शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुद्दे मांडा; गुद्यावर येऊ नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 20:32 IST

महाराष्टÑातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून महिना होत आला असताना राजकीय भूकंप होऊन नवे सरकार स्थापन झाले आहे.

मिलिंद कुलकर्णीमहाराष्टÑातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून महिना होत आला असताना राजकीय भूकंप होऊन नवे सरकार स्थापन झाले आहे. भाजप आणि राष्टÑवादी काँग्रेस पक्षातील अजित पवार गटाने एकत्र येऊन हे सरकार स्थापन केले. शिवसेना, राष्टÑवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तीन पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या महाविकास आघाडीचे सरकार लवकरच स्थापन होईल, अशी आशा असताना ही नाट्यमय घडामोड घडली. संपूर्ण महिनाभर राजकीय वातावरण तप्त आहे. समाजमाध्यमांमध्ये त्याची धग अधिक जाणवत आहे. नेते संयमाने बोलत असले तरी कार्यकर्ते भडकपणा, आततायीपणा, उतावीळपणाचे दर्शन घडवित आहे. मुद्यांवरील विषय गुद्यावर येणार नाही, अशी काळजी सर्वच राजकीय कार्यकर्त्यांनी घेण्याची नितांत आवश्यकता आहे.शिवसेनेचे नेते, खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार संजय राऊत यांनी खऱ्या अर्थाने हा संपूर्ण महिना गाजवला. निकालानंतर पहिल्या दिवसापासून त्यांनी भाजपला अंगावर घेतले. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिवाळीनिमित्त पत्रकारांशी साधलेल्या अनौपचारिक संवादाचे अचूक टायमिंग साधत राऊत यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुध्द आघाडी उघडली. सकाळी टिष्ट्वट करीत ते मोहिमेची सुरुवात करीत असत. कधी अटलजींचे शब्द तर कधी शायरीचा खुबीने वापर करीत त्यांनी शिवसेनेची भूमिका परखड आणि स्पष्टपणे मांडली. दूरचित्रवाणीवर त्यांच्या इतके फुटेज बहुदा शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांनाही मिळाले नसेल. हृदयशस्त्रक्रिया होऊनही त्यांनी लेखणी, वाणी आणि दूरचित्रवाणी यांना विराम दिला नाही. त्यांच्या आक्रमक भूमिका आणि शैलीमुळे राजकीय वातावरण जसे तप्त झाले तसे समाजमाध्यमांमध्येही आरोपांच्या फैरी सुरु झाल्या. फडणवीस ‘पुन्हा आलोय’ असे म्हणत मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर राऊत तेवढेच ट्रोल देखील झाल्याचे पहायला मिळाले.भाजप, शिवसेना, राष्टÑवादी काँग्रेस व काँग्रेस या चार ही प्रमुख पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये समाजमाध्यमांमध्ये जणू युध्द छेडले गेले आहे. शिवसेनेच्या पुढाकाराने महाराष्टÑात नवीन प्रयोग साकारला जात होता. भाजप व शिवसेनेची विधानसभा निवडणुकीत युती होती, परंतु दोघांमधील मतभेदामुळे सेना काँग्रेस-राष्टÑवादीसोबत तर भाजप हा राष्टÑवादीतील अजित पवार गटासोबत गेला. अमित शहा यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर जे ठरले, त्यानुसार व्हावे, असा सेनेचा आग्रह तर मुख्यमंत्रीपदाचे काही ठरलेच नव्हते, असे फडणवीस यांचे म्हणणे आहे. खरे कोण आणि खोटे कोण यावरुन सुरु झालेला वाद भाजप आणि सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच रंगला. पक्ष आणि नेत्यांच्या इतिहासाची उजळणी झाली. अगदी सेनेने आणीबाणीचे केलेले समर्थन पासून तर प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी यांना राष्टÑपतीपदासाठी दिलेला पाठिंबा इथपर्यंत चर्चा रंगली. बाबरी मशिदीच्या विध्वंसाची जबाबदारी भाजपने टाळली मात्र शिवसेनाप्रमुखांनी हे कृत्य सैनिकांचे असेल तर मला त्यांचा अभिमान आहे, असे जाहीर कौतुक केल्याचे शिवसैनिकांनी पुन्हा लक्षात आणून दिले.हिंदुत्व हा युतीमधील समान धागा असल्याचे भाजपचे म्हणणे असताना सैनिकांनी मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत काश्मिरात केलेली युती ही कोणत्या हिंदुत्वात बसते, असा सवाल केला.युती तोडून शिवसेना काँग्रेस, राष्टÑवादीबरोबर जात असल्याचा आणि पाच वर्षांची सत्ता मोठा पक्ष म्हणून उदयाला येऊनही जात असल्याचा राग आणि खेद भाजप आणि त्याच्या समर्थकांमध्ये असणे नैसर्गिक आणि स्वाभाविक आहे. परंतु, एकट्या सेनेला त्यासाठी दोषी ठरणे कितपत संयुक्तीक आहे, असा प्रश्न राजकारणात रस असणाºया सामान्य नागरिक विचारताना दिसत आहे.अजित पवार यांच्या बंडानंतर राष्टÑवादीचे समर्थक संतापले, तर भाजप समर्थक आनंदले. शरद पवार यांच्या १९७८ च्या बंडाची आठवण भाजप समर्थकांना झाली, तर हे दबावतंत्र असल्याची भावना राष्टÑवादीच्या समर्थकांना वाटली. कुटुंब आणि पक्षात फूट पडल्याची सुप्रिया सुळे यांची भावना कार्यकर्त्यांना हळवे करुन गेली.कार्यकर्ते भाबडे असतात. त्यांचा पक्ष आणि नेत्यांवर प्रचंड विश्वास असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे शेवटच्या क्षणी काहीतरी घडवून आणतील, आणि भाजपचे सरकार अस्तित्वात येईल. असा भाजप समर्थकांचा आशावाद खरा ठरला आहे. परंतु, अजित पवार यांचे बंड फसते काय, ३० नोव्हेंबरला विश्वासमताच्यावेळी काय घडते, यासंदर्भात तर्कवितर्कांना पूर आला आहे. महाविकास आघाडी व भाजप-राष्टÑवादीचा अजित पवार गट ही अभद्र युती असल्याचे व्यंगचित्र, नेत्यांविषयी विनोद असे प्रकार घडू लागले आहेत. वैचारिक चर्चा समजू शकते, परंतु, अशी वैयक्तीक टीका, आरोप टाळायला हवे. समाजमाध्यमांमध्ये तर असे वाद विकोपाला जात आहेत. आमच्या नेत्याची बदनामी सहन करणार नाही, आम्ही काही शांत बसलेलो नाही, असे इशारे सुरु झालेले आहेत. २८८ आमदारांच्या विधानसभेत १४५ हा जादुई आकडा गाठणाºया आघाडीकडे सत्ता जाईल, हे साधेसरळ गणित आहे. विधानसभेत जो हे गणित सोडवेल तो सरकार चालवेल, हे स्पष्ट आहे. त्यामुळे संयम ठेवायला हवा. एकमेकांचा आदर व सन्मान करायला हवा, ही महाराष्टÑाची संस्कृती नाही, हे सगळ्यांनीच लक्षात घ्यायला हवे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव