शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

नाकर्त्याचा काळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 15:11 IST

राज्यकर्त्यांना सशासारखे धावून स्पर्धा जिंकण्याची घाई झालेली दिसत असताना पावणे पाच वर्षात धोरणलकवा आणि निर्णयलकवा का होतो?

मिलिंद कुलकर्णीनाकर्त्याचा वार...रविवार अशी म्हण आहे. अंगात काम नसलेल्या किंवा काम करण्याची इच्छा नसलेल्या व्यक्तीला रोजचा दिवस हा सुटीचा म्हणजे रविवारच वाटत असतो, असा साधारण अर्थ या म्हणीचा सांगता येईल. त्यात थोडा बदल करुन वाराच्या ऐवजी काळ हा संदर्भ घेतला तर निवडणूक काळातील आचारसंहितेचा कालावधी हा ‘नाकर्त्याचा काळ’ असतो, असे म्हणावे लागेल. टी.एन.शेषन यांच्यासारख्या कर्तव्यकठोर अधिकाऱ्याने निवडणूक आयोग, निवडणूक आयुक्त आणि आचारसंहिता या संज्ञा, संस्थांची भारतीयांना प्रथमच ओळख करुन दिली. परंतु, आम्ही भारतीय इतके महान आहोत की, सोयीस्कर बाब तेवढी आम्ही अंगिकारतो. नावडत्या गोष्टीला आम्ही नाक मुरडतो. आचारसंहितेचा बाऊ करणे आम्हाला आवडते. १० मार्च ते २८ मे असे तब्बल अडीच महिने आचारसंहितेचा कालावधी संपूर्ण देशभरात राहणार आहे. या काळात काहीही करायचे नाही, असा अलिखित नियमच जणू लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केलेला आहे. ज्या कामांसाठी आचारसंहितेचा अडसर येत नाही, ती कामेदेखील आचारसंहितेचे कारण सांगत टाळली जातात. प्रत्येक शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचाºयाच्या टेबलवर ‘कोड आॅफ कंडक्ट’ची निवडणूक आयोगाची पुस्तिका ठेवलेली दिसून येईल. या पुस्तिकेला भारतीय संविधान, गीता, बायबल,कुराणा इतके महत्त्व शासकीय अधिकारी व कर्मचारी देताना दिसतात. सामान्य माणसाचे तर सोडून द्या, परंतु लोकप्रतिनिधी गेला तरी अधिकारी किंवा कर्मचारी ती पुस्तिका त्यांच्या हातात देऊन साहेब, कोणत्या नियमातून हे काम करु तेवढे मला सांगा, मी लगेच टिपणी तयार करुन साहेबांकडे पाठवतो, असे सांगून मोकळा होतो. लोकप्रतिनिधींना हे अनुभव आल्याने त्यांनीही संपर्क कार्यालयात स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, जनसामान्यांची कामे आता २८ मे नंतरच घेऊन या.ही कार्यपध्दती म्हणजे ‘नाकर्त्याचा काळ’. यंदा महाराष्टÑात दुष्काळी स्थिती आहे. पाणीटंचाई जाणवत आहे. तातडीने उपाययोजना हाती घ्यायला हव्या. या कामांना आचारसंहितेचा कोणताही अडसर नाही, हे वरिष्ठ अधिकारी जाहीरपणे सांगत आहेत. पण तालुकापातळीवर अधिकारी व कर्मचारी निवडणूक कामात व्यग्र असल्याचे दाखवत फाईली हलवत नाहीत, त्याचे काय?प्रशासनाचे दुहेरी रुप या महिनाभरात जनसामान्यांना दिसून आले. कृषी सन्मान योजनेचे लाभार्थी निवडणे आणि त्यांच्या खात्यात निधी वर्ग करण्यासाठी रविवारी कार्यालये उघडे ठेवून युध्दपातळीवर काम करणारे शासकीय अधिकारी व कर्मचारी दिसून आले. दुसरीकडे महिनाभरात शेकड्याने शासकीय परिपत्रके, भूमिपूजने करण्यात आली. त्यासाठीची पूर्वतयारी प्रशासनाने केली होती. ‘गतिमान प्रशासना’चा हा सुखद धक्का होता. पण त्यामागे लोकसभा निवडणुकीचा स्वार्थ लपलेला होता, हे कळल्याशिवाय राहत नाही. दुसरा प्रश्न यातून निर्माण होतो, की निवडणुकीच्या धास्तीने इतकी गतिमानता दाखविणारे प्रशासन मग पावणे पाच वर्षे गोगलगाय किंवा कासवगतीने का काम करते? राज्यकर्त्यांना सशासारखे धावून स्पर्धा जिंकण्याची घाई झालेली दिसत असताना पावणे पाच वर्षात धोरणलकवा आणि निर्णयलकवा का होतो?शेवटी उत्तर हेच मिळते, नाकर्त्याचा काळ म्हणजे आचारसंहितेचा काळ.

टॅग्स :Jalgaonजळगाव