शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Pulwama Attack : पाकिस्तानची नांगी ठेचायलाच हवी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 04:46 IST

देशासाठी प्राणांची आहुती देण्यास सदैव तत्पर असलेल्या प्रत्येक भारतीय जवानाच्या हृदयातील हुंकार या काव्यपंक्तीतून व्यक्त झाला आहे.

विजय दर्डा

मुझे न तन चाहिए, न धन चाहिए। बस अमन से भरा यह वतन चाहिए।

जब तक जिंदा रहूं, इस मातृभूमि के लिए। और जब मरूं तो तिरंगा कफन चाहिए।

देशासाठी प्राणांची आहुती देण्यास सदैव तत्पर असलेल्या प्रत्येक भारतीय जवानाच्या हृदयातील हुंकार या काव्यपंक्तीतून व्यक्त झाला आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेला प्रत्येक सुपुत्र हा भारताचा अमूल्य ठेवा आहे. देशाच्या अशा सुपुत्रांना भ्याड दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य येते तेव्हा देशवासीयांचे रक्त खवळून उठणे स्वाभाविक आहे.

काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ४० जवानांची भारतमातेच्या चरणी प्राणाहुती पडली तेव्हा तमाम भारतीयांप्रमाणेच माझ्याही मनात भावनांचा कल्लोळ उठला. माझे हृदय पिळवटून गेले, राग उफाळून आला आणि शत्रूचा बदला घेण्याची तीव्र भावना मनात दाटून आली. एवढ्या मोठ्या संख्येने जवानांच्या मृत्यूचे अतीव दु:ख होते, सीमेपलीकडून वारंवार होणाऱ्या अशा हल्ल्यांविषयी चीड होती व आपल्या बहाद्दर शिपायांच्या हौतात्म्यानंतरही पाकिस्तानात बसलेल्या दहशवादाच्या पोशिंद्यांना आपण जन्माची अद्दल घडवू शकत नाही, याची मनात क्लेषदायी चुटपूटही होती. भारताने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे कायमचे उद््ध्वस्त करावेत, अशी प्रत्येक भारतीय नागरिकाची पुलवामा हल्ल्यानंतर मनोमन इच्छा आहे.

माझ्या मनात वारंवार असे येते की, ९/११च्या हल्ल्यानंतर अमेरिकेत पुन्हा घुसण्याची दहशतवाद्यांची हिंमत झाली नाही, १९७२ च्या म्युनिक आॅलिम्पिकवरील हल्ल्यानंतर हे दहशतवादी पुन्हा इस्रायलकडे नजर वर करून पाहण्याचे धाडस करू शकत नाहीत, रशियात दहशतवादी हल्ल्यांची संख्या पाच वर्षांत १४४ वरून ३०पर्यंत कमी होऊ शकते तर मग भारत का बरं एवढा अगतिक असावा. सन १९८८ पासून जानेवारी २०१८ पर्यंत दहशतवाद्यांनी भारतात घुसून ४७,२३४ हल्ले केले आहेत. आपल्या लोकशाहीचे सर्वोच्च व सर्वात पवित्र प्रतीक असलेली संसद व आपली अस्मिता असलेला लाल किल्लाही या दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. एवढे होऊनही आपण सीमेपलीकडून चालणारा हा दहशतवाद नेस्तनाबूत करू शकलो नाही की या विषारी सर्पाला दूध पाजणाºया पाकिस्तानची नांगी ठेचू शकलो नाही. १९७२ च्या म्युनिक आॅलिम्पिक स्पर्धांमध्ये ‘ब्लॅक सप्टेंबर’ नावाच्या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेने इस्रायलच्या ११ खेळाडूंची हत्या केली तेव्हा हा छोटासा देश गप्प बसला नाही. या हल्ल्यामागील एकेका दहशतवाद्याला इस्रायलने जगाच्या कानाकोपºयातून हुडकून ठार केले. इस्रायलने लेबेनॉनमध्ये घुसून तेथील दहशतवाद्यांचाही खात्मा केला. १९७६ मध्ये दहशतवाद्यांनी इस्रायलच्या एका विमानाचे अपहरण करून ते युगांडाला नेले तेव्हा युगांडात घुसून इस्रायलने सर्व अपहरणकर्त्यांना ठार करून १०२ प्रवाशांची सुखरूप मुक्तता केली होती.अमेरिकेवरील ९/११च्या हल्ल्याचा सूत्रधार ओसामा बिन लादेनलाही पाकिस्तानने आश्रय दिला होता. अमेरिकेने पाकिस्तानात घुसून लादेनचा काटा काढला. रशियाने चेचेन्यामध्ये जाऊन चेचेन बंडखोरांना यमसदनास धाडले. आपल्या शेजारच्या श्रीलंकेनेही घट्ट पाळेमुळे रोवलेल्या ‘लिट्टे’सारखी बंडखोर संघटना नामशेष केली. दहशतवादाच्या बाबतीत आपणही गौरवास्पद कामगिरी केलेली आहे. १९९० च्या दशकात पंजाबमधील खलिस्तानवाद्यांच्या दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यात पी. व्ही. नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने मोठे यश मिळविले होते. तेव्हा नरसिंह राव सरकारने काश्मीरमध्ये होणाºया सीमापार दहशतवादासही नियंत्रित केले होते. त्यामुळेच ठप्प झालेली लोकशाही प्रक्रिया काश्मीरमध्ये पुन्हा सुरू होऊ शकली होती.

दहशतवाद चिरडून टाकण्यात शाश्वत यश का मिळत नाही, याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. एक तर आपल्या गुप्तहेर यंत्रणेत काही उणिवा आहेत किंवा दहशतवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रांचा वापर करण्यात आपण कमी पडत असू. आपल्याला याचे तंत्र आणि कौशल्य इस्रायल आणि अमेरिका यासारख्या देशांकडून शिकावे लागेल. मी आणखी एक गोष्ट सांगेन. दहशतवाद ही एक राष्ट्रीय समस्या असल्याने तिच्याकडे राजकारणाच्या नजरेतून पाहता कामा नये. पुलवामा हल्ल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह सर्वच विरोधी पक्ष एकजुटीने सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी लखनऊमध्ये ठरलेली पत्रकार परिषद रद्द करून शहिदांना श्रद्धांजली वाहण्याचा एक चांगला पायंडा पाडला. संवेदनशील असे राष्ट्रीय विषय सर्व संमतीनेच हाताळले जायला हवेत.तसेच देशातील प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक अशा सर्वच माध्यमांनी यासारख्या नाजूक वेळी संयम पाळण्याची गरज आहे.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट. सीआरपीएफ, एसआरपी, बीएसएफ, आयटीबीपी यासारख्या निमलष्करी दलांमधील देशासाठी प्राणाहुती देणाºया जवानांना लष्कराप्रमाणे हुतात्म्याचा दर्जा मिळायला हवा.चले गए जो हंसते-हंसते बांध अपने सर पे कफन। उन शहीदों के बलिदान को मेरा शत्-शत् नमन।( लेखक लोकमत समुहात एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन आहेत )

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान