शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

पुलवामाचे प्रत्त्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 05:47 IST

दीर्घकाळ छुप्या युद्धाचे तडाखे सोसलेल्या भारताने यशस्वी हवाई हल्ले करत, पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आणि आमच्याही संयमालाही मर्यादा आहेत, याची जाणीव जगाला करून दिली. या हल्ल्याचे स्वागत उन्मादीपणाने नव्हे, तर संयमानेच व्हायला हवे.

काश्मीरच्या पुलवामात दहशतवादी हल्ला झाल्यानंतर, बाराव्या दिवशी भारतीय हवाई दलाने दहशतवाद्यांना चोख धडा शिकविला. १२ मिराज लढाऊ विमानांनी दोन देशांतील नियंत्रण रेषा पार करून, मध्यरात्री जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर एक हजार किलोच्या केलेल्या बॉम्ब वर्षावात जैश ए मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त झाला आणि ३00 पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

भारताच्या सहनशीलतेलाही मर्यादा आहेत, याची जाणीव केवळ २१ मिनिटांच्या या हवाई हल्ल्यातून दहशतवाद्यांची पाठराखण करणाऱ्या पाकिस्तानला अन् आयएसआयला करून देण्यात आली. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना १९७१ साली असे धाडस हवाई दलाने दाखविले होते, पण त्यानंतरच्या कारगील युद्धातही हवाई दलाने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली नव्हती. मंगळवारी तब्बल ४८ वर्षांनी १९७१ची यशस्वी पुनरावृत्ती झाली. प्रतिबंधात्मक स्वरूपाच्या या हल्ल्यात जे अपूर्व धाडस हवाई दलाने दाखविले, त्यासाठी मोदी सरकार आणि हवाई दल हे दोघेही अभिनंदनास पात्र आहेत. पुलवामातील हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान ठार झाले, तेव्हापासून देशभर संतापाची आणि आक्रोशाची लाट उसळली होती. साहजिकच, हवाई दलाच्या आक्रमक कारवाईचे देशभर स्वागत झाले. भाजपाशासित राज्यांत कार्यकर्त्यांच्या उत्साहाला विशेष उधाण आल्याचे चित्र दिसले, तर तमाम विरोधी पक्षांनीही संयत शब्दात हवाई कारवाईचे समर्थन केले.

राहुल गांधींनी हवाई दलाच्या पायलटना सलाम करणारा संदेश विनाविलंब प्रसारित केला. हवाई कारवाईनंतर देशभरात उत्साहित वातावरण अपेक्षितच आहे, परंतु त्यातील अतिउत्साह भारताला घातक ठरू शकतो, याचे भानही ठेवायला हवे. १९९0 पासून पाकिस्तानपुरस्कृत छुप्या दहशतवादी युद्धाचा भारत सामना करतो आहे. २00१ साली संसदेवर झालेला हल्ला आणि २00८ मधील मुंबईतील २६ नोव्हेंबरचा हल्ला ही त्याची ठळक उदाहरणे. काश्मीरसह देशाच्या विविध भागांत तर लहान-मोठे बरेच हल्ले झाले. या रक्तरंजित पार्श्वभूमीवर भारताकडून प्रतिहल्ला आवश्यक होताच. तो यशस्वी झाला. त्याचे स्वागत मात्र संयमानेच व्हायला हवे. ‘भारताने अनावश्यक आक्रमण करून पाकिस्तानच्या सार्वभौमत्वावर हल्ला चढविला. योग्य वेळी पाकिस्तानही त्याचे चोख उत्तर देईल,’ ही पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महंमद कुरेशी यांची प्रतिक्रिया पाहता, स्वभावानुसार प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने खरोखर काही कृती केली, तर उभय देशातला तणाव आणखी वाढतच जाईल आणि त्याची परिणती दोन्ही देशांच्या युद्धात होऊ शकते. मोठ्या प्रमाणात मानवी आणि आर्थिक हानी घडविणारे हे युद्ध कोणालाही परवडणारे नाही.

युद्धात भारत जिंकला, तरी जम्मू-काश्मीरचा प्रश्न लगेच सुटेल, असेही नाही. अर्थात, याचा अर्थ असा नव्हे की, पाकपुरस्कृत छुप्या युद्धाला प्रत्युत्तर देण्यासाठी वांझोट्या शांतता चर्चांखेरीज भारताकडे कोणताही मार्गच नाही. राजकीय स्तरावर काही पर्याय नक्कीच शिल्लक आहेत. गेल्या बारा दिवसांत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने पाकिस्तानवर बऱ्यापैकी दबाव निर्माण करण्यात यश मिळविले. दहशतवादाला पैसा पुरविणाºया स्रोतांची समीक्षा करण्यासाठी ‘फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’ची अलीकडेच पॅरिसला बैठक झाली. त्या कृतीदलाने पाकला काळ्या यादीत टाकल्याने त्या देशाला जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मिळणाºया कर्जावर परिणाम होईल. आर्थिककोंडीत सापडलेल्या पाकिस्तानला ही आर्थिक नाकेबंदी खूप जड जाईल. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या क्षमतेवर बरीच प्रश्नचिन्हे उपस्थित केली गेली. मात्र, हवाई दलाच्या ताज्या हल्ल्याचे नियोजन पूर्णत: लष्करासह अन्य गुप्तचर यंत्रणांच्या अचूक माहितीच्या आधारे करण्यात आले. तरीही भारताच्या सर्व गुप्तचर यंत्रणांना अधिक मजबूत करणे गरजेचे आहे, हे या निमित्ताने अधोरेखित झाले.

लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. सध्याच्या उत्तेजित लोकभावना लक्षात घेऊन निवडणुकीपूर्वी काही करून दाखविण्याचा इरादा आपण समजू शकतो. मात्र, साºया देशाला तो युद्धाकडे ढकलणारा नको. यासाठी सर्वांनाच सतर्क राहावे लागेल.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक