शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

‘नाइटलाइफ’चे वास्तव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 05:09 IST

मुंबईच्या कमला मिल कम्पाउंडमधील ‘पब हब’ला लागलेल्या आगीने १४ बळी घेतले.

मुंबईच्या कमला मिल कम्पाउंडमधील ‘पब हब’ला लागलेल्या आगीने १४ बळी घेतले. वर्षाअखेरीचा ‘मूड’ साजरा करणाºया मुंबईकरांच्या उत्साहावर या भीषण घटनेने विरजण पडले आहे. या घटनेनंतर निर्माण झालेल्या दबावामुळे महापालिका आयुक्तांना पाच अधिकाºयांना निलंबित करावे लागले. येथील स्थानिक नगरसेवक, वॉर्ड आॅफिसर यांच्यावरही कारवाई व्हायला हवी. या परिसरातील अनधिकृत पबविरोधात पालिकेला पत्रेही दिली होती. परंतु तेथील अधिकाºयांनी केलेली डोळेझाक प्रचंड महागात पडली. या दुर्घटनेनंतर ‘नाइटलाइफ’ आणि ‘रूफटॉप’ हॉटेलचा आग्रह धरणाºया नेत्यांनी सुरक्षेची दुसरी बाजू समजावून घेण्याची गरज निर्माण झाली आहे. ही मायानगरी झगमगीत ठेवण्यासाठी निष्पापांच्या मृतदेहांचा खच पडायला हवा का? याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. कमला मिल परिसरात तर तब्बल ९६ हॉटेल्स, पब सुरू आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेले ‘पब हब’ कुणाच्या तरी आशीर्वादाने चालत असणार हेही सगळ्यांना माहीत आहे. कमला मिलमधील अनेक व्यवसायांमध्ये मोठमोठ्या अधिकाºयांची भागीदारी आहे. त्यामुळे येथील कारभार बिनबोभाट सुरू होता. प्रशस्त हॉटेलमध्ये मिळणाºया कमाईनंतर येथील मालकांची नजर ‘रूफटॉप’वर गेली. आधीच ‘नाइटलाइफ’ जगणाºया मुंबईकरांनीही ‘रूफटॉप’ हॉटेलना प्रतिसाद दिला. त्याला राजकीय वरदहस्त लाभल्याने अशी रूफटॉप हॉटेल्स पुरेशा परवान्यांविना सुरू होती. त्यांना ना फायर आॅडिट, ना वापराचा परवाना. एखादा अधिकारी आलाच तर चिरीमिरी देऊन त्याची पाठवणी व्हायची. या भ्रष्ट दलदलीची परिणती म्हणजेच हे १४ जणांचे बळी. वर्षभरात एल्फिन्स्टनपासून भायखळा इमारत दुर्घटनेपर्यंत शेकडो निष्पाप बळी गेले. हे सारे बळी प्रशासकीय अधिकाºयांच्या निष्काळजीचे होते हेही वास्तव आहे. उगीचच पाश्चिमात्य देशांतील शहरांची तुलना करत तश्शीच मुंबई घडविण्यात काही अर्थ नाही. येथील चमचमणाºया दुनियेबरोबरच सुरक्षित आयुष्याची खात्री असेल तरच अशा शहरांना अर्थ आहे. ज्या हॉटेल, पबमध्ये रममाण होतो, ती जागा कितपत सुरक्षित आहे, याचा विचार आता प्रत्येकानेच करायला हवा. हॉटेल, पबसारख्या सार्वजनिक ठिकाणांची पुरेशी सुरक्षितता न बाळगणाºया मालकांविरुद्ध हत्याकांडाचे कलमच लावायला हवे. ग्राहकांच्या पैशावर जगणाºया अशा व्यावसायिकांना कठोर कायद्याचा जाबच नियंत्रणात ठेवू शकतो. पैशाच्या मुजोरीवर कुणालाही वाचवू शकतो, अशा मस्तीत वावरणाºया साºयांनाच धडा मिळेल अशी शिक्षेची तरतूद हवी. तरच अशा दुर्घटना टाळू शकू. २०१७च्या वर्षाची अखेर या भीषण दुर्घटनेने झाली असली तरी सुरक्षेची नवी पहाट घेऊन नवे वर्ष येईल अशी आशा तूर्त धरायला हरकत नाही.