शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

‘नाइटलाइफ’चे वास्तव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 05:09 IST

मुंबईच्या कमला मिल कम्पाउंडमधील ‘पब हब’ला लागलेल्या आगीने १४ बळी घेतले.

मुंबईच्या कमला मिल कम्पाउंडमधील ‘पब हब’ला लागलेल्या आगीने १४ बळी घेतले. वर्षाअखेरीचा ‘मूड’ साजरा करणाºया मुंबईकरांच्या उत्साहावर या भीषण घटनेने विरजण पडले आहे. या घटनेनंतर निर्माण झालेल्या दबावामुळे महापालिका आयुक्तांना पाच अधिकाºयांना निलंबित करावे लागले. येथील स्थानिक नगरसेवक, वॉर्ड आॅफिसर यांच्यावरही कारवाई व्हायला हवी. या परिसरातील अनधिकृत पबविरोधात पालिकेला पत्रेही दिली होती. परंतु तेथील अधिकाºयांनी केलेली डोळेझाक प्रचंड महागात पडली. या दुर्घटनेनंतर ‘नाइटलाइफ’ आणि ‘रूफटॉप’ हॉटेलचा आग्रह धरणाºया नेत्यांनी सुरक्षेची दुसरी बाजू समजावून घेण्याची गरज निर्माण झाली आहे. ही मायानगरी झगमगीत ठेवण्यासाठी निष्पापांच्या मृतदेहांचा खच पडायला हवा का? याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. कमला मिल परिसरात तर तब्बल ९६ हॉटेल्स, पब सुरू आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेले ‘पब हब’ कुणाच्या तरी आशीर्वादाने चालत असणार हेही सगळ्यांना माहीत आहे. कमला मिलमधील अनेक व्यवसायांमध्ये मोठमोठ्या अधिकाºयांची भागीदारी आहे. त्यामुळे येथील कारभार बिनबोभाट सुरू होता. प्रशस्त हॉटेलमध्ये मिळणाºया कमाईनंतर येथील मालकांची नजर ‘रूफटॉप’वर गेली. आधीच ‘नाइटलाइफ’ जगणाºया मुंबईकरांनीही ‘रूफटॉप’ हॉटेलना प्रतिसाद दिला. त्याला राजकीय वरदहस्त लाभल्याने अशी रूफटॉप हॉटेल्स पुरेशा परवान्यांविना सुरू होती. त्यांना ना फायर आॅडिट, ना वापराचा परवाना. एखादा अधिकारी आलाच तर चिरीमिरी देऊन त्याची पाठवणी व्हायची. या भ्रष्ट दलदलीची परिणती म्हणजेच हे १४ जणांचे बळी. वर्षभरात एल्फिन्स्टनपासून भायखळा इमारत दुर्घटनेपर्यंत शेकडो निष्पाप बळी गेले. हे सारे बळी प्रशासकीय अधिकाºयांच्या निष्काळजीचे होते हेही वास्तव आहे. उगीचच पाश्चिमात्य देशांतील शहरांची तुलना करत तश्शीच मुंबई घडविण्यात काही अर्थ नाही. येथील चमचमणाºया दुनियेबरोबरच सुरक्षित आयुष्याची खात्री असेल तरच अशा शहरांना अर्थ आहे. ज्या हॉटेल, पबमध्ये रममाण होतो, ती जागा कितपत सुरक्षित आहे, याचा विचार आता प्रत्येकानेच करायला हवा. हॉटेल, पबसारख्या सार्वजनिक ठिकाणांची पुरेशी सुरक्षितता न बाळगणाºया मालकांविरुद्ध हत्याकांडाचे कलमच लावायला हवे. ग्राहकांच्या पैशावर जगणाºया अशा व्यावसायिकांना कठोर कायद्याचा जाबच नियंत्रणात ठेवू शकतो. पैशाच्या मुजोरीवर कुणालाही वाचवू शकतो, अशा मस्तीत वावरणाºया साºयांनाच धडा मिळेल अशी शिक्षेची तरतूद हवी. तरच अशा दुर्घटना टाळू शकू. २०१७च्या वर्षाची अखेर या भीषण दुर्घटनेने झाली असली तरी सुरक्षेची नवी पहाट घेऊन नवे वर्ष येईल अशी आशा तूर्त धरायला हरकत नाही.