शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
5
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
6
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
7
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
8
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
9
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
10
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
11
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
12
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
13
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
14
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
15
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
16
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
17
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
18
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
19
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
20
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रज्ञा-प्रतिभेचे प्रश्नोत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:23 IST

प्रज्ञा आणि प्रतिभा ही मानवी जीवनाला लाभलेली निसर्गत: देणगी आहे. कल्पनाशक्ती आणि तर्क यांच्या पलीकडे जाऊन मन थक्क होऊन जाते. राजाभोज हा प्रतिभावान राजा होता तर माघ हा प्रज्ञा-प्रतिभेचे वरदान लाभलेला विरग्ध महाकवी होता. एकदा दोघेही अरण्यातील वनश्री पहात पहात वाटचाल करत होते. दोघांचाही काव्यशास्त्र विनोद चालू होता.

- डॉ. रामचंद्र देखणेप्रज्ञा आणि प्रतिभा ही मानवी जीवनाला लाभलेली निसर्गत: देणगी आहे. कल्पनाशक्ती आणि तर्क यांच्या पलीकडे जाऊन मन थक्क होऊन जाते. राजाभोज हा प्रतिभावान राजा होता तर माघ हा प्रज्ञा-प्रतिभेचे वरदान लाभलेला विरग्ध महाकवी होता. एकदा दोघेही अरण्यातील वनश्री पहात पहात वाटचाल करत होते. दोघांचाही काव्यशास्त्र विनोद चालू होता. माघाला उगाच अहंकार वाटू लागला की, या अरण्यात राजा भोजला वनश्री इतकीच माझी प्रतिभाही आनंद देत आहे. तेवढ्यात आकाशात ढग दाटून आले. विजा चमकू लागल्या. अंधार पडला आणि पाऊस पडू लागला. बाजूला एक झोपडी होती. दोघेही झोपडीपाशी आले. आत एक म्हातारी बसली होती. पावसात भिजू नये म्हणून दोघेही आत गेले आणि म्हातारीला विचारले, ‘आजीबाई हा रस्ता कुठे जातो? ‘बाबांनो रस्ता कुठे जात नाही, या रस्त्यावरून चालणारा फक्त जात असतो. आजीच्या उत्तराने दोघेही अवाक् झाले आणि पुढे म्हणाले, ‘आजी आम्ही प्रवासी आहोत’ ‘बाबारे प्रवासी दोनच आहेत. एक सूर्य आणि दुसरा चंद्र. अखंड प्रवास करून जगाला प्रकाश देतात’ या उत्तरापुढे आता काय म्हणावे? राजा म्हणाला, ‘आजी आम्ही पाहुणे आहोत’ ‘पाहुणे तर दोनच आहेत. एक धन आणि दुसरे यौवन’ ‘आजी मी राजा आहे आणि हा पंडित’ ‘काही तरीच काय सांगता? राजा फक्त इंद्र आणि मृत्यू आहे. त्याच्या नियंत्रणात सर्व आहे आणि पंडित म्हणाल तर एक बृहस्पती आणि दुसरा शुक्राचार्य’‘आजीबाई आम्ही मजूर आहोत’‘खोटे बोलू नकोस. मजूरही दोघेच एक भूमी आणि दुसरी स्त्री. आयुष्यभर दुसऱ्यांचे भार वाहते’... ‘आजी आम्ही हरलो’‘जगात दोघेच हरलेत. एक कर्जदार आणि दुसरा मुलीचा बाप...’ प्रज्ञावान महाकवी आणि व्यासंगी राजाही आजीच्या उत्तराने निरुत्तर झाला. भोजराजाच्या दरबारातच केवळ प्रज्ञावंत माणसे नव्हती तर त्याच्या राज्यातील सामान्य झोपडीतली माणसेही किती प्रतिभावान होती. जर समजा ही घटना आजच्या वर्तमानात घडली असती तर... राजा आणि माघ आजीबाईला म्हणाले असते.‘आजीबाई तुमच्या उत्तराने आम्ही निर्भय झालो. त्यावर आजीने भाष्य केले असते, ‘निर्भय तर दोघेच असतात. एक साहित्यिक आणि दुसरा पत्रकार’ खरंतर दोघेही जीवनाचे भाष्यकार. साहित्यिकाची लेखणी ही धनुष्यासारखी असते तर पत्रकाराची लेखणी ही बाणासारखी.

टॅग्स :Natureनिसर्गnewsबातम्या