शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

जैन पर्युषण पर्वाचे धार्मिक महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 00:21 IST

कोणताही धर्म असो, त्याच्या आचरणाने धार्मिक संस्कार मानवी मनावर होऊन त्याची वैचारिक बैठक चांगली राहते.

- भरत जैनकोणताही धर्म असो, त्याच्या आचरणाने धार्मिक संस्कार मानवी मनावर होऊन त्याची वैचारिक बैठक चांगली राहते. शिवाय यामुळे पुण्यार्जन होऊन मोक्ष मार्गही प्रशस्त होतो. जसे दहा दिवस गणेशोत्सव, नऊ दिवस नवरात्र, २५ ते ३१ नाताळ तसा जैन समाजाचा हा दहा दिवसांचा पर्वकाळ म्हणजे एक धार्मिक सोहळा असून, सर्व जण पुण्यार्जनाचा लाभ घेतातच. ‘पर्युषण’ म्हणजे ‘उपासना’, जी स्वकल्याणासाठी केली जाते. ‘आत्मकल्याण’ म्हणजे मोक्षप्राप्तीचे ध्येय! हे फक्त मानवी जीवनातच शक्य आहे. इतर एकेंद्रीय द्विइंद्रिय जी इंद्रियांना नाही. जैन शास्त्राप्रमाणे तर स्वर्गातील देवांनाही पुण्याश्रयाने शेवटी मानवी शरीर धारण करूनच धर्माचरणाने मोक्ष मिळविता येतो. म्हणूनच याला अनन्यसाधारण महत्त्व असून, ते कसे साध्य करता येते हे आपण थोडक्यात पाहू. चिंतन सामायिक (रोजच होते) व ते पाळण्याचा संकल्प केला जातो. एखाद्याने आपले मन दुखावले, मनाविरुद्ध केले, न ऐकले तर आपल्याला राग येतो. मग शब्दाने शब्द वाढून बदल्याची भावना होते. अनेक जन्म दोघांचे त्यातच खर्ची होतात. जसे पार्श्वनाथ भगवान व कमठचे बरेच जन्म वैर भावनेतच गेले. यापेक्षा समोरच्याला त्याची चूक समजून सांंगून त्याला क्षमा करणे; मग तो लहान असो, मोठा असो, हा धर्म म्हणजे घाबरटपणा नाही. याला मोठे मन लागते. म्हणूनच म्हटले आहे, ‘क्षमा वीरस्य भूषणम्’ दुसऱ्या दिवशीचा धर्म उत्तम मार्दव आहे. ‘मार्दव’ म्हणजे मृदू स्वभाव धारण करून नम्र बनणे, नम्रता अंगीकारणे. सर्व मोठी म्हणवणारी माणसे नम्र असतात. आदिनाथ भगवंतापासून महावीरांपर्यंत सर्व अति मृदू-नम्र होते. नम्रता माणसाला मोठेपण तर देतेच शिवाय पुण्यही लाभते. तिसरा दिवस ‘आर्जव’चा आहे. म्हणजे मनाचा सरळपणा, निर्मळपणा, कोठेही कपट मनात नसते, मायाचार न करणे. शौच म्हणजे शुचिता, पवित्रता, निर्मलता, लोभाचा नाश करणे. आजचा बोकाळलेला भ्रष्टाचार ‘हा’ धर्म न अंगीकारण्यानेच आहे. सत्य बोलणे, वागणे, खोटे-लबाड न बोलणे. सत्याची नेहमीच जीत होते असे म्हटले जाते. म्हणूनच म्हणतात ‘सत्यमेव जयते’.मनाविरुद्ध घडणाºया घटनांनी मन विचलित न होऊ देता संयम बाळगणे म्हणजे स्वत:ला त्रासही होत नाही व पुण्यार्जनही होते. हे इंद्रियांना जिंकणे होय.