शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘नाइटलाइफ’चे वास्तव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 05:09 IST

मुंबईच्या कमला मिल कम्पाउंडमधील ‘पब हब’ला लागलेल्या आगीने १४ बळी घेतले.

मुंबईच्या कमला मिल कम्पाउंडमधील ‘पब हब’ला लागलेल्या आगीने १४ बळी घेतले. वर्षाअखेरीचा ‘मूड’ साजरा करणाºया मुंबईकरांच्या उत्साहावर या भीषण घटनेने विरजण पडले आहे. या घटनेनंतर निर्माण झालेल्या दबावामुळे महापालिका आयुक्तांना पाच अधिकाºयांना निलंबित करावे लागले. येथील स्थानिक नगरसेवक, वॉर्ड आॅफिसर यांच्यावरही कारवाई व्हायला हवी. या परिसरातील अनधिकृत पबविरोधात पालिकेला पत्रेही दिली होती. परंतु तेथील अधिकाºयांनी केलेली डोळेझाक प्रचंड महागात पडली. या दुर्घटनेनंतर ‘नाइटलाइफ’ आणि ‘रूफटॉप’ हॉटेलचा आग्रह धरणाºया नेत्यांनी सुरक्षेची दुसरी बाजू समजावून घेण्याची गरज निर्माण झाली आहे. ही मायानगरी झगमगीत ठेवण्यासाठी निष्पापांच्या मृतदेहांचा खच पडायला हवा का? याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. कमला मिल परिसरात तर तब्बल ९६ हॉटेल्स, पब सुरू आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेले ‘पब हब’ कुणाच्या तरी आशीर्वादाने चालत असणार हेही सगळ्यांना माहीत आहे. कमला मिलमधील अनेक व्यवसायांमध्ये मोठमोठ्या अधिकाºयांची भागीदारी आहे. त्यामुळे येथील कारभार बिनबोभाट सुरू होता. प्रशस्त हॉटेलमध्ये मिळणाºया कमाईनंतर येथील मालकांची नजर ‘रूफटॉप’वर गेली. आधीच ‘नाइटलाइफ’ जगणाºया मुंबईकरांनीही ‘रूफटॉप’ हॉटेलना प्रतिसाद दिला. त्याला राजकीय वरदहस्त लाभल्याने अशी रूफटॉप हॉटेल्स पुरेशा परवान्यांविना सुरू होती. त्यांना ना फायर आॅडिट, ना वापराचा परवाना. एखादा अधिकारी आलाच तर चिरीमिरी देऊन त्याची पाठवणी व्हायची. या भ्रष्ट दलदलीची परिणती म्हणजेच हे १४ जणांचे बळी. वर्षभरात एल्फिन्स्टनपासून भायखळा इमारत दुर्घटनेपर्यंत शेकडो निष्पाप बळी गेले. हे सारे बळी प्रशासकीय अधिकाºयांच्या निष्काळजीचे होते हेही वास्तव आहे. उगीचच पाश्चिमात्य देशांतील शहरांची तुलना करत तश्शीच मुंबई घडविण्यात काही अर्थ नाही. येथील चमचमणाºया दुनियेबरोबरच सुरक्षित आयुष्याची खात्री असेल तरच अशा शहरांना अर्थ आहे. ज्या हॉटेल, पबमध्ये रममाण होतो, ती जागा कितपत सुरक्षित आहे, याचा विचार आता प्रत्येकानेच करायला हवा. हॉटेल, पबसारख्या सार्वजनिक ठिकाणांची पुरेशी सुरक्षितता न बाळगणाºया मालकांविरुद्ध हत्याकांडाचे कलमच लावायला हवे. ग्राहकांच्या पैशावर जगणाºया अशा व्यावसायिकांना कठोर कायद्याचा जाबच नियंत्रणात ठेवू शकतो. पैशाच्या मुजोरीवर कुणालाही वाचवू शकतो, अशा मस्तीत वावरणाºया साºयांनाच धडा मिळेल अशी शिक्षेची तरतूद हवी. तरच अशा दुर्घटना टाळू शकू. २०१७च्या वर्षाची अखेर या भीषण दुर्घटनेने झाली असली तरी सुरक्षेची नवी पहाट घेऊन नवे वर्ष येईल अशी आशा तूर्त धरायला हरकत नाही.