शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

राफेलचा घोटाळा उघड्यावर; सौद्यात ४० ते ५० कोटींची दलाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 03:45 IST

राफेल सौद्याबाबत मोदी सरकारने संसदेला व देशाला अंधारात ठेवल्याचे उघड झाले. १२६ विमानांवरून हा सौदा ३६ विमानांवर कसा आला, हे कुणीही आजवर देशाला सांगितले नाही. या सौद्यात ४० ते ५० कोटींची दलाली देण्याचा सरकारचा प्रयत्नही धक्का देणारा होता.

राफेल या लढाऊ विमानांच्या सौद्याची सगळी कागदपत्रे तीन बंद लखोट्यांतून २९ आॅक्टोबरपूर्वी आम्हाला सादर करा, या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने सारे केंद्र सरकार त्याच्या संरक्षण मंत्रालयासह हादरले आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीच्या अखेरीस फ्रान्सच्या डुसॉल्ट कंपनीकडून १२६ विमाने खरेदी करण्यासाठी झालेला सौदा मोदींचे सरकार आल्यानंतर ३६ विमानांवर आला. मात्र, विमान कंपनीला द्यायची रक्कम तेवढीच राखली गेली. आता येणाऱ्या विमानांत काही सुधारणा व नवे शस्त्रे सामील करण्यात येत असल्याचे कारणही त्यासाठी पुढे केले गेले. आरंभी या व्यवहारात काही काळेबेरे असावे, अशी शंका कुणाला आली नाही. मात्र, अनिल अंबानी या कर्जाच्या डोंगराखाली दडपलेल्या उद्योजकाचे नाव या करारातील दलालीशी जोडले गेले, तेव्हा त्याचा प्रचंड गदारोळ उडाला. अंबानींना ही दलाली देऊ करण्याचा आरोप खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ठेवला गेला. या आरोपाचे गांभीर्य हे की, अंबानींचे नाव त्यात दलाल म्हणून असलेच पाहिजे, असा आग्रह मोदी सरकारनेच धरल्याचा दावा फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रॅन्कोईस होलेन्डे यांनी केला. त्यातून डुसाल्ट कंपनी मोदी सरकार, अनिल अंबानी आणि हा विमान सौदा यातील लागेबांधेच उघड झाले. त्यामुळे ‘भारत व फ्रान्स यांच्यातील लष्करी कराराच्या सर्व बाजू गुप्त राखण्यात याव्यात,’ असा करार त्या दोन सरकारांत झाला असल्याची संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यांनी संसदेला दिलेली माहितीच खोटी असल्याचे देशाच्या लक्षात आले. हे प्रकरण दबावे म्हणून अनिल अंबानी यांनी एका वृत्तपत्रावर ५० कोटींचा मानहानीचा दावाही याच काळात केला. त्या आधी भारत व फ्रान्स यांच्यात कोणताही गुप्त करार नाही, ही गोष्ट फ्रान्सचे आताचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीच आपल्याला सांगितल्याचे राहुल गांधींनी संसदेत उघड केले. एवढे सारे रामायण झाल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाणे व त्याची शहानिशा होणे क्रमप्राप्तच होते व तसे ते आता होत आहे. मुळातच राफेल सौदा आरंभापासून संशयास्पद राहिला. त्यात मोदी सरकारने संसदेला व देशाला अंधारात ठेवल्याचे उघड झाले. १२६ विमानांवरून हा सौदा ३६ विमानांवर कसा आला, हे कुणीही आजवर देशाला सांगितले नाही. अनिल अंबानी यांना या सौद्यात ४० ते ५० कोटींची दलाली देण्याचा सरकारचा प्रयत्नही सा-यांना धक्का देणारा होता. शिवाय हा सौदा गुप्त असल्याचे सरकारचे सांगणेही खोटे असल्याचे स्पष्ट झाले. आता सर्वोच्च न्यायालयानेच या सौद्याचा आरंभापासून आतापर्यंतचा इतिहास त्यात वेळोवेळी झालेल्या बदलांसह आम्हाला सादर करा, असे सरकारला फर्मावले आहे. योगायोग म्हणा वा चलाखी, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश जारी होताच, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण या तीन दिवसांच्या फ्रान्सच्या दौ-यावर रवाना झाल्या. ‘त्यांचा हा दौरा या व्यवहारातील घोटाळ्यांवर लिपापोती करण्यासाठी होत आहे,’ असा सबळ आरोप त्यांच्यावर व मोदींवर राहुल गांधींनी केला आहे. या सौद्यातील घोटाळा उघड झाला, तर तो बोफोर्सच्या सौद्याहून काही हजारपटींनी मोठा असल्याचे लक्षात येणार आहे. या घोटाळ्याची चर्चा आता भारताएवढीच फ्रान्समध्येही होत आहे आणि फ्रँकोईस होलेन्डे यांनीच त्यात भारत सरकारने घुसविलेल्या दलालाचे नावही उघड केले आहे. या प्रकरणाने मोदींचे सरकार स्वच्छ असल्याचा व ते ‘न खाणारे व खाऊ न देणारे’ असल्याचा विश्वासच जमीनदोस्त झाला आहे. सर्वोच्च न्यायालयासमोर येणारी कागदपत्रे, त्यातील सारेच खरेखोटे देशासमोर आणतील, तेव्हा त्याचा होणारा गदारोळ आणखी मोठा असेल. आगामी निवडणुकीतील प्रमुख मुद्दाही तोच असेल, हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. निवडणूक कशीही होवो. मात्र, या सौद्यातील गुन्हेगार न्यायासनासमोर येणे व त्यांनी देशाची केलेली फसवणूक सा-यांना समजणे आवश्यक व देशहिताचे आहे. मनात आणले, तर एखादे नेतृत्व केवढ्या मोठ्या घोटाळ्यावर पांघरूण घालून स्वच्छतेचा आव आणू शकते, हे या प्रकरणाने सा-यांच्या लक्षात आणून दिले आहे. हे पांघरूण घातले जाणे व त्यात दडलेले पाप उघड होणे, हीच देशाची न्यायालयांकडून अपेक्षा आहे.

टॅग्स :Rafale Dealराफेल डील