेट दिल्लीपर्यंत जीवापाड प्रयत्न केले होते. त्यामागे दिवसरात्र खपून केलेली रुग्णांची  निरीक्षणे होती. नंतर केंद्रानेदेखील हे औषध सर्वत्र वापरण्यास परवानगी दिली. 

तरीही आज रेमडेसिविरचे जे काही चालले आहे, त्यावरून  डॉ. संजय ओक अस्वस्थ आहेत.  ते सांगतात, “रेमडेसिविरचा  गैरवापर जास्त झालाय. हे इंजेक्शन संजीवनी नाही. ते दिले आणि त्यामुळे प्राण वाचले असे होत नाही.  वर्षभरातल्या संशोधनांचा निष्कर्ष असा की रेमडेसिविरमुळे हॉस्पिटलमध्ये  राहणे एक ते दीड दिवसाने कमी होते. लवकर बरे वाटायला लागते. पण, हे इंजेक्शन म्हणजे संजीवनी नव्हे.  हे इंजेक्शन कोरोना व्हायरसच्या वाढीला अटकाव करते. त्यामुळे ज्या काळात हा व्हायरस शरीरात सगळ्यात जास्त असतो, त्याच काळात - पॉझिटिव्ह निघाल्यानंतर दुसरा दिवस ते नववा दिवस या काळातच - हे दिले गेले तर त्याचा फायदा होतो.   १४ व्या किंवा १५ व्या दिवशी ते देण्याने काहीही निष्पन्न होणार नाही.” 

हे सारे इतके स्पष्ट असताना रेमडेसिविरच्या वापरावरून ओरड होण्याची तीन कारणे आहेत. पहिले कारण : भारतात दुसरी लाट येणार असे सगळे जग ओरडून सांगत असताना केंद्र आणि राज्य सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. दोघांनीही याचा साठा करून ठेवण्याकडे लक्ष दिले नाही. केंद्राने रेमडेसिविरच्या निर्यातीवर आता बंदी आणली, ती दीड - दोन महिन्यांपूर्वी आणली असती तर आज ओरड झाली नसती. दुसरे कारण : अतिरेकी वापर!  त्यावर वेळीच बंधने आणली नाहीत. टास्क फोर्सच्या सूचना गुंडाळून ठेवल्या गेल्या. योग्य वेळी डोस न देणे, अपुऱ्या प्रमाणात देणे चुकीचे होते, पण ते घडले. घरी विलगीकरणात असणाऱ्यांना देण्यासाठीचे हे इंजेक्शन नाही. तरीही तसा हट्ट झाला, त्यामुळे ज्यांना गरज होती त्यांना रेमडेसिविर मिळाले नाही. तिसरे कारण : खाजगी हॉस्पिलटमधला निरंकुश वापर, त्यापोटी आकारली जाणारी हजारोंची बिले, त्यावर नियंत्रण आणण्यात आलेले अपयश. 

डिसेंबरमध्ये कोरोनाची साथ अचानक कमी झाली. त्यामुळे हेतेरो, झायडस, ज्यूबिलंट, डॉ. रेड्डीज, मायलॉन, सन फार्मा आणि सिप्ला या सात कंपन्यांनी याचे उत्पादन कमी करणे सुरू केले. मात्र, अचानक आलेल्या लाटेमुळे मागणी व पुरवठा यात मोठा फरक पडला. आता याचे जास्तीतजास्त उत्पादन सुरू झाले; पण ते बाजारात येण्यास आणखी काही दिवस लागतील. मात्र याची गरज लक्षात आल्यामुळे गुजरातसारखी केंद्राच्या जवळची राज्ये रेमडेसिविरचा साठा स्वत:कडे घेऊ लागली. त्याचेही राजकारण सुरू झाले. वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने म्हणतात, “आम्ही सूचना देऊनही खाजगी हॉस्पिटल नफेखोरीसाठी रेमडेसिविरचा वापर चुकीच्या पद्धतीने करीत आहेत.”

रेमडेसिविर, मास्क आणि हॅण्ड सॅनिटायझर या तीन गोष्टी अत्यावश्यक वस्तू व सेवा कायद्यात आणल्याच पाहिजेत. गोरगरिबांना आजही रोज १५ रुपयांचा मास्क वापरणे आणि एका व्यक्तीसाठी ७ हजारांची पाच रेमडेसिविर आणणे परवडत नाही. त्यामुळे यावरचा इलाज पूर्णपणे केंद्राच्या हातात आहे. गुजरातमधील एका कंपनीने रेमडेसिविर हाफकिन संस्थेला देण्यास असमर्थता दर्शवली. राज्याबाहेर एकही इंजेक्शन देऊ नका, अशा सूचना आहेत, असे त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांना सांगितले. हे धक्कादायक आहे. ही वेळ  भिंती तोडून एकमेकांना मदत करण्याची आहे. जगलो, वाचलो तर राजकारण करता येईल.  आज परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. केंद्राने आता हस्तक्षेप केला पाहिजे!

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस