शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
6
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
7
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
8
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
9
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
10
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
11
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
12
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
13
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
14
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
15
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
16
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
17
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
18
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
19
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
20
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)

दर्जेदार शिक्षणासाठी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 06:00 IST

शिक्षणाचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी स्पर्धा वाढावी, म्हणून केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने सहा उच्चशिक्षण संस्थांना श्रेष्ठत्वाचा दर्जा जाहीर केला़ यात तीन खासगी व तीन सरकारी संस्था आहेत़ यातील सरकारी संस्थांना एक हजार कोटींचे अनुदान मिळणार आहे.

शिक्षणाचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी स्पर्धा वाढावी, म्हणून केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने सहा उच्चशिक्षण संस्थांना श्रेष्ठत्वाचा दर्जा जाहीर केला़ यात तीन खासगी व तीन सरकारी संस्था आहेत़ यातील सरकारी संस्थांना एक हजार कोटींचे अनुदान मिळणार आहे़ शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी निकोप स्पर्धा हवी़ पण या स्पर्धेने उद्दिष्ट कितपत साध्य होईल याविषयी मात्र साशंकता आहे़ गेल्या महिन्यात जगभरातील दर्जेदार विद्यापीठांची यादी जाहीर झाली़ या यादीत पहिल्या २०० मध्ये भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश नव्हता़ यावरून आपल्या शिक्षणव्यवस्थेचे चित्रच समोर आले़ गेल्या काही वर्षांत शिक्षणाचा जो बाजार मांडला गेला; त्याला सरकारी पाठराखणही मिळाली, ही यादी ही त्याची फलश्रुती म्हणायला हवी़ शिक्षणाच्या दर्जापेक्षा पैसे कमवण्याचे मशीन म्हणून या व्यवस्थेकडे पाहिले गेले़ त्यातून केवळ शैक्षणिक संस्थांची संख्या वाढली, त्यांचा दर्जा मात्र घसरत गेला़ त्यावर उपाय म्हणून श्रेष्ठत्वाचा दर्जा ठरवण्यासाठी समिती स्थापन केली गेली़ या समितीला दहा-दहा संस्था निवडायच्या होत्या़ त्याही मिळाल्या नाहीत़ यावरून श्रेष्ठत्व सिद्ध झालेच आहे़ खरेतर, शिक्षणात मूलभूत बदल करण्याबाबत नेहमीच चर्चा होते़ पण त्यात कार्यवाहीचे गांभीर्य नसते़ त्यामुळे ही बाजारू शिक्षणव्यवस्था रुंदावत गेली़ ही व्यवस्था एका रात्रीत बदलणे शक्य नाही़ त्यासाठी प्राथमिक शिक्षणाचा पायाही मजबूत करावा लागेल़ अर्थात आपली राजकीय इच्छाशक्ती हा भाग येतोच़ अलीकडे तर इतिहासाची पाने बदलण्याचा अट्टाहास होताना दिसतो आहे़ त्यामुळे ही व्यवस्था बदलायला वेळ लागेल़ तरीही या श्रेष्ठत्वाच्या मुद्द्यामुळे पुन्हा एकदा नवी शिक्षणक्रांती करण्याची मानसिकता तयार व्हायला मदत होईल, हे नक्की़ पैसा की दर्जा, हे ठरविताना काळाच्या कसोटीवर दर्जाच उपयोगी ठरतो, हे यापुढे तरी शिक्षणसंस्थांना उमगायला हवे. त्यातूनच जागतिक स्तरावरचा विचार करायला सुरुवात होते़ केंद्रीय मनुष्यबळमंत्री प्रकाश जावडेकर यांनी जिओच्या प्रस्तावित शिक्षणसंस्थेचे नाव यात घुसडून नवा वाद निर्माण केला आणि श्रेष्ठत्वाच्या दर्जाची चर्चा भलतीकडे भरकटत गेली़ नंतर त्यावर खुलासे झाले. पण या वादामुळे मूळ विषयातले गांभीर्य पुसट झाले़ ते व्हायला नको होते़ केंद्राच्या या श्रेष्ठत्वाच्या यादीचे निकष सर्वांनी समजावून घेत त्यानुसार वाटचाल करता येईल का, याचा विचार करण्याची वेळ आली आहे़ त्यातून शिक्षण देण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल होतील आणि जेव्हा जागतिक निकषांवर आपल्या शिक्षणसंस्था तपासल्या जातील तेव्हा आतासारखी परिस्थिती पुन्हा वाट्याला येणार नाही. बदलत्या जागतिक रचनेचा, गरजेचा विचार करून विद्यार्थी कौशल्यावर आधारित दर्जेदार शिक्षणाची व्याख्या करणे ही काळाची गरज आहे़ केवळ नोकरीसाठीचे ‘प्रॉडक्ट’ तयार करण्यापेक्षा निर्मितीक्षम विद्यार्थी घडविण्याची ताकद नव्या रचनेत व्हायला हवी, तरच दर्जाच्या रस्त्यावर आपला प्रवास सुरू होईल़

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रGovernmentसरकार