शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जैन पर्युषण पर्वाचे धार्मिक महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 00:21 IST

कोणताही धर्म असो, त्याच्या आचरणाने धार्मिक संस्कार मानवी मनावर होऊन त्याची वैचारिक बैठक चांगली राहते.

- भरत जैनकोणताही धर्म असो, त्याच्या आचरणाने धार्मिक संस्कार मानवी मनावर होऊन त्याची वैचारिक बैठक चांगली राहते. शिवाय यामुळे पुण्यार्जन होऊन मोक्ष मार्गही प्रशस्त होतो. जसे दहा दिवस गणेशोत्सव, नऊ दिवस नवरात्र, २५ ते ३१ नाताळ तसा जैन समाजाचा हा दहा दिवसांचा पर्वकाळ म्हणजे एक धार्मिक सोहळा असून, सर्व जण पुण्यार्जनाचा लाभ घेतातच. ‘पर्युषण’ म्हणजे ‘उपासना’, जी स्वकल्याणासाठी केली जाते. ‘आत्मकल्याण’ म्हणजे मोक्षप्राप्तीचे ध्येय! हे फक्त मानवी जीवनातच शक्य आहे. इतर एकेंद्रीय द्विइंद्रिय जी इंद्रियांना नाही. जैन शास्त्राप्रमाणे तर स्वर्गातील देवांनाही पुण्याश्रयाने शेवटी मानवी शरीर धारण करूनच धर्माचरणाने मोक्ष मिळविता येतो. म्हणूनच याला अनन्यसाधारण महत्त्व असून, ते कसे साध्य करता येते हे आपण थोडक्यात पाहू. चिंतन सामायिक (रोजच होते) व ते पाळण्याचा संकल्प केला जातो. एखाद्याने आपले मन दुखावले, मनाविरुद्ध केले, न ऐकले तर आपल्याला राग येतो. मग शब्दाने शब्द वाढून बदल्याची भावना होते. अनेक जन्म दोघांचे त्यातच खर्ची होतात. जसे पार्श्वनाथ भगवान व कमठचे बरेच जन्म वैर भावनेतच गेले. यापेक्षा समोरच्याला त्याची चूक समजून सांंगून त्याला क्षमा करणे; मग तो लहान असो, मोठा असो, हा धर्म म्हणजे घाबरटपणा नाही. याला मोठे मन लागते. म्हणूनच म्हटले आहे, ‘क्षमा वीरस्य भूषणम्’ दुसऱ्या दिवशीचा धर्म उत्तम मार्दव आहे. ‘मार्दव’ म्हणजे मृदू स्वभाव धारण करून नम्र बनणे, नम्रता अंगीकारणे. सर्व मोठी म्हणवणारी माणसे नम्र असतात. आदिनाथ भगवंतापासून महावीरांपर्यंत सर्व अति मृदू-नम्र होते. नम्रता माणसाला मोठेपण तर देतेच शिवाय पुण्यही लाभते. तिसरा दिवस ‘आर्जव’चा आहे. म्हणजे मनाचा सरळपणा, निर्मळपणा, कोठेही कपट मनात नसते, मायाचार न करणे. शौच म्हणजे शुचिता, पवित्रता, निर्मलता, लोभाचा नाश करणे. आजचा बोकाळलेला भ्रष्टाचार ‘हा’ धर्म न अंगीकारण्यानेच आहे. सत्य बोलणे, वागणे, खोटे-लबाड न बोलणे. सत्याची नेहमीच जीत होते असे म्हटले जाते. म्हणूनच म्हणतात ‘सत्यमेव जयते’.मनाविरुद्ध घडणाºया घटनांनी मन विचलित न होऊ देता संयम बाळगणे म्हणजे स्वत:ला त्रासही होत नाही व पुण्यार्जनही होते. हे इंद्रियांना जिंकणे होय.