शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

राज्यसभा अखेर बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 05:15 IST

राज्यसभेवर राज्यातून जाणाऱ्या सहा सदस्यांचा मार्ग अखेर निर्धोक पार पडला. राज्यसभेची निवडणूक तशी खुल्या पद्धतीने होणारी.

राज्यसभेवर राज्यातून जाणाऱ्या सहा सदस्यांचा मार्ग अखेर निर्धोक पार पडला. राज्यसभेची निवडणूक तशी खुल्या पद्धतीने होणारी. भाजपाचे तीन उमेदवार, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी एक असे सहा उमेदवार राज्यसभेवर जाणे पक्के होते. तीन उमेदवारांचा कोटा असूनही भाजपाने चौथ्या उमेदवाराचा अर्ज भरला. त्यामुळे राज्यसभेसाठी निवडणूक होते की काय? अशी स्थिती निर्माण झाली. काँग्रेसचे उमेदवार अर्थात कुमार केतकर यांना रोखण्यासाठी भाजपाने चौथा उमेदवार दिल्याची जोरदार चर्चा रंगली. तथापि, चौथा उमेदवार हा डमी असल्याचेही सांगण्यात येत होते. बरं जर चौथा उमेदवार डमी होता, तर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अगदी शेवटपर्यंत हे ताणून धरण्याची आवश्यकता होती का? हादेखील प्रश्न आहे. शिवसेनेच्या कोट्यातील तसेच स्वत:ची अतिरिक्त ठरणारी मते आपल्याला मिळू शकतात, त्यातून काँग्रेस उमेदवाराला पराभूत करता येऊ शकते, अशा शक्यताही मग पडताळून पाहण्यात येऊ लागल्या. पण अखेर ही निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा झाली ती नारायण राणे आणि कुमार केतकर यांची. शिवसेनेला नको म्हणून राणे यांचा राज्य मंत्रिमंडळातील प्रवेश लांबत गेला. त्यात शिवसेनेने आधीच स्वतंत्र बाण्याची घोषणा केलेली आहे. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत बसणाºया संभाव्य फटक्याची चिंता भाजपाला आत्तापासून सतावू लागली आहे. त्यामुळे काहीही करून नारायण राणेंना केंद्रात पाठवायचे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरविले होते. नारायण राणे यांच्यासमोरही अन्य काही पर्याय सध्या नसल्याने त्यांनी ही आॅफर स्वीकारली. खासदारकी गेली तरी चालेल; पण रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही, असे वक्तव्यही त्यांनी केले. विशेष म्हणजे हा प्रकल्प व्हावा, ही भाजपाची इच्छा आहे. तर दुसरे चर्चेतील उमेदवार कुमार केतकर यांनी काँग्रेसमधील अनेक दिग्गजांना मागे टाकत राज्यसभेचे तिकीट मिळविले. पत्रकारितेतील दिग्गज, निर्भीड असा बाणा जपणारे केतकर अखेर काँग्रेसवासी झाले. कुमार केतकर नेहरू-गांधी परिवाराशी नैतिक बांधिलकी जपणारे म्हणून परिचित आहेत. पत्रकारिता करताना त्यांनी काँग्रेसवर वेळोवेळी टीकाही केली. पण त्यांचे प्रमुख वैचारिक शत्रू म्हणजे रा. स्व. संघ आणि भाजपा. गेल्या काही काळापासून नेहरू-परिवारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडून थेट टीका होत आहे. या परिवाराच्या योगदानाबद्दलची जाहीर शंका उपस्थित केली जात आहे. काँग्रेस पक्ष सध्या देशभर अत्यंत कष्टप्रद स्थितीतून जात आहे. काँग्रेसला केडर बेस नव्याने बांधण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर कुमार केतकर यांची निवड काँग्रेससाठी निश्चितच उपयुक्त ठरणारी आहे.

टॅग्स :Politicsराजकारण