शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

राहुल गांधी लालूजींना म्हणाले, स्वयंपाक शिकवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 08:26 IST

राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्या घरी राहुल गांधी जेवायला गेले; एवढेच नव्हे तर यजमान रांधत असताना त्यांनी व्हिडीओ रेकॉर्डिंगही केले!

-हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली

लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्यासंबंधी कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली त्या दिवशी राहुल गांधी यांचे अनेक विरोधी पक्षनेत्यांनी फोनवरून अभिनंदन केले. राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांचाही त्यात समावेश होता. बोलता बोलता राहुल गांधी त्यांना म्हणाले ‘तुम्ही अत्यंत रुचकर स्वयंपाक करता असे मी ऐकले आहे’ - लालू हो म्हणाले आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी राहुल यांना जेवायला येण्याचे निमंत्रण दिले. राहुल यांनी ते स्वीकारले, पण एक व्यक्तिगत विनंती केली; ‘तुम्ही तुमचे खास पदार्थ माझ्यादेखत शिजवायचे कारण मला स्वयंपाक शिकायचा आहे. तुम्ही आधीची काय लागते ती तयारी करून ठेवा; परंतु शिजवताना मात्र मी उपस्थित राहीन!’ - राहुल गांधी वेळेवर हजर झाले आणि त्यांनी लालू स्वयंपाक करतानाचा एक व्हिडीओही तयार केला. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवही यावेळी उपस्थित होते. लालूप्रसाद यांच्या कुटुंबीयांबरोबर राहुल यांनी भोजन केले. 

- आता त्यांचे सरकारी निवासस्थान पुन्हा मिळाले आहे. स्वयंपाकाचा प्रयोग ते आपल्या या घरी करतील असे दिसते. संदीप दीक्षित यांच्या घरात राहायला जाण्याचा बेत त्यांनी रद्द केला. कारण सुरक्षा यंत्रणांची परवानगी मिळाली नाही! तोतयांनी घातली टोपी भारतीय क्रिकेट नियामक मंडळातले महत्त्वाचे पद मिळविण्यासाठी घायकुतीला आलेले एक पोलिस अधिकारी चांगलेच अडचणीत आले आहेत.  हरयाणाचे पोलिस महानिरीक्षक इतक्या मोठ्या पदावरून निवृत्त झालेल्या या अधिकाऱ्याला तोतयांनी गंडवले. काही तोतयांनी ‘तुम्हाला क्रिकेट नियामक मंडळाच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाचे प्रमुख म्हणून नेमणूक देण्यात येणार असल्या’ची बातमी त्यांना दिली. त्याबदल्यात या तोतया मंडळींनी अधिकाऱ्याकडून बरीच मोठी रक्कमही उकळली. क्रिकेट नियामक मंडळाच्या अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेले नेमणूक पत्रही त्यांना देण्यात आले. या बड्या अधिकाऱ्याशी त्यांनी फोनवरून संवादही घडवून आणला. क्रिकेट नियामक मंडळाचे हे पत्र प्रस्तुत लेखकाच्या हाती लागले असून त्यात असे म्हटले आहे की, हरयाणाच्या या माजी पोलिस महानिरीक्षकांना १५ जुलै २०२३ पासून १४ जुलै २०२६ पर्यंत भ्रष्टाचारविरोधी कक्षाच्या प्रमुखपदी नेमणूक देण्यात येत आहे. 

संबंधित पोलिस महानिरीक्षक २०२० मध्ये महासंचालकपदावरून निवृत्त झाले असून सध्या ते हरयाणा राज्य पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे सदस्य म्हणून काम करतात. आपल्याला गंडवण्यात आले आहे हे लक्षात आल्यावर हादरलेले हे अधिकारी व्यक्तिगत कारणांनी अमेरिका दौऱ्यावर निघून गेले. तोतयांविरुद्ध त्यांनी साधी औपचारिक तक्रारही नोंदवली नाही. अलीकडेच गुजरातमधल्या एका तोतयाने अनेक अधिकाऱ्यांना टोपी घातली; त्यात अगदी जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपालही होते. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर तोतयांनी घडविलेला हा दुसरा प्रताप होय!

विरोधकांकडील राज्यांवर मोदींची खैरातकेंद्र सरकारने खाणी आणि खनिजद्रव्य दुरुस्ती कायदा संसदेमध्ये गोंधळातच पारित केला. त्याचा फायदा एनडीएचे घटक नसलेल्या विरोधी पक्ष शासित राज्यांना होणार आहे. बिहार असो वा झारखंड, तेलंगणा, ओडिशा, केरळ किंवा पश्चिम बंगाल ही सर्व राज्ये खनिजांनी समृद्ध आहेत; पण गेल्या काही दशकांपासून या ना त्या कारणाने त्यांना खनिजांचे उत्खनन करता येत नव्हते. नव्या कायद्यामुळे ते शक्य होईल. यासाठी १०७ खाणी निश्चित करण्यात आल्या असून त्यातील १९ खाणींचा लिलाव करण्याची परवानगी राज्यांना देण्यात आली आहे. ८८ खाणींमध्ये लिथियम, बेरिलियम सारखी खनिजे आहेत. त्याचप्रमाणे झिर्कोनियम व अन्य खनिजे सापडणाऱ्या खाणींचाही लिलाव करण्यात येणार आहे. मात्र, या लिलावातून मिळणारा पैसा केंद्र सरकारच्या खजिन्यात जाणार नाही. हा पैसा राज्य सरकारांना मिळेल. 

लिथियम, कोबाल्ट, सेलेनियम, मॉलीब्डेनम, टंगस्टन आणि इतर खनिजे बाहेर काढण्यासाठी अर्थातच खासगी क्षेत्रातून प्रयत्न होतील यात शंका नाही. उत्पन्न वाढवून घेण्याच्या सूत्रावर बोली जिंकणाऱ्याची निवड केली जाईल. खनिज द्रव्यांनी समृद्ध असलेल्या या राज्यांना उत्खननाची  आस लागली होती. मोदी यांनी  सध्याच्या कठीण काळात त्याना संतुष्ट केले आहे.

बदलती समीकरणेराजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांना भारतीय जनता पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून सादर करणार नाही असे दिसते आहे. वसुंधराराजे यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे पक्षश्रेष्ठींशी त्यांचा समझौता झाल्याच्या प्रचलित समजुतीला तडा गेला आहे. ‘घटनेने भले स्त्रियांना समान हक्क दिले असतील. परंतु, त्यासाठी प्रत्येक पावलावर स्त्रियांना झगडावे लागते’ असे ट्वीटमध्ये म्हटले आहे. ‘सर्व महत्त्त्वाचे निर्णय पुरुष घेत असतात. मी राजस्थानच्या राजकारणात आले तेव्हा मला खूप संघर्ष करावा लागला. दबावाला बळी पडले असते तर मी आज जेथे आहे तेथे पोहोचले नसते’, असेही त्या म्हणतात. ‘स्त्री स्वतः निर्धार करील तर ती डोंगरही हलवू शकते’, अशी गर्जनाही वसुंधराराजे यांनी केली आहे. - त्यांच्या या ट्वीटमुळे भाजप श्रेष्ठी अस्वस्थ आहेत!

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव