शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

सावंत सरकारविरोधात जनमत प्रक्षुब्ध का बनले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 20:31 IST

आमदार खंवटे यांना क्षुल्लक कारणावरून अटक करणाऱ्या सावंत सरकारला लोकशाही व विधानसभा अधिवेशनाची प्रतिष्ठा राखता आली नाही.

- राजू नायकज्या पद्धतीने पर्वरीचे आमदार व गोवा विधानसभेतील एक प्रभावी अपक्ष सदस्य रोहन खंवटे यांना विधानसभा चालू असतानाच रात्री अटक करण्यात आली, तो प्रकार आमच्या लोकशाहीला निश्चितच काळीमा फासणारा आहे. महत्त्वाचे म्हणजे विधानसभा आवारात भाजपच्या एका प्रवक्त्याला ‘पाहून घेऊ’ अशी ‘किरकोळ धमकी’ दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यावरून प्रमोद सावंत सरकार विरोधकांच्या टीकेबद्दल अगदीच असहिष्णू झाले असल्याची प्रचीती येतेच, परंतु भाजप सरकारही केंद्रापासून राज्यांपर्यंत यापुढे टीकाकारांना कसे हाताळणार आहे, याचा अंदाज त्यातून मिळतो.

रोहन खंवटे यांच्यावर अनेक आरोप आहेत. त्यांचे उद्योगधंदे व एकूण राजकीय उचापती पत्रकारांच्या टीकेचे कारण झाले आहेत. परंतु हेसुद्धा खरे आहे की ते विधानसभेतील एक प्रभावी आमदार आहेत. प्रमोद सावंत सरकारविरोधात त्यांनी टीकेची धार कायम ठेवली आहे. वास्तविक २०१७ मध्ये मनोहर पर्रीकर यांचे सरकार स्थापन करण्यात खंवटे यांनी मोलाची भूमिका बजावली. काँग्रेसने निवडणुकीत पाठिंबा दिलेला असतानाही, ते अल्पसंख्य भाजपला पाठिंबा द्यायला गेले व पर्रीकरांना दिल्लीहून बोलवून आणून त्यांनी मुख्यमंत्रिपद बहाल केले. त्यात खंवटे हे महसूलमंत्री होते. परंतु सावंत अधिकारावर येताच त्यांनी अपक्ष खंवटे व इतर प्रादेशिक पक्षांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला व काँग्रेस व महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष फोडले. आज सावंत सरकारला पाठिंबा देणा-या सदस्यांची संख्या २७ आहे व काँग्रेस पक्षाकडे केवळ पाच सदस्य राहिले आहेत. गोव्यातील जनतेलाही ही घाऊक फोडाफोड रुचलेली नाही; त्यामुळे विरोधकांनी विधानसभेत एकी करून सरकारला नामोहरम करण्याची मोहीम चालविली त्याला चांगलीच प्रसिद्धी लाभते. खंवटे यांना रात्री अटक केल्यानंतर तर विरोधकांनी विधानसभेचे कामकाज चालवू दिले नाही व पहिल्यांदाच अर्थसंकल्पाचे वाचन चालू असताना अध्यक्षांना विरोधकांना सभागृहाबाहेर काढावे लागले.

टीकाकारांचे म्हणणे आहे की आज आमदारांना अटक करणारे सावंत सरकार उद्या त्यांच्या धोरणांवर टीका करणाऱ्या बुद्धिवाद्यांनाही अटक करण्यास कमी करणार नाही. आमदार खंवटे यांना क्षुल्लक कारणावरून अटक करणाऱ्या सावंत सरकारला लोकशाही व विधानसभा अधिवेशनाची प्रतिष्ठा राखता आली नाही. एक विरोधी आमदार तर म्हणाला की या घटनेने सा-या देशात गोव्याची बदनामी झाली. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत- ज्यांनी साऱ्या विरोधी पक्षांशी युती निर्माण केली आहे- यांनीही सरकार कारस्थानी पद्धतीने वागून विरोध संपवू पाहात असल्याचा आरोप केला. प्रगतिशील विचारवंत डॉ. ऑस्कर रिबेलो यांनी हा प्रकार नागरी स्वातंत्र्याची गळचेपी करणारा व त्यासाठी नागरिकांनी जाब विचारणे आवश्यक असल्याचे मत मांडले.एक गोष्ट खरी आहे की गोव्यात भाजपने तोडफोडीचे राजकारण केल्यापासून या सरकारची प्रतिमा बरीच खालावली आहे. त्यामुळे अल्पसंख्य समाजही खवळला आहे. ज्या पद्धतीने राज्यात नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन चालले आहे, त्यातूनही त्याचा अंदाज मिळतो. विरोधकांचा आवाज चिरडून टाकण्याची प्रवृत्ती या सरकारला आणखीनच महागात पडू शकते!   

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवा