शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

स्वकीयांचे बंड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 00:56 IST

एडिटर्स व्ह्यू

- मिलिंद कुलकर्णीजनतेला फार काळ मूर्ख बनवता येत नाही, असे प्रसिध्द वचन आहे. त्याचा प्रत्यय नेहमी येत असतो. पण तरीही राजकीय मंडळींमध्ये सुधारणा होताना दिसत नाही. अवास्तव आश्वासने देऊन सत्ता हस्तगत करायची आणि सत्तेत आल्यावर आश्वासनांना तिलांजली द्यायची. जनतेने आश्वासनांची आठवण करुन दिली तर बहाणे करायचे ही प्रवृत्ती बनली आहे. याला कोणताही राजकीय पक्ष अपवाद नाही.थोडे इतिहासात डोकावले तर अशा घटना, प्रसंग अनेक दिसतील. काँग्रेस पक्षातून बाहेर पडून १९९९ मध्ये शरद पवार यांनी राष्टÑवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. महाराष्टÑात काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते राष्टÑवादीत सामील झाले होते. जळगावात तर काँग्रेसमध्ये मोजके नेते राहिले होते. मधुकरराव चौधरी, अरुणभाई गुजराथी, जे.टी.महाजन, अ‍ॅड.रवींद्र पाटील, वसंतराव मोरे, डॉ.सतीश पाटील अशा नेत्यांनी राष्टÑवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काडीमोड घेऊनदेखील राज्यात सत्ता स्थापनेसाठी दोन्ही काँग्रेस एकत्र आले. १५ वर्षे सत्ता राबवली. या काळात जळगावात काँग्रेस क्षीण होत गेली आणि राष्टÑवादी प्रबळ होत गेले. पालकमंत्रीपद राष्टÑवादीकडे राहिले. खासदार, आमदार, पालिका, पंचायत समितींमध्ये सत्ता मिळविली. भाजपचेही अनेक नेते त्याकाळात राष्टÑवादीत गेले. माजी आमदार अरुण पांडुरंग पाटील, माजी आमदार डॉ. बी.एस.पाटील, माजी नगराध्यक्ष डॉ.के.डी.पाटील असे दिग्गज राष्टÑवादीत गेले होते.२०१४ मध्ये भाजप व शिवसेनेची सत्ता राज्यात आली. उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याचा प्रघात असल्याने अनेकांनी टोप्या फिरवल्या. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तर पक्षांतराची मोठी लाट आली. नेते आले, तशा त्यांच्या संस्थांवर देखील पक्षाचे झेंडे बदलले. हे सगळे राजकीय नेत्यांच्या सोयीने घडले. पण जनतेचे काय? ज्या अपेक्षेने लोकांनी निवडून दिले, त्या अपेक्षांचे काय? पाच वर्षानंतर जनतेला काय तोंड दाखवायचे, हा प्रश्न लोकप्रतिनिधींना पडला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तेची चार वर्षे आटोपली आणि आता शेवटचे वर्ष सुरू झाले. तशी आयाराम - गयारामांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ लागली आहे. अनेकांना पक्षांतर करताना दिलेली आश्वासने पाळली गेली नसल्याचा साक्षात्कार झाला. काहींना सत्ता उपभोगूनदेखील आता जनहिताची कळकळ जाणवू लागल्याचा आव आणला. गेल्या पाच वर्षांत भाजपमध्ये आलेल्या आणि भाजपची सत्ता असलेल्या संस्थांमध्ये असंतोष वाढू लागला आहे. स्वकीयांचे बंड सुरु झाले आहे.नंदुरबार जिल्ह्यात मोतीलाल पाटील या ज्येष्ठ नेत्याने नगरपालिका निवडणुकीत अचानक भाजपकडून लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली. पी.के.अण्णा पाटील यांच्या गटाचे मकरंद पाटील यांचा पराभव करुन ते निवडून आले. विधानसभा निवडणुकीपूर्वी पी.के.अण्णा पाटील यांचे पुत्र दीपक पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मोतीलाल पाटील यांची कोंडी झाली. त्यांचे पुत्र अभिजित पाटील यांनी काँग्रेसतर्फे जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. विधान परिषद निवडणुकीतही त्यांनी काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज भरलेला आहे. भाजपला निव्वळ बघ्याची भूमिका घेतल्याशिवाय काही करता येत नाही.धुळे महापालिकेत प्रथमच भाजपला बहुमत मिळाले. राजवर्धन कदमबांडे यांचे अनेक सहकारी या निवडणुकीत भाजपकडून निवडून आले. नंतर कदमबांडेदेखील भाजपमध्ये आले. महापालिका आणि कदमबांडे हे समीकरण असताना भाजपकडून त्यांना सूत्रे सोपविली जात नसल्याचे चित्र आहे. गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्याकडे महापालिकेची सूत्रे आहेत. त्यामुळे भाजपमध्ये आलेल्या नगरसेवकांमध्ये अस्वस्थता आहे. गेल्या आठवडयात स्थायी समितीची सभा सुरु असताना नगरसेवक शीतल नवले यांनी महापालिकेसमोर आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनाला विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला.जळगाव जिल्ह्यात चाळीसगावला नगराध्यक्षांविरुध्द उपनगराध्यक्षांनी बंड पुकारले. खासदार आणि आमदार हे दोन्ही या शहरातले आहेत. दोघांमध्ये अंतर्गत संघर्ष आहे. खडसे यांचा गटदेखील प्रभावी आहे. त्यामुळे याठिकाणचा संघर्ष वेगळे वळण तर घेणार नाही, याची चिंता पक्षश्रेष्ठींपुढे आहे.जळगाव महापालिकेत भाकरी फिरवूनदेखील भाजपमधील गटबाजी संपायचे नाव नाही. गटतट वाढत असून विरोधकांना पक्षांतर्गत मंडळीच खाद्य पुरवित असल्याची माहिती बाहेर येऊ लागल्याने अस्वस्थता वाढली आहे.याचा अर्थ एकच आहे, सत्ता आणण्यासाठी कष्ट लागतातच, पण ती टिकविण्यासाठी दुप्पट मेहनत लागते. ते जमले नाही, तर स्वकीय नाराज होतात. बंडाचे झेडे हाती घेतले जातात.- मिलिंद कुलकर्णी

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव