शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

राजकारणातील ‘शितप पॅटर्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:50 IST

घाटकोपर येथील ‘साईदर्शन’ इमारत पडण्यास व १७ निष्पाप नागरिकांचे बळी घेण्यास कारणीभूत असलेला सुनील शितप हा एकेकाळी हारफुले विकण्याचा किरकोळ व्यवसाय करीत होता.

घाटकोपर येथील ‘साईदर्शन’ इमारत पडण्यास व १७ निष्पाप नागरिकांचे बळी घेण्यास कारणीभूत असलेला सुनील शितप हा एकेकाळी हारफुले विकण्याचा किरकोळ व्यवसाय करीत होता. तेथून त्याने कोट्यधीश होण्यापर्यंत कशी मजल मारली, याच्या सुरस व भयचकित करणाºया कहाण्या आता कानांवर येत आहेत. मात्र, अशा पद्धतीने कायदा धाब्यावर बसवून माफिया मार्गाने गडगंज संपत्ती कमावणारा शितप हा एकटा नाही. शहरीकरणाचा परीसस्पर्श झालेल्या व आता स्मार्ट होण्याची स्वप्ने पाहणाºया अनेक छोट्यामोठ्या शहरांमधील गल्लोगल्ली असे शितप उदयाला आले आहेत. किंबहुना, राजकारणातील यशाचा हा एक ‘शितप पॅटर्न’ गेल्या काही वर्षांत उदयाला आला आहे. घाटकोपरला झोपडपट्टीत वास्तव्य करणाºया शितपचे एकेकाळी दोनवेळा जेवणाखाण्याचे वांधे होते. सुरुवातीला कुटुंबाचा चरितार्थ चालवण्याकरिता त्याने हारफुले विकली, घरोघरी पेपर टाकले. त्यानंतर, त्याला ‘राजकारण’ नावाचा जादूचा दिवा सापडला. कार्यकर्ता म्हणून मिरवणाºया शितपने अल्पावधीत केबल व्यवसायात हातपाय पसरले. केबलमाफिया म्हणून प्राथमिक शिक्षण घेतल्यावर भूमाफियाची पदवी पदरात पाडून घेतली की, राजकारणातील पत आपोआप वाढते. शितपने घाटकोपर परिसरात भूमाफिया म्हणून आपली ओळख निर्माण केल्यावर आपसूक त्याची दहशत निर्माण झाली. महापालिकांवर सत्ता मिळविण्याकरिता जेव्हा शिवसेना-भाजपा या दोन सत्ताधारी पक्षांमध्ये कमालीची स्पर्धा लागते, तेव्हा बख्खळ पैसा खर्च करून निवडून येणारे शितपसारखे उमेदवार सर्वच पक्षांना लागतात. त्यामुळे शितपची पत्नी आशा हिला महापालिकेची उमेदवारी देताना सुनीलची पत व दहशत पाहूनच तिला शिवसेनेने उमेदवारी दिली, हे उघड आहे. राज्यातील प्रस्थापित नेत्यांना आव्हान देण्याकरिता शिवसेना उभी राहिली व तिने भाजीविक्रेते, डोअरकिपर, रिक्षावाले अशा अनेक बिनचेहºयांच्या मंडळींना राजकारणात ओळख प्राप्त करून दिली. ही मंडळी राजकारणात यशस्वी झाली आणि त्यांनी पैसाअडका जमवला. मात्र, गेल्या काही वर्षांत शिवसेनेतील सामान्य मध्यमवर्गीय शिवसैनिक पार लोप पावला असून शितपसारखे इन्स्टंट श्रीमंत माफिया मोठे झाले आहेत. ही परिस्थिती जशी शिवसेनेत आहे, तशीच ती भाजपात वाढत आहे. मागील सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहखाते असल्याने अनेक शितप त्या पक्षाच्या वळचणीला आले होते. आता ते भाजपाकडे धाव घेत आहेत.