शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

सावंत सरकारविरोधात जनमत प्रक्षुब्ध का बनले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 20:31 IST

आमदार खंवटे यांना क्षुल्लक कारणावरून अटक करणाऱ्या सावंत सरकारला लोकशाही व विधानसभा अधिवेशनाची प्रतिष्ठा राखता आली नाही.

- राजू नायकज्या पद्धतीने पर्वरीचे आमदार व गोवा विधानसभेतील एक प्रभावी अपक्ष सदस्य रोहन खंवटे यांना विधानसभा चालू असतानाच रात्री अटक करण्यात आली, तो प्रकार आमच्या लोकशाहीला निश्चितच काळीमा फासणारा आहे. महत्त्वाचे म्हणजे विधानसभा आवारात भाजपच्या एका प्रवक्त्याला ‘पाहून घेऊ’ अशी ‘किरकोळ धमकी’ दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यावरून प्रमोद सावंत सरकार विरोधकांच्या टीकेबद्दल अगदीच असहिष्णू झाले असल्याची प्रचीती येतेच, परंतु भाजप सरकारही केंद्रापासून राज्यांपर्यंत यापुढे टीकाकारांना कसे हाताळणार आहे, याचा अंदाज त्यातून मिळतो.

रोहन खंवटे यांच्यावर अनेक आरोप आहेत. त्यांचे उद्योगधंदे व एकूण राजकीय उचापती पत्रकारांच्या टीकेचे कारण झाले आहेत. परंतु हेसुद्धा खरे आहे की ते विधानसभेतील एक प्रभावी आमदार आहेत. प्रमोद सावंत सरकारविरोधात त्यांनी टीकेची धार कायम ठेवली आहे. वास्तविक २०१७ मध्ये मनोहर पर्रीकर यांचे सरकार स्थापन करण्यात खंवटे यांनी मोलाची भूमिका बजावली. काँग्रेसने निवडणुकीत पाठिंबा दिलेला असतानाही, ते अल्पसंख्य भाजपला पाठिंबा द्यायला गेले व पर्रीकरांना दिल्लीहून बोलवून आणून त्यांनी मुख्यमंत्रिपद बहाल केले. त्यात खंवटे हे महसूलमंत्री होते. परंतु सावंत अधिकारावर येताच त्यांनी अपक्ष खंवटे व इतर प्रादेशिक पक्षांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला व काँग्रेस व महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष फोडले. आज सावंत सरकारला पाठिंबा देणा-या सदस्यांची संख्या २७ आहे व काँग्रेस पक्षाकडे केवळ पाच सदस्य राहिले आहेत. गोव्यातील जनतेलाही ही घाऊक फोडाफोड रुचलेली नाही; त्यामुळे विरोधकांनी विधानसभेत एकी करून सरकारला नामोहरम करण्याची मोहीम चालविली त्याला चांगलीच प्रसिद्धी लाभते. खंवटे यांना रात्री अटक केल्यानंतर तर विरोधकांनी विधानसभेचे कामकाज चालवू दिले नाही व पहिल्यांदाच अर्थसंकल्पाचे वाचन चालू असताना अध्यक्षांना विरोधकांना सभागृहाबाहेर काढावे लागले.

टीकाकारांचे म्हणणे आहे की आज आमदारांना अटक करणारे सावंत सरकार उद्या त्यांच्या धोरणांवर टीका करणाऱ्या बुद्धिवाद्यांनाही अटक करण्यास कमी करणार नाही. आमदार खंवटे यांना क्षुल्लक कारणावरून अटक करणाऱ्या सावंत सरकारला लोकशाही व विधानसभा अधिवेशनाची प्रतिष्ठा राखता आली नाही. एक विरोधी आमदार तर म्हणाला की या घटनेने सा-या देशात गोव्याची बदनामी झाली. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत- ज्यांनी साऱ्या विरोधी पक्षांशी युती निर्माण केली आहे- यांनीही सरकार कारस्थानी पद्धतीने वागून विरोध संपवू पाहात असल्याचा आरोप केला. प्रगतिशील विचारवंत डॉ. ऑस्कर रिबेलो यांनी हा प्रकार नागरी स्वातंत्र्याची गळचेपी करणारा व त्यासाठी नागरिकांनी जाब विचारणे आवश्यक असल्याचे मत मांडले.एक गोष्ट खरी आहे की गोव्यात भाजपने तोडफोडीचे राजकारण केल्यापासून या सरकारची प्रतिमा बरीच खालावली आहे. त्यामुळे अल्पसंख्य समाजही खवळला आहे. ज्या पद्धतीने राज्यात नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन चालले आहे, त्यातूनही त्याचा अंदाज मिळतो. विरोधकांचा आवाज चिरडून टाकण्याची प्रवृत्ती या सरकारला आणखीनच महागात पडू शकते!   

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवा