शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

नाकर्त्याचा काळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 15:11 IST

राज्यकर्त्यांना सशासारखे धावून स्पर्धा जिंकण्याची घाई झालेली दिसत असताना पावणे पाच वर्षात धोरणलकवा आणि निर्णयलकवा का होतो?

मिलिंद कुलकर्णीनाकर्त्याचा वार...रविवार अशी म्हण आहे. अंगात काम नसलेल्या किंवा काम करण्याची इच्छा नसलेल्या व्यक्तीला रोजचा दिवस हा सुटीचा म्हणजे रविवारच वाटत असतो, असा साधारण अर्थ या म्हणीचा सांगता येईल. त्यात थोडा बदल करुन वाराच्या ऐवजी काळ हा संदर्भ घेतला तर निवडणूक काळातील आचारसंहितेचा कालावधी हा ‘नाकर्त्याचा काळ’ असतो, असे म्हणावे लागेल. टी.एन.शेषन यांच्यासारख्या कर्तव्यकठोर अधिकाऱ्याने निवडणूक आयोग, निवडणूक आयुक्त आणि आचारसंहिता या संज्ञा, संस्थांची भारतीयांना प्रथमच ओळख करुन दिली. परंतु, आम्ही भारतीय इतके महान आहोत की, सोयीस्कर बाब तेवढी आम्ही अंगिकारतो. नावडत्या गोष्टीला आम्ही नाक मुरडतो. आचारसंहितेचा बाऊ करणे आम्हाला आवडते. १० मार्च ते २८ मे असे तब्बल अडीच महिने आचारसंहितेचा कालावधी संपूर्ण देशभरात राहणार आहे. या काळात काहीही करायचे नाही, असा अलिखित नियमच जणू लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केलेला आहे. ज्या कामांसाठी आचारसंहितेचा अडसर येत नाही, ती कामेदेखील आचारसंहितेचे कारण सांगत टाळली जातात. प्रत्येक शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचाºयाच्या टेबलवर ‘कोड आॅफ कंडक्ट’ची निवडणूक आयोगाची पुस्तिका ठेवलेली दिसून येईल. या पुस्तिकेला भारतीय संविधान, गीता, बायबल,कुराणा इतके महत्त्व शासकीय अधिकारी व कर्मचारी देताना दिसतात. सामान्य माणसाचे तर सोडून द्या, परंतु लोकप्रतिनिधी गेला तरी अधिकारी किंवा कर्मचारी ती पुस्तिका त्यांच्या हातात देऊन साहेब, कोणत्या नियमातून हे काम करु तेवढे मला सांगा, मी लगेच टिपणी तयार करुन साहेबांकडे पाठवतो, असे सांगून मोकळा होतो. लोकप्रतिनिधींना हे अनुभव आल्याने त्यांनीही संपर्क कार्यालयात स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, जनसामान्यांची कामे आता २८ मे नंतरच घेऊन या.ही कार्यपध्दती म्हणजे ‘नाकर्त्याचा काळ’. यंदा महाराष्टÑात दुष्काळी स्थिती आहे. पाणीटंचाई जाणवत आहे. तातडीने उपाययोजना हाती घ्यायला हव्या. या कामांना आचारसंहितेचा कोणताही अडसर नाही, हे वरिष्ठ अधिकारी जाहीरपणे सांगत आहेत. पण तालुकापातळीवर अधिकारी व कर्मचारी निवडणूक कामात व्यग्र असल्याचे दाखवत फाईली हलवत नाहीत, त्याचे काय?प्रशासनाचे दुहेरी रुप या महिनाभरात जनसामान्यांना दिसून आले. कृषी सन्मान योजनेचे लाभार्थी निवडणे आणि त्यांच्या खात्यात निधी वर्ग करण्यासाठी रविवारी कार्यालये उघडे ठेवून युध्दपातळीवर काम करणारे शासकीय अधिकारी व कर्मचारी दिसून आले. दुसरीकडे महिनाभरात शेकड्याने शासकीय परिपत्रके, भूमिपूजने करण्यात आली. त्यासाठीची पूर्वतयारी प्रशासनाने केली होती. ‘गतिमान प्रशासना’चा हा सुखद धक्का होता. पण त्यामागे लोकसभा निवडणुकीचा स्वार्थ लपलेला होता, हे कळल्याशिवाय राहत नाही. दुसरा प्रश्न यातून निर्माण होतो, की निवडणुकीच्या धास्तीने इतकी गतिमानता दाखविणारे प्रशासन मग पावणे पाच वर्षे गोगलगाय किंवा कासवगतीने का काम करते? राज्यकर्त्यांना सशासारखे धावून स्पर्धा जिंकण्याची घाई झालेली दिसत असताना पावणे पाच वर्षात धोरणलकवा आणि निर्णयलकवा का होतो?शेवटी उत्तर हेच मिळते, नाकर्त्याचा काळ म्हणजे आचारसंहितेचा काळ.

टॅग्स :Jalgaonजळगाव