शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

ना कर्जमाफी ना हमीभाव, आयटी विभाग आणि मार्केट कमिट्यांमधील ढिसाळपणाने सरकारची इभ्रत दावणीला..!

By अतुल कुलकर्णी | Updated: November 20, 2017 03:13 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी देताना विशिष्ट पद्धतीचे फॉर्म भरून घेतले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी देताना विशिष्ट पद्धतीचे फॉर्म भरून घेतले. त्यात ज्या शेतक-यांना कर्जमाफी हवी आहे त्यांच्या आधारकार्डापासून ते त्यांची कोणत्या बँकेत किती खाती आहेत, त्यात नेमके कर्ज किती आहे, अशी सगळी माहिती मागितली गेली. त्यातून अनेक गंभीर गोष्टी समोर आल्या. कर्जमाफीच्या आकडेवारीत स्टेट लेव्हल बँकर्स कमिटीने ८९ लाख शेतक-यांच्या कर्जमाफीचा आकडा दिला होता. मात्र सरकारने जी माहिती आणि तपशील मागवला त्यातून आपली अडचण होत आहे हे लक्षात येताच राष्ट्रीयीकृत व व्यावसायिक अशा पाच बँकांनी आधी दिलेल्या खातेदारांची संख्या तब्बल १३,३६,१५९ लाखांनी कमी केली. सगळ्या बँकांचा मिळून हा आकडा आज किमान १६ लाखांच्यावर गेला आहे. जर पारदर्शकता ठेवली गेली नसती तर सरकारचे पर्यायाने तुमचे-आमचे पैसे बँकांच्या गंगाजळीत विनासायास गेले असते.यासाठी सरकारचे कौतुक केलेच पाहिजे. पण त्यानंतर कर्जमाफीचा जो घोळ सरकारच्या आयटी विभागाने घातला आहे त्याला तोड नाही. दिवाळीत कर्जमाफी करणार अशी मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा मागे पडली. आता २५ नोव्हेंबरपर्यंत ८० टक्के कर्जमाफी होईल, असे मुख्यमंत्र्यांना सांगावे लागले. आता त्यासाठी फक्त पाच दिवस उरले आहेत. तरीही कर्जमाफीची गाडी तसूभरही पुढे सरकलेली नाही. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ५५ हजार शेतकºयांची कर्जमाफी झाली असे सांगितले असले तरी वास्तव वेगळेच आहे. खासगीत या विषयाशी संबंधित सगळे अधिकारी आपली बोटे आयटी विभागाकडे दाखवून मोकळे होत आहेत. केवळ या विभागाच्या हेकेखोरपणामुळे आणि आपण सांगू ती पूर्वदिशा या वृत्तीमुळे आज ही वेळ सरकारवर आली आहे. ज्या पद्धतीची पारदर्शकता मुख्यमंत्र्यांनी या कर्जमाफीत आणण्याचा प्रयत्न केला होता तो त्यांच्याच आयटी विभागाने हाणून पाडल्याचे चित्र आज तरी आहे. मंत्रालयात कोणत्याही सचिवांना जाऊन खासगीत आयटी विभागाबद्दल मत विचारा, प्रत्येक जण टोकाची नाराजी व्यक्त करताना दिसेल. या विभागाने घातलेला घोळ सरकारला प्रचंड महागात पडला आहे. कर्जमाफीसाठी वित्त विभागाने दिलेले तब्बल पाच हजार कोटी रुपये बँका वापरत आहेत आणि शेतकरी मात्र याद्यांमध्ये आपले नाव तपासण्यात व्यस्त आहेत.जे कर्जमाफीचे झाले तेच हमी भावाच्या खरेदीचे. सहकार विभागांतर्गत येणाºया अनेक मार्केट कमिट्यांवर आजही काँग्रेस-राष्टÑवादीचा ताबा आहे. तर ग्राऊंडवर काम करणाºया अधिकाºयांच्या निष्ठा सरकारपेक्षा व्यापाºयांशी जास्त बांधल्या गेल्या आहेत. त्यामुळेच अनेक शेतकºयांच्या नावावर हजारो एकर शेतजमीन दाखवण्याचे प्रकरण उघडकीस आले. या गोष्टी उघडकीस आल्याबरोबर चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई होणे आवश्यक होते, तेही झाले नाही. कुठे तरी दोन अधिकारी निलंबित करण्याची मलमपट्टी झाली. परिणामी अधिकाºयांवर सरकार म्हणून कसलाही वचक राहिलेला नाही. तूर, मूग, उडीद आणि सोयाबीनचे पीक किती आले आणि सरकारच्या खरेदी केंद्रांनी त्यापैकी किती विकत घेतले याचीही आकडेवारी सरकार ठामपणे देऊ शकलेले नाही या सगळ्या ढिसाळपणाची जबाबदारी कोण घेणार?

टॅग्स :Mantralayaमंत्रालयDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस