शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्वकीयांचे बंड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 00:56 IST

एडिटर्स व्ह्यू

- मिलिंद कुलकर्णीजनतेला फार काळ मूर्ख बनवता येत नाही, असे प्रसिध्द वचन आहे. त्याचा प्रत्यय नेहमी येत असतो. पण तरीही राजकीय मंडळींमध्ये सुधारणा होताना दिसत नाही. अवास्तव आश्वासने देऊन सत्ता हस्तगत करायची आणि सत्तेत आल्यावर आश्वासनांना तिलांजली द्यायची. जनतेने आश्वासनांची आठवण करुन दिली तर बहाणे करायचे ही प्रवृत्ती बनली आहे. याला कोणताही राजकीय पक्ष अपवाद नाही.थोडे इतिहासात डोकावले तर अशा घटना, प्रसंग अनेक दिसतील. काँग्रेस पक्षातून बाहेर पडून १९९९ मध्ये शरद पवार यांनी राष्टÑवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. महाराष्टÑात काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते राष्टÑवादीत सामील झाले होते. जळगावात तर काँग्रेसमध्ये मोजके नेते राहिले होते. मधुकरराव चौधरी, अरुणभाई गुजराथी, जे.टी.महाजन, अ‍ॅड.रवींद्र पाटील, वसंतराव मोरे, डॉ.सतीश पाटील अशा नेत्यांनी राष्टÑवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काडीमोड घेऊनदेखील राज्यात सत्ता स्थापनेसाठी दोन्ही काँग्रेस एकत्र आले. १५ वर्षे सत्ता राबवली. या काळात जळगावात काँग्रेस क्षीण होत गेली आणि राष्टÑवादी प्रबळ होत गेले. पालकमंत्रीपद राष्टÑवादीकडे राहिले. खासदार, आमदार, पालिका, पंचायत समितींमध्ये सत्ता मिळविली. भाजपचेही अनेक नेते त्याकाळात राष्टÑवादीत गेले. माजी आमदार अरुण पांडुरंग पाटील, माजी आमदार डॉ. बी.एस.पाटील, माजी नगराध्यक्ष डॉ.के.डी.पाटील असे दिग्गज राष्टÑवादीत गेले होते.२०१४ मध्ये भाजप व शिवसेनेची सत्ता राज्यात आली. उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याचा प्रघात असल्याने अनेकांनी टोप्या फिरवल्या. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तर पक्षांतराची मोठी लाट आली. नेते आले, तशा त्यांच्या संस्थांवर देखील पक्षाचे झेंडे बदलले. हे सगळे राजकीय नेत्यांच्या सोयीने घडले. पण जनतेचे काय? ज्या अपेक्षेने लोकांनी निवडून दिले, त्या अपेक्षांचे काय? पाच वर्षानंतर जनतेला काय तोंड दाखवायचे, हा प्रश्न लोकप्रतिनिधींना पडला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तेची चार वर्षे आटोपली आणि आता शेवटचे वर्ष सुरू झाले. तशी आयाराम - गयारामांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ लागली आहे. अनेकांना पक्षांतर करताना दिलेली आश्वासने पाळली गेली नसल्याचा साक्षात्कार झाला. काहींना सत्ता उपभोगूनदेखील आता जनहिताची कळकळ जाणवू लागल्याचा आव आणला. गेल्या पाच वर्षांत भाजपमध्ये आलेल्या आणि भाजपची सत्ता असलेल्या संस्थांमध्ये असंतोष वाढू लागला आहे. स्वकीयांचे बंड सुरु झाले आहे.नंदुरबार जिल्ह्यात मोतीलाल पाटील या ज्येष्ठ नेत्याने नगरपालिका निवडणुकीत अचानक भाजपकडून लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली. पी.के.अण्णा पाटील यांच्या गटाचे मकरंद पाटील यांचा पराभव करुन ते निवडून आले. विधानसभा निवडणुकीपूर्वी पी.के.अण्णा पाटील यांचे पुत्र दीपक पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मोतीलाल पाटील यांची कोंडी झाली. त्यांचे पुत्र अभिजित पाटील यांनी काँग्रेसतर्फे जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. विधान परिषद निवडणुकीतही त्यांनी काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज भरलेला आहे. भाजपला निव्वळ बघ्याची भूमिका घेतल्याशिवाय काही करता येत नाही.धुळे महापालिकेत प्रथमच भाजपला बहुमत मिळाले. राजवर्धन कदमबांडे यांचे अनेक सहकारी या निवडणुकीत भाजपकडून निवडून आले. नंतर कदमबांडेदेखील भाजपमध्ये आले. महापालिका आणि कदमबांडे हे समीकरण असताना भाजपकडून त्यांना सूत्रे सोपविली जात नसल्याचे चित्र आहे. गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्याकडे महापालिकेची सूत्रे आहेत. त्यामुळे भाजपमध्ये आलेल्या नगरसेवकांमध्ये अस्वस्थता आहे. गेल्या आठवडयात स्थायी समितीची सभा सुरु असताना नगरसेवक शीतल नवले यांनी महापालिकेसमोर आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनाला विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला.जळगाव जिल्ह्यात चाळीसगावला नगराध्यक्षांविरुध्द उपनगराध्यक्षांनी बंड पुकारले. खासदार आणि आमदार हे दोन्ही या शहरातले आहेत. दोघांमध्ये अंतर्गत संघर्ष आहे. खडसे यांचा गटदेखील प्रभावी आहे. त्यामुळे याठिकाणचा संघर्ष वेगळे वळण तर घेणार नाही, याची चिंता पक्षश्रेष्ठींपुढे आहे.जळगाव महापालिकेत भाकरी फिरवूनदेखील भाजपमधील गटबाजी संपायचे नाव नाही. गटतट वाढत असून विरोधकांना पक्षांतर्गत मंडळीच खाद्य पुरवित असल्याची माहिती बाहेर येऊ लागल्याने अस्वस्थता वाढली आहे.याचा अर्थ एकच आहे, सत्ता आणण्यासाठी कष्ट लागतातच, पण ती टिकविण्यासाठी दुप्पट मेहनत लागते. ते जमले नाही, तर स्वकीय नाराज होतात. बंडाचे झेडे हाती घेतले जातात.- मिलिंद कुलकर्णी

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव