शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

पुस्तकं सांगतात गोष्ट: दिनकर मनवरांची 'वामांगी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 10:58 IST

फारच कमी पुरूष लेखकांना बाई लिहिता आलेली आहे. तिचं म्हणणं संपूर्ण ताकदीनिशी मांडता आलेलं आहे. कवी दिनकर मनवर अशा लेखकांपैकी एक आहेत. स्वतःला वजा करून रख्मायचा आवाज होण्याची किमया त्यांना साधली आहे...

अक्षय शिंपी

पंढरपूरचे विठ्ठल-रखुमाई अवघ्या महाराष्ट्राचं दैवत. चारचौघांसारखेच दिसणारे, दोनच हात -दोनच पाय असणारे, काळा-सावळा रंग असणारे हे दोघे मराठी माणसाला आपापल्या घरातील सदस्यच वाटत आले आहेत. नुसते सदस्यच नव्हे तर कुटुंबप्रमुख. सुख-दुःखं, हार-जीत, गा-हाणी, साकडे सारं... सारं... याच जोडप्याच्या पायांवर आणून घातलं जातं. पंढरपुरात एक अर्थपूर्ण परंपरा आहे, विठ्ठल-रखुमाईला पत्र लिहिण्याची. त्यातून आपापलं क्षेमकुशल, अडचणी कळवण्याची. रात्र झाली की हे जोडपं आपापली पत्रं चंद्रभागेच्या काठी बसून परस्परांना वाचून दाखवतात म्हणे। असं हे या दोघांचं स्थान!! अविचल. पण, हे जोडपं एकत्र नांदत नाही.

पंढरपुरात त्यांची घरं वेगवेगळी. इतरांसाठी हे दोघे एकाच विटेवर उभे असले तरीही आपापल्या पायांखाली आपापली स्वतंत्र वीट राखून आहेत. विठोबा रख्मायच्या घरचा उंबरा ओलांडत नाही, की रख्माय विठोबाच्या घरच्या भिंतींना कान लावत नाही. दोघांची भेट बाहेर. नदीकाठी.

दोघांबद्दलच्या अनेक आख्यायिका महाराष्ट्राला तोंडपाठ. देवत्वाची झूल फेकून मातीचे पाय असणाऱ्या माणसांसारखंच यांचं वर्तन. लंगोट, कांबळ आणि काठी अशा वेशात विठ्ठल तर साधं नववार पातळ अन् गळ्यात डोरलं ल्यालेली रख्माय ही साध्या कष्टकरी वर्गातल्या स्त्री-पुरुषांची प्रातिनिधिक रूपं. यांच्यावर पराकोटीचा जीवही लावता येतो आणि कडाडून भांडणंही करता येतात. हे दोघेही परस्परांशी भांडूनच अलग राहिलेत, की लव्ह - हेट रिलेशनशिप. विठ्ठलाबद्दल जेवढं कवित्व झालं आहे तुलनेत रखुमाई क्वचितच उगवून आलेली दिसते. अरुण कोलटकरांची 'वामांगी' कविता आपल्या सर्वांच्या जवळची आहे. रख्माय आणि कवीचं संभाषण असलं तरी रख्मायचं स्वगतच आहे ते ! आत आत खोलवर दडवलेलं काहीतरी भस्सकन् उजेडात आलेलं आहे तीत! 'वामांगी' वाचल्यानंतर स्त्री असो वा पुरुष कुणीही व्याकूळ होतो. वामांगी. डाव्या अंगाला असणारी. फक्त हाताला हात लावून 'मम' म्हणणारी. कमी महत्त्वाची? ठाऊक नाही. मराठीत 'वाम' शब्द बऱ्या अर्थछटा घेऊन येत नाही....

कवी दिनकर मनवर हे मराठी कविता विश्वातलं अग्रणी नाव. स्वतःची स्वतंत्र नाममुद्रा असणाऱ्या कविता हे ठसठशीत वैशिष्ट्य. फ़ैज़ अहमद फ़ैज़ची शायरी जशी दुरूनही ओळखता येते तशीच मनवरांची कविताही आहे, असं म्हणण्यात कुठलीही अतिशयोक्ती नसावी.

इथे रख्माय भरभरून बोलते. जणू माहेरचं माणूस भेटावं तशी. चिडते, हताश होते, हक्क सांगते. मनवरांशी बोलता-बोलता विठ्ठलाशीही बोलते. प्रश्न विचारते. या प्रश्नांची उत्तरं आहेत काय आपल्याकडे? असलीच तर ती द्यायची हिंमत आहे काय? असे प्रश्न रख्मायची स्वगतं वाचता-ऐकताना पडत राहतात.

रख्माय नद्यांना आवाहन करून म्हणते -या गं या वाहत सगळ्याजणी थेंबाथेंबानं भरा ओटी माझी माझ्या एकटीनं भागत नाही तहान या वाळवंटाची.