शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

दर्जेदार शिक्षणासाठी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 06:00 IST

शिक्षणाचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी स्पर्धा वाढावी, म्हणून केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने सहा उच्चशिक्षण संस्थांना श्रेष्ठत्वाचा दर्जा जाहीर केला़ यात तीन खासगी व तीन सरकारी संस्था आहेत़ यातील सरकारी संस्थांना एक हजार कोटींचे अनुदान मिळणार आहे.

शिक्षणाचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी स्पर्धा वाढावी, म्हणून केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने सहा उच्चशिक्षण संस्थांना श्रेष्ठत्वाचा दर्जा जाहीर केला़ यात तीन खासगी व तीन सरकारी संस्था आहेत़ यातील सरकारी संस्थांना एक हजार कोटींचे अनुदान मिळणार आहे़ शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी निकोप स्पर्धा हवी़ पण या स्पर्धेने उद्दिष्ट कितपत साध्य होईल याविषयी मात्र साशंकता आहे़ गेल्या महिन्यात जगभरातील दर्जेदार विद्यापीठांची यादी जाहीर झाली़ या यादीत पहिल्या २०० मध्ये भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश नव्हता़ यावरून आपल्या शिक्षणव्यवस्थेचे चित्रच समोर आले़ गेल्या काही वर्षांत शिक्षणाचा जो बाजार मांडला गेला; त्याला सरकारी पाठराखणही मिळाली, ही यादी ही त्याची फलश्रुती म्हणायला हवी़ शिक्षणाच्या दर्जापेक्षा पैसे कमवण्याचे मशीन म्हणून या व्यवस्थेकडे पाहिले गेले़ त्यातून केवळ शैक्षणिक संस्थांची संख्या वाढली, त्यांचा दर्जा मात्र घसरत गेला़ त्यावर उपाय म्हणून श्रेष्ठत्वाचा दर्जा ठरवण्यासाठी समिती स्थापन केली गेली़ या समितीला दहा-दहा संस्था निवडायच्या होत्या़ त्याही मिळाल्या नाहीत़ यावरून श्रेष्ठत्व सिद्ध झालेच आहे़ खरेतर, शिक्षणात मूलभूत बदल करण्याबाबत नेहमीच चर्चा होते़ पण त्यात कार्यवाहीचे गांभीर्य नसते़ त्यामुळे ही बाजारू शिक्षणव्यवस्था रुंदावत गेली़ ही व्यवस्था एका रात्रीत बदलणे शक्य नाही़ त्यासाठी प्राथमिक शिक्षणाचा पायाही मजबूत करावा लागेल़ अर्थात आपली राजकीय इच्छाशक्ती हा भाग येतोच़ अलीकडे तर इतिहासाची पाने बदलण्याचा अट्टाहास होताना दिसतो आहे़ त्यामुळे ही व्यवस्था बदलायला वेळ लागेल़ तरीही या श्रेष्ठत्वाच्या मुद्द्यामुळे पुन्हा एकदा नवी शिक्षणक्रांती करण्याची मानसिकता तयार व्हायला मदत होईल, हे नक्की़ पैसा की दर्जा, हे ठरविताना काळाच्या कसोटीवर दर्जाच उपयोगी ठरतो, हे यापुढे तरी शिक्षणसंस्थांना उमगायला हवे. त्यातूनच जागतिक स्तरावरचा विचार करायला सुरुवात होते़ केंद्रीय मनुष्यबळमंत्री प्रकाश जावडेकर यांनी जिओच्या प्रस्तावित शिक्षणसंस्थेचे नाव यात घुसडून नवा वाद निर्माण केला आणि श्रेष्ठत्वाच्या दर्जाची चर्चा भलतीकडे भरकटत गेली़ नंतर त्यावर खुलासे झाले. पण या वादामुळे मूळ विषयातले गांभीर्य पुसट झाले़ ते व्हायला नको होते़ केंद्राच्या या श्रेष्ठत्वाच्या यादीचे निकष सर्वांनी समजावून घेत त्यानुसार वाटचाल करता येईल का, याचा विचार करण्याची वेळ आली आहे़ त्यातून शिक्षण देण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल होतील आणि जेव्हा जागतिक निकषांवर आपल्या शिक्षणसंस्था तपासल्या जातील तेव्हा आतासारखी परिस्थिती पुन्हा वाट्याला येणार नाही. बदलत्या जागतिक रचनेचा, गरजेचा विचार करून विद्यार्थी कौशल्यावर आधारित दर्जेदार शिक्षणाची व्याख्या करणे ही काळाची गरज आहे़ केवळ नोकरीसाठीचे ‘प्रॉडक्ट’ तयार करण्यापेक्षा निर्मितीक्षम विद्यार्थी घडविण्याची ताकद नव्या रचनेत व्हायला हवी, तरच दर्जाच्या रस्त्यावर आपला प्रवास सुरू होईल़

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रGovernmentसरकार