शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
2
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ
3
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले
5
“कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी, ५ वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल”: नाना पटोले
6
"मी ज्या झोपडपट्टीतून आलोय...", दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना सिद्धार्थ जाधवची सणसणीत चपराक
7
गुजरातविरुद्ध केएल राहुलचा विक्रमी षटकार; रोहित, विराट आणि धोनीच्या पंक्तीत झाला सामील
8
'तो' प्रवास ठरला शेवटचा! गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार कालव्यात पडली, एअर होस्टेसचा मृत्यू
9
'हिंदू आहोत हा आमचा गुन्हा आहे का?', पश्चिम बंगाल हिंसाचार बाधित महिलांचा भावनिक सवाल
10
Vastu Tips: पायपुसण्याखाली ठेवा कापराच्या दोन वड्या, होतील चमत्कारिक फायदे!
11
“आम्ही कुटुंब फोडणारे नाही, राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच”: हर्षवर्धन सपकाळ
12
"किती दिवस स्वप्नीलसाठी फक्त टाळ्या वाजवायच्या?"; सोनाली कुलकर्णीचं वक्तव्य चर्चेत
13
दुहेरी हत्याकांडाने छत्रपती संभाजीनगर हादरलं; दुचाकीच्या वादातून दोघांची दगडाने ठेचून हत्या
14
संतापजनक! ज्ञानाच्या मंदिरात शिक्षकानं विद्यार्थ्यांना पाजली दारू, पाहा व्हिडिओ
15
‘२.५ कोटी रुपये पगार असावा आणि...!’ भावी नवऱ्याकडून तरुणीच्या अपेक्षांची मोठी लिस्ट, व्हायरल पोस्ट चर्चेत
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...
17
“...म्हणून त्यांनी माझे सरकार पाडले”; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले, सांगितली Inside Story
18
हे साफ खोटं, ही FAKE NEWS आहे...; 'डिंपल गर्ल' प्रिती झिंटा असं का म्हणाली? प्रकरण काय
19
Astro Tips: 'या' उपायामुळे सोमवार २१ एप्रिलचा दिवस तुमच्या आयुष्यात संस्मरणीय ठरू शकतो!
20
३ तास समजावल्यानंतरही, सासूचे मत बदलले नाही, होणाऱ्या जावयाकडेच राहणार; मुलीच्या लग्नाआधी झाली होती फरार

पुस्तकं सांगतात गोष्ट: दिनकर मनवरांची 'वामांगी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 10:58 IST

फारच कमी पुरूष लेखकांना बाई लिहिता आलेली आहे. तिचं म्हणणं संपूर्ण ताकदीनिशी मांडता आलेलं आहे. कवी दिनकर मनवर अशा लेखकांपैकी एक आहेत. स्वतःला वजा करून रख्मायचा आवाज होण्याची किमया त्यांना साधली आहे...

अक्षय शिंपी

पंढरपूरचे विठ्ठल-रखुमाई अवघ्या महाराष्ट्राचं दैवत. चारचौघांसारखेच दिसणारे, दोनच हात -दोनच पाय असणारे, काळा-सावळा रंग असणारे हे दोघे मराठी माणसाला आपापल्या घरातील सदस्यच वाटत आले आहेत. नुसते सदस्यच नव्हे तर कुटुंबप्रमुख. सुख-दुःखं, हार-जीत, गा-हाणी, साकडे सारं... सारं... याच जोडप्याच्या पायांवर आणून घातलं जातं. पंढरपुरात एक अर्थपूर्ण परंपरा आहे, विठ्ठल-रखुमाईला पत्र लिहिण्याची. त्यातून आपापलं क्षेमकुशल, अडचणी कळवण्याची. रात्र झाली की हे जोडपं आपापली पत्रं चंद्रभागेच्या काठी बसून परस्परांना वाचून दाखवतात म्हणे। असं हे या दोघांचं स्थान!! अविचल. पण, हे जोडपं एकत्र नांदत नाही.

पंढरपुरात त्यांची घरं वेगवेगळी. इतरांसाठी हे दोघे एकाच विटेवर उभे असले तरीही आपापल्या पायांखाली आपापली स्वतंत्र वीट राखून आहेत. विठोबा रख्मायच्या घरचा उंबरा ओलांडत नाही, की रख्माय विठोबाच्या घरच्या भिंतींना कान लावत नाही. दोघांची भेट बाहेर. नदीकाठी.

दोघांबद्दलच्या अनेक आख्यायिका महाराष्ट्राला तोंडपाठ. देवत्वाची झूल फेकून मातीचे पाय असणाऱ्या माणसांसारखंच यांचं वर्तन. लंगोट, कांबळ आणि काठी अशा वेशात विठ्ठल तर साधं नववार पातळ अन् गळ्यात डोरलं ल्यालेली रख्माय ही साध्या कष्टकरी वर्गातल्या स्त्री-पुरुषांची प्रातिनिधिक रूपं. यांच्यावर पराकोटीचा जीवही लावता येतो आणि कडाडून भांडणंही करता येतात. हे दोघेही परस्परांशी भांडूनच अलग राहिलेत, की लव्ह - हेट रिलेशनशिप. विठ्ठलाबद्दल जेवढं कवित्व झालं आहे तुलनेत रखुमाई क्वचितच उगवून आलेली दिसते. अरुण कोलटकरांची 'वामांगी' कविता आपल्या सर्वांच्या जवळची आहे. रख्माय आणि कवीचं संभाषण असलं तरी रख्मायचं स्वगतच आहे ते ! आत आत खोलवर दडवलेलं काहीतरी भस्सकन् उजेडात आलेलं आहे तीत! 'वामांगी' वाचल्यानंतर स्त्री असो वा पुरुष कुणीही व्याकूळ होतो. वामांगी. डाव्या अंगाला असणारी. फक्त हाताला हात लावून 'मम' म्हणणारी. कमी महत्त्वाची? ठाऊक नाही. मराठीत 'वाम' शब्द बऱ्या अर्थछटा घेऊन येत नाही....

कवी दिनकर मनवर हे मराठी कविता विश्वातलं अग्रणी नाव. स्वतःची स्वतंत्र नाममुद्रा असणाऱ्या कविता हे ठसठशीत वैशिष्ट्य. फ़ैज़ अहमद फ़ैज़ची शायरी जशी दुरूनही ओळखता येते तशीच मनवरांची कविताही आहे, असं म्हणण्यात कुठलीही अतिशयोक्ती नसावी.

इथे रख्माय भरभरून बोलते. जणू माहेरचं माणूस भेटावं तशी. चिडते, हताश होते, हक्क सांगते. मनवरांशी बोलता-बोलता विठ्ठलाशीही बोलते. प्रश्न विचारते. या प्रश्नांची उत्तरं आहेत काय आपल्याकडे? असलीच तर ती द्यायची हिंमत आहे काय? असे प्रश्न रख्मायची स्वगतं वाचता-ऐकताना पडत राहतात.

रख्माय नद्यांना आवाहन करून म्हणते -या गं या वाहत सगळ्याजणी थेंबाथेंबानं भरा ओटी माझी माझ्या एकटीनं भागत नाही तहान या वाळवंटाची.