शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
3
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
4
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
5
"सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
6
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
7
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
8
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
9
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
10
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
11
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
12
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
13
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
14
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
15
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
16
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
18
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
19
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
20
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन

सावंत सरकारविरोधात जनमत प्रक्षुब्ध का बनले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 20:31 IST

आमदार खंवटे यांना क्षुल्लक कारणावरून अटक करणाऱ्या सावंत सरकारला लोकशाही व विधानसभा अधिवेशनाची प्रतिष्ठा राखता आली नाही.

- राजू नायकज्या पद्धतीने पर्वरीचे आमदार व गोवा विधानसभेतील एक प्रभावी अपक्ष सदस्य रोहन खंवटे यांना विधानसभा चालू असतानाच रात्री अटक करण्यात आली, तो प्रकार आमच्या लोकशाहीला निश्चितच काळीमा फासणारा आहे. महत्त्वाचे म्हणजे विधानसभा आवारात भाजपच्या एका प्रवक्त्याला ‘पाहून घेऊ’ अशी ‘किरकोळ धमकी’ दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यावरून प्रमोद सावंत सरकार विरोधकांच्या टीकेबद्दल अगदीच असहिष्णू झाले असल्याची प्रचीती येतेच, परंतु भाजप सरकारही केंद्रापासून राज्यांपर्यंत यापुढे टीकाकारांना कसे हाताळणार आहे, याचा अंदाज त्यातून मिळतो.

रोहन खंवटे यांच्यावर अनेक आरोप आहेत. त्यांचे उद्योगधंदे व एकूण राजकीय उचापती पत्रकारांच्या टीकेचे कारण झाले आहेत. परंतु हेसुद्धा खरे आहे की ते विधानसभेतील एक प्रभावी आमदार आहेत. प्रमोद सावंत सरकारविरोधात त्यांनी टीकेची धार कायम ठेवली आहे. वास्तविक २०१७ मध्ये मनोहर पर्रीकर यांचे सरकार स्थापन करण्यात खंवटे यांनी मोलाची भूमिका बजावली. काँग्रेसने निवडणुकीत पाठिंबा दिलेला असतानाही, ते अल्पसंख्य भाजपला पाठिंबा द्यायला गेले व पर्रीकरांना दिल्लीहून बोलवून आणून त्यांनी मुख्यमंत्रिपद बहाल केले. त्यात खंवटे हे महसूलमंत्री होते. परंतु सावंत अधिकारावर येताच त्यांनी अपक्ष खंवटे व इतर प्रादेशिक पक्षांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला व काँग्रेस व महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष फोडले. आज सावंत सरकारला पाठिंबा देणा-या सदस्यांची संख्या २७ आहे व काँग्रेस पक्षाकडे केवळ पाच सदस्य राहिले आहेत. गोव्यातील जनतेलाही ही घाऊक फोडाफोड रुचलेली नाही; त्यामुळे विरोधकांनी विधानसभेत एकी करून सरकारला नामोहरम करण्याची मोहीम चालविली त्याला चांगलीच प्रसिद्धी लाभते. खंवटे यांना रात्री अटक केल्यानंतर तर विरोधकांनी विधानसभेचे कामकाज चालवू दिले नाही व पहिल्यांदाच अर्थसंकल्पाचे वाचन चालू असताना अध्यक्षांना विरोधकांना सभागृहाबाहेर काढावे लागले.

टीकाकारांचे म्हणणे आहे की आज आमदारांना अटक करणारे सावंत सरकार उद्या त्यांच्या धोरणांवर टीका करणाऱ्या बुद्धिवाद्यांनाही अटक करण्यास कमी करणार नाही. आमदार खंवटे यांना क्षुल्लक कारणावरून अटक करणाऱ्या सावंत सरकारला लोकशाही व विधानसभा अधिवेशनाची प्रतिष्ठा राखता आली नाही. एक विरोधी आमदार तर म्हणाला की या घटनेने सा-या देशात गोव्याची बदनामी झाली. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत- ज्यांनी साऱ्या विरोधी पक्षांशी युती निर्माण केली आहे- यांनीही सरकार कारस्थानी पद्धतीने वागून विरोध संपवू पाहात असल्याचा आरोप केला. प्रगतिशील विचारवंत डॉ. ऑस्कर रिबेलो यांनी हा प्रकार नागरी स्वातंत्र्याची गळचेपी करणारा व त्यासाठी नागरिकांनी जाब विचारणे आवश्यक असल्याचे मत मांडले.एक गोष्ट खरी आहे की गोव्यात भाजपने तोडफोडीचे राजकारण केल्यापासून या सरकारची प्रतिमा बरीच खालावली आहे. त्यामुळे अल्पसंख्य समाजही खवळला आहे. ज्या पद्धतीने राज्यात नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन चालले आहे, त्यातूनही त्याचा अंदाज मिळतो. विरोधकांचा आवाज चिरडून टाकण्याची प्रवृत्ती या सरकारला आणखीनच महागात पडू शकते!   

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवा