शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

मतदानाआधी हे नक्की वाचा..!

By admin | Updated: January 16, 2017 00:10 IST

भाजपा-शिवसेना सत्तेत असताना एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे आहेत

भाजपा-शिवसेना सत्तेत असताना एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे आहेत आणि ज्यांनी सत्ताधाऱ्यांना झोडून काढायचे ते स्वत:ची कातडी वाचवण्यात मश्गुल झाले आहेत...कोणत्याही निवडणुका जाहीर झाल्या की सगळे राजकीय पक्ष जोमाने कामाला लागतात. आश्वासनांची खैरात सुरू होते. ते किती वाईट, आम्ही किती चांगले, हे सिद्ध करण्यासाठी सगळे वाट्टेल त्या थराला जातात. आम्ही किती आणि कसे योग्य आहोत हे दाखवून देण्याची एकही संधी सत्ताधारी पक्ष सोडत नाही आणि सत्ताधाऱ्यांचे निर्णय कसे चूक आहेत, आणि आम्ही कसे बरोबर निर्णय घेतले होते हे सांगण्यात विरोधक धन्यता मानत असतात. लोकांना तसे याचे काहीही घेणे देणे नसते. पण मतदानाच्या शेवटच्या दिवशी असे काही फासे टाकले जातात, की लोक भावनिक होतात, आणि मतदानाचा पवित्र हक्क बजावून मोकळे होतात... आजवरचे हे चित्र...यापेक्षा काहीसे वेगळे चित्र सध्या पहायला मिळत आहे. राज्यात भाजपा आणि शिवसेना तर मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपा सत्तेत आहेत. या दोघांची युती म्हणजे फेव्हिकॉलचा जोड... पण यावेळच्या विधानसभा निवडणुकीत हा जोड तुटला... मात्र कोणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने जनतेवर पुन्हा निवडणुकीच्या खर्चाचा भार नको असे सांगत हा जोड पुन्हा जोडला गेला. पण पहिल्यासारखा मजबूत जोड जुळलाच नाही. कधी कोठून तर कधी कोठून, पाणी पाझरतच राहिले. भाजपाने घेतलेले निर्णय कसे चुकीचे आहेत, त्यांच्याशी आमचा काडीचा संबंध नाही हे सिद्ध करण्यासाठी त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून बसलेली शिवसेना जीव तोडून प्रयत्न करत आहे. तर महापालिकेत जे काही वाटोळे झाले आहे ते फक्त आणि फक्त शिवसेनेमुळेच असा आव भाजपा आणत आहे. वास्तविक मंत्रिमंडळाच्या बैठकीत भाजपा शिवसेनेचे मंत्री शेजारी शेजारी बसतात, एकत्र निर्णय घेतात. घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची सामूहिक जबाबदारी ही सरकार म्हणून मंत्रिमंडळाची असते. असे असताना गेल्या दोन वर्षांत भाजपाने घेतलेला निर्णय आम्हाला पटला नाही, त्या निर्णयाच्या विरोधात आम्ही आमचे लेखी म्हणणे नोंदवत आहोत, असे एकही उदाहरण आजतागायत शिवसेनेच्या नावावर जमा नाही. तरीही आमचा चुकीच्या निर्णयांशी संबंध नाही, असे सांगून शिवसेनेचे मंत्री बिनधास्त मोकळे होतात. राज्यात येणारे कोणतेही सरकार कायम जनतेसोबतच असते, (निदान तसा समज तरी आहे.) तरीही हे कायम सांगत फिरतात की आम्ही जनतेसोबत आहोत. तिकडे महापालिकेत याच्या नेमके विरुध्द चित्र पहावयास मिळते. तेथेदेखील स्टॅण्डिंग कमिटीत होणारे ‘अंडरस्टॅण्डिंग’ हे सर्वपक्षीय असतानाही शिवसेनेने चुकीचे निर्णय घेतले, आमचा त्या निर्णयांशी संबंध नाही असे सांगत भाजपा हात वर करून मोकळे होत आहे. पारदर्शी कारभार देण्यासाठी आम्हालाच मत द्या, शिवसेनेने एवढा भ्रष्टाचार केला, हे चुकीचे केले, ते वाईट केले असे म्हणत भाजपा स्वत: केलेल्या चुकांपासून स्वत:लाच वेगळे करू पाहत आहे. ग्रामीण भागात एक म्हण आहे, ‘मी नाही त्यातली आणि कडी लावला आतली..’ शिवसेना, भाजपाचे जे काही चालू आहे ते याशिवाय वेगळे काही नाही.काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कारभाराला कंटाळून लोकांना मोठ्या अपेक्षेने भाजपा-शिवसेनेला सत्ता दिली. मात्र या आधीचे बरे, म्हणायची वेळ या दोन्ही पक्षातील नेत्यांनी आणली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारतचा नारा दिला पण भाजपाचे मंत्री आणि पक्षाचे प्रमुख यांचेच मतदारसंघ कचऱ्याच्या ढिगांनी भरलेले आहेत. त्यांच्याच मतदारसंघात जागोजागी घाण आणि अस्वच्छता आहे. त्यामुळे या सगळ्यांचे बोलणे आणि वागणे यात मोठे अंतर पडलेले आहे. सत्ता टिकविण्यासाठी जे जे काही काँग्रेसने केले त्या सगळ्या गोष्टी आता बिनदिक्कतपणे भाजपा करताना दिसते आहे. मात्र मूलभूत प्रश्नांकडे ना भाजपाचे लक्ष आहे ना शिवसेनेचे. भाजपा शिवसेनेची ही दुफळी जनतेसमोर आणण्याची ताकद दुर्दैवाने विरोधी पक्षात उरलेली नाही. उद्या भाजपाने हाक दिली तर दोन्ही काँग्रेसमधले अनेक नेते पटापटा भाजपात जायला मागे पुढे पाहणार नाहीत. त्यामुळे सरकारवर कडाडून हल्ला चढविण्याची त्यांची मानसिकता उरलेली नाही. ज्यांची आहे त्यांचे हात अशी मानसिकता जोपासणाऱ्यांनी बांधून टाकले आहेत. तेव्हा या सगळ्यांचा विचार करा, मग मतदान करा... - अतुल कुलकर्णी