शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

पुस्तकं सांगतात गोष्ट: दिनकर मनवरांची 'वामांगी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 10:58 IST

फारच कमी पुरूष लेखकांना बाई लिहिता आलेली आहे. तिचं म्हणणं संपूर्ण ताकदीनिशी मांडता आलेलं आहे. कवी दिनकर मनवर अशा लेखकांपैकी एक आहेत. स्वतःला वजा करून रख्मायचा आवाज होण्याची किमया त्यांना साधली आहे...

अक्षय शिंपी

पंढरपूरचे विठ्ठल-रखुमाई अवघ्या महाराष्ट्राचं दैवत. चारचौघांसारखेच दिसणारे, दोनच हात -दोनच पाय असणारे, काळा-सावळा रंग असणारे हे दोघे मराठी माणसाला आपापल्या घरातील सदस्यच वाटत आले आहेत. नुसते सदस्यच नव्हे तर कुटुंबप्रमुख. सुख-दुःखं, हार-जीत, गा-हाणी, साकडे सारं... सारं... याच जोडप्याच्या पायांवर आणून घातलं जातं. पंढरपुरात एक अर्थपूर्ण परंपरा आहे, विठ्ठल-रखुमाईला पत्र लिहिण्याची. त्यातून आपापलं क्षेमकुशल, अडचणी कळवण्याची. रात्र झाली की हे जोडपं आपापली पत्रं चंद्रभागेच्या काठी बसून परस्परांना वाचून दाखवतात म्हणे। असं हे या दोघांचं स्थान!! अविचल. पण, हे जोडपं एकत्र नांदत नाही.

पंढरपुरात त्यांची घरं वेगवेगळी. इतरांसाठी हे दोघे एकाच विटेवर उभे असले तरीही आपापल्या पायांखाली आपापली स्वतंत्र वीट राखून आहेत. विठोबा रख्मायच्या घरचा उंबरा ओलांडत नाही, की रख्माय विठोबाच्या घरच्या भिंतींना कान लावत नाही. दोघांची भेट बाहेर. नदीकाठी.

दोघांबद्दलच्या अनेक आख्यायिका महाराष्ट्राला तोंडपाठ. देवत्वाची झूल फेकून मातीचे पाय असणाऱ्या माणसांसारखंच यांचं वर्तन. लंगोट, कांबळ आणि काठी अशा वेशात विठ्ठल तर साधं नववार पातळ अन् गळ्यात डोरलं ल्यालेली रख्माय ही साध्या कष्टकरी वर्गातल्या स्त्री-पुरुषांची प्रातिनिधिक रूपं. यांच्यावर पराकोटीचा जीवही लावता येतो आणि कडाडून भांडणंही करता येतात. हे दोघेही परस्परांशी भांडूनच अलग राहिलेत, की लव्ह - हेट रिलेशनशिप. विठ्ठलाबद्दल जेवढं कवित्व झालं आहे तुलनेत रखुमाई क्वचितच उगवून आलेली दिसते. अरुण कोलटकरांची 'वामांगी' कविता आपल्या सर्वांच्या जवळची आहे. रख्माय आणि कवीचं संभाषण असलं तरी रख्मायचं स्वगतच आहे ते ! आत आत खोलवर दडवलेलं काहीतरी भस्सकन् उजेडात आलेलं आहे तीत! 'वामांगी' वाचल्यानंतर स्त्री असो वा पुरुष कुणीही व्याकूळ होतो. वामांगी. डाव्या अंगाला असणारी. फक्त हाताला हात लावून 'मम' म्हणणारी. कमी महत्त्वाची? ठाऊक नाही. मराठीत 'वाम' शब्द बऱ्या अर्थछटा घेऊन येत नाही....

कवी दिनकर मनवर हे मराठी कविता विश्वातलं अग्रणी नाव. स्वतःची स्वतंत्र नाममुद्रा असणाऱ्या कविता हे ठसठशीत वैशिष्ट्य. फ़ैज़ अहमद फ़ैज़ची शायरी जशी दुरूनही ओळखता येते तशीच मनवरांची कविताही आहे, असं म्हणण्यात कुठलीही अतिशयोक्ती नसावी.

इथे रख्माय भरभरून बोलते. जणू माहेरचं माणूस भेटावं तशी. चिडते, हताश होते, हक्क सांगते. मनवरांशी बोलता-बोलता विठ्ठलाशीही बोलते. प्रश्न विचारते. या प्रश्नांची उत्तरं आहेत काय आपल्याकडे? असलीच तर ती द्यायची हिंमत आहे काय? असे प्रश्न रख्मायची स्वगतं वाचता-ऐकताना पडत राहतात.

रख्माय नद्यांना आवाहन करून म्हणते -या गं या वाहत सगळ्याजणी थेंबाथेंबानं भरा ओटी माझी माझ्या एकटीनं भागत नाही तहान या वाळवंटाची.