शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पब्लिसीटी स्टंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 09:54 IST

शेतकऱ्यांचा संप हा पब्लिसीटी स्टंट आहे, या केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांच्या वक्तव्याने देशभरातील शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली.

- मिलिंद कुलकर्णी

शेतकऱ्यांचा संप हा पब्लिसीटी स्टंट आहे, या केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांच्या वक्तव्याने देशभरातील शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली. शासकीय, निमशासकीय कर्मचारी, कामगार यांचे संप यापूर्वी झाले आहेत. हे संप या घटकांच्या मागण्यांसाठी झाले. पण अन्नदाता असलेल्या शेतकऱ्याने त्याच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सलग दुसऱ्या वर्षी संप केला तर मंत्री, लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांच्या पोटा त का दुखते? शेतकऱ्यांनी संप करायला नको, असे वाटत असेल तर त्यांचे प्रश्न सोडवा, मागण्या मान्य करा ना! संपाची हेटाळणी, कुचेष्टा कशासाठी? अन्नदाता असूनही शेतकऱ्याने कधी जगावर उपकाराची भाषा केली नाही. स्वत:च्या उत्पादित मालाची किंमत न ठरविता येणारा जगातील एकमेव उत्पादक असूनही वर्षानुवर्षे तो हा अन्यात सहन करीत आहे. कडेलोट झाला म्हणून तो अलीकडे रस्त्यावर उतरला. आंदोलने केली. स्वत: उत्पादित केलेला शेतीमाल रस्त्यावर फेकायला काळजावर दगड ठेवावा लागतो, हे मंत्रिमहोदयांना कसे कळणार? नापिकी, कर्जाचा बोजा असह्य होऊन फास जवळ करणारा शेतकरी पब्लिसीटी स्टंट करीत आहे काय? शेतकऱ्यांची मुले म्हणून प्रशासन आणि शासनामध्ये कार्यरत मंडळी शेतकरी प्रश्नावर उदासीन असल्याचे पाहून शेतकरी चिडला तर तो पब्लिसीटी स्टंट म्हणणार काय?लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक घटकाला अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आहे. स्वत:वरील अन्यायाला लोकशाही मार्गाने वाचा फोडण्याचा शेतकऱ्याला एक नागरीक म्हणून मुलभूत अधिकार असताना मंत्र्यांनी असे बेजबाबदारपणे विधान करणे चुकीचे आहे.शेतकºयांच्या कृतीला पब्लिसीटी स्टंट म्हटले जात असेल तर देशातील राजकीय मंडळी, लोकप्रतिनिधी सर्वसामान्य जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी करीत असलेल्या करामती या ‘पब्लिसीटी स्टंट’ नाहीत काय? राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी यांनी एखादे आंदोलन हाती घेतले आणि तो प्रश्न सोडविला, असे ठळक उदाहरण लगेच आठवते काय? टोलबंदीचे आंदोलन मनसेने हाती घेतले होते. दोन-चार ठिकाणी तोडफोड झाली; पण टोलबंदी कायमस्वरुपी झाली काय? मराठी पाट्यांसाठी ‘खळ्खट्याक’ करण्यात आले, पण सगळ्या पाट्यांवर मराठी अक्षरे उमटली काय? हवामान शास्त्र विभागाच्या भाकिते, अंदाजांविषयी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी फिरकी घेत अंदाज खरा ठरला तर साखर वाटेल असे म्हटले. राष्टÑवादीच्या नेत्याने पुण्यात शास्त्रज्ञांकडे साखर पाठवून दिली. आता पाकिस्तानची साखर आयात करण्यात आल्याचा निषेध म्हणून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गोदामांवर छापा टाकला. आचारसंहिता काळात शासकीय वाहन वापरता येत नाही, म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, महापौर हे स्वत:चे खाजगी वाहन असतानाही ‘रिक्षातून’ जातात आणि स्वत:ची छबी टिपली जाईल, याची काळजी घेतातच ना? शासकीय अधिकारीदेखील शासकीय वाहन सोडून कधी दुचाकीवर फेरफटका मारुन वृत्तपत्र छायाचित्रकारांचे कॅमेरे स्वत:कडे वळवितात ना? पोलीस अधीक्षक स्वत: वाहतूक नियंत्रण करायला उभे राहतात, किंवा एखाद्या दारु अड्डा किंवा जुगार अड्डयावर धाड टाकतात, तेव्हा ‘कर्तव्यकठोर’ अशी प्रतिमा मिडियात निर्माण होतेच ना?आता हे सगळे ‘पब्लिसीटी स्टंट’ आहेत, असे म्हणायचे काय? एखाद्या प्रश्नाकडे लक्ष वेधायचे असेल तर आंदोलन, कारवाई, कृती असे हत्यार वापरावे लागते. तेच शेतकºयांनी वापरले. राजकीय पक्षांनी वापरले तर त्यांची कल्पकता म्हणायची आणि शेतकºयाने वापरले तर पब्लिसीटी स्टंट म्हणायचे, याला काय अर्थ आहे?