शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

पुस्तकं सांगतात गोष्ट: दिनकर मनवरांची 'वामांगी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 10:58 IST

फारच कमी पुरूष लेखकांना बाई लिहिता आलेली आहे. तिचं म्हणणं संपूर्ण ताकदीनिशी मांडता आलेलं आहे. कवी दिनकर मनवर अशा लेखकांपैकी एक आहेत. स्वतःला वजा करून रख्मायचा आवाज होण्याची किमया त्यांना साधली आहे...

अक्षय शिंपी

पंढरपूरचे विठ्ठल-रखुमाई अवघ्या महाराष्ट्राचं दैवत. चारचौघांसारखेच दिसणारे, दोनच हात -दोनच पाय असणारे, काळा-सावळा रंग असणारे हे दोघे मराठी माणसाला आपापल्या घरातील सदस्यच वाटत आले आहेत. नुसते सदस्यच नव्हे तर कुटुंबप्रमुख. सुख-दुःखं, हार-जीत, गा-हाणी, साकडे सारं... सारं... याच जोडप्याच्या पायांवर आणून घातलं जातं. पंढरपुरात एक अर्थपूर्ण परंपरा आहे, विठ्ठल-रखुमाईला पत्र लिहिण्याची. त्यातून आपापलं क्षेमकुशल, अडचणी कळवण्याची. रात्र झाली की हे जोडपं आपापली पत्रं चंद्रभागेच्या काठी बसून परस्परांना वाचून दाखवतात म्हणे। असं हे या दोघांचं स्थान!! अविचल. पण, हे जोडपं एकत्र नांदत नाही.

पंढरपुरात त्यांची घरं वेगवेगळी. इतरांसाठी हे दोघे एकाच विटेवर उभे असले तरीही आपापल्या पायांखाली आपापली स्वतंत्र वीट राखून आहेत. विठोबा रख्मायच्या घरचा उंबरा ओलांडत नाही, की रख्माय विठोबाच्या घरच्या भिंतींना कान लावत नाही. दोघांची भेट बाहेर. नदीकाठी.

दोघांबद्दलच्या अनेक आख्यायिका महाराष्ट्राला तोंडपाठ. देवत्वाची झूल फेकून मातीचे पाय असणाऱ्या माणसांसारखंच यांचं वर्तन. लंगोट, कांबळ आणि काठी अशा वेशात विठ्ठल तर साधं नववार पातळ अन् गळ्यात डोरलं ल्यालेली रख्माय ही साध्या कष्टकरी वर्गातल्या स्त्री-पुरुषांची प्रातिनिधिक रूपं. यांच्यावर पराकोटीचा जीवही लावता येतो आणि कडाडून भांडणंही करता येतात. हे दोघेही परस्परांशी भांडूनच अलग राहिलेत, की लव्ह - हेट रिलेशनशिप. विठ्ठलाबद्दल जेवढं कवित्व झालं आहे तुलनेत रखुमाई क्वचितच उगवून आलेली दिसते. अरुण कोलटकरांची 'वामांगी' कविता आपल्या सर्वांच्या जवळची आहे. रख्माय आणि कवीचं संभाषण असलं तरी रख्मायचं स्वगतच आहे ते ! आत आत खोलवर दडवलेलं काहीतरी भस्सकन् उजेडात आलेलं आहे तीत! 'वामांगी' वाचल्यानंतर स्त्री असो वा पुरुष कुणीही व्याकूळ होतो. वामांगी. डाव्या अंगाला असणारी. फक्त हाताला हात लावून 'मम' म्हणणारी. कमी महत्त्वाची? ठाऊक नाही. मराठीत 'वाम' शब्द बऱ्या अर्थछटा घेऊन येत नाही....

कवी दिनकर मनवर हे मराठी कविता विश्वातलं अग्रणी नाव. स्वतःची स्वतंत्र नाममुद्रा असणाऱ्या कविता हे ठसठशीत वैशिष्ट्य. फ़ैज़ अहमद फ़ैज़ची शायरी जशी दुरूनही ओळखता येते तशीच मनवरांची कविताही आहे, असं म्हणण्यात कुठलीही अतिशयोक्ती नसावी.

इथे रख्माय भरभरून बोलते. जणू माहेरचं माणूस भेटावं तशी. चिडते, हताश होते, हक्क सांगते. मनवरांशी बोलता-बोलता विठ्ठलाशीही बोलते. प्रश्न विचारते. या प्रश्नांची उत्तरं आहेत काय आपल्याकडे? असलीच तर ती द्यायची हिंमत आहे काय? असे प्रश्न रख्मायची स्वगतं वाचता-ऐकताना पडत राहतात.

रख्माय नद्यांना आवाहन करून म्हणते -या गं या वाहत सगळ्याजणी थेंबाथेंबानं भरा ओटी माझी माझ्या एकटीनं भागत नाही तहान या वाळवंटाची.