शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

‘नाइटलाइफ’चे वास्तव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 05:09 IST

मुंबईच्या कमला मिल कम्पाउंडमधील ‘पब हब’ला लागलेल्या आगीने १४ बळी घेतले.

मुंबईच्या कमला मिल कम्पाउंडमधील ‘पब हब’ला लागलेल्या आगीने १४ बळी घेतले. वर्षाअखेरीचा ‘मूड’ साजरा करणाºया मुंबईकरांच्या उत्साहावर या भीषण घटनेने विरजण पडले आहे. या घटनेनंतर निर्माण झालेल्या दबावामुळे महापालिका आयुक्तांना पाच अधिकाºयांना निलंबित करावे लागले. येथील स्थानिक नगरसेवक, वॉर्ड आॅफिसर यांच्यावरही कारवाई व्हायला हवी. या परिसरातील अनधिकृत पबविरोधात पालिकेला पत्रेही दिली होती. परंतु तेथील अधिकाºयांनी केलेली डोळेझाक प्रचंड महागात पडली. या दुर्घटनेनंतर ‘नाइटलाइफ’ आणि ‘रूफटॉप’ हॉटेलचा आग्रह धरणाºया नेत्यांनी सुरक्षेची दुसरी बाजू समजावून घेण्याची गरज निर्माण झाली आहे. ही मायानगरी झगमगीत ठेवण्यासाठी निष्पापांच्या मृतदेहांचा खच पडायला हवा का? याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. कमला मिल परिसरात तर तब्बल ९६ हॉटेल्स, पब सुरू आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेले ‘पब हब’ कुणाच्या तरी आशीर्वादाने चालत असणार हेही सगळ्यांना माहीत आहे. कमला मिलमधील अनेक व्यवसायांमध्ये मोठमोठ्या अधिकाºयांची भागीदारी आहे. त्यामुळे येथील कारभार बिनबोभाट सुरू होता. प्रशस्त हॉटेलमध्ये मिळणाºया कमाईनंतर येथील मालकांची नजर ‘रूफटॉप’वर गेली. आधीच ‘नाइटलाइफ’ जगणाºया मुंबईकरांनीही ‘रूफटॉप’ हॉटेलना प्रतिसाद दिला. त्याला राजकीय वरदहस्त लाभल्याने अशी रूफटॉप हॉटेल्स पुरेशा परवान्यांविना सुरू होती. त्यांना ना फायर आॅडिट, ना वापराचा परवाना. एखादा अधिकारी आलाच तर चिरीमिरी देऊन त्याची पाठवणी व्हायची. या भ्रष्ट दलदलीची परिणती म्हणजेच हे १४ जणांचे बळी. वर्षभरात एल्फिन्स्टनपासून भायखळा इमारत दुर्घटनेपर्यंत शेकडो निष्पाप बळी गेले. हे सारे बळी प्रशासकीय अधिकाºयांच्या निष्काळजीचे होते हेही वास्तव आहे. उगीचच पाश्चिमात्य देशांतील शहरांची तुलना करत तश्शीच मुंबई घडविण्यात काही अर्थ नाही. येथील चमचमणाºया दुनियेबरोबरच सुरक्षित आयुष्याची खात्री असेल तरच अशा शहरांना अर्थ आहे. ज्या हॉटेल, पबमध्ये रममाण होतो, ती जागा कितपत सुरक्षित आहे, याचा विचार आता प्रत्येकानेच करायला हवा. हॉटेल, पबसारख्या सार्वजनिक ठिकाणांची पुरेशी सुरक्षितता न बाळगणाºया मालकांविरुद्ध हत्याकांडाचे कलमच लावायला हवे. ग्राहकांच्या पैशावर जगणाºया अशा व्यावसायिकांना कठोर कायद्याचा जाबच नियंत्रणात ठेवू शकतो. पैशाच्या मुजोरीवर कुणालाही वाचवू शकतो, अशा मस्तीत वावरणाºया साºयांनाच धडा मिळेल अशी शिक्षेची तरतूद हवी. तरच अशा दुर्घटना टाळू शकू. २०१७च्या वर्षाची अखेर या भीषण दुर्घटनेने झाली असली तरी सुरक्षेची नवी पहाट घेऊन नवे वर्ष येईल अशी आशा तूर्त धरायला हरकत नाही.