शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
4
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
5
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
6
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
7
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
8
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
10
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
11
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
12
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
13
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
14
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
15
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
16
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
17
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
18
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
19
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
20
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला

पुनश्च शनैश्चरशरण

By admin | Updated: April 8, 2016 02:37 IST

अहमदनगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूरच्या प्रार्थनास्थळी असलेल्या शनीच्या चौथऱ्यावर महिलांवर लादली गेलेली बंदी उठविली जावी म्हणून गेल्या प्रजासत्ताकदिनी भूमाता ब्रिगेड नावाच्या

अहमदनगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूरच्या प्रार्थनास्थळी असलेल्या शनीच्या चौथऱ्यावर महिलांवर लादली गेलेली बंदी उठविली जावी म्हणून गेल्या प्रजासत्ताकदिनी भूमाता ब्रिगेड नावाच्या एका महिला संघटनेने केलेला प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडल्यानंतर याच स्तंभातून ‘शनैश्चरशरण देवेन्द्र’ या शीर्षकाखाली एक स्फुट प्रसिद्ध झाले होते. मुख्यमंत्र्यांनी प्रस्तुत प्रकरणात जातीने लक्ष घालण्याची अपेक्षा त्याद्वारे व्यक्त केली होती. या स्फुटावर तत्काळ मुख्यमंत्र्यांच्या जनसंपर्क कक्षाने एक लेखी खुलासा केला. नैतिक वृत्तपत्रीय परंपरांचे पालन करताना त्या खुलाशालाही याच पृष्ठावर स्थान देण्यात आले. कोणत्याही हिन्दू देवालयात स्त्री-पुरुष भेद असता कामा नये या तात्त्विक भूमिकेचा खुलाशातही पुनरुच्चार होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला तंबी देताना राज्यघटनेतील समानतेच्या तत्त्वाची आणि खुद्द राज्य सरकारनेच पारित केलेल्या संबंधित कायद्याची व त्याच्या अंमलबजावणीची आठवण करुन दिली. परिणामी आता तरी मुख्यमंत्री हातात हंटर घेतील असे जनतेला वाटले होते. पण महिलांना तर प्रवेश देणार नाहीच पण आता पुरुषांनाही तो नाकारणार अशी अत्यंत आडमुठी भूमिका शिंगणापूरच्या देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने घेतली. त्यासंबंधी विधिमंडळात उपस्थित प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिले? तर म्हणे, ‘मूर्तीचे म्हणजे तेथील शिळेचे नुकसान होऊ नये म्हणून मंडळाने तो निर्णय घेतला आहे’. नुकसान कशामुळे झाले असते? तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता तर! ही सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकार प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांची की विश्वस्त मंडळाची? मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात दिलेल्या उत्तरात केवळ वास्तवाची सभागृहाला जाण करुन दिली आहे. त्यावरील स्वत:चा अभिप्राय मात्र दिलेला नाही. स्थानिक आणि दूरस्थ जनतेच्या मनाचा ठाव घेतला तर विश्वस्त मंडळाचा हा निर्णय कोणालाही मान्य झालेला नाही. पण सरकारने त्यावर कोणताही अभिप्राय व्यक्त न केल्याने सरकारची या निर्णयास मूक संमती असल्याचा निष्कर्ष कुणी काढला तर तो चुकीचा कसा ठरेल? याचा सरळ अर्थ मग एकच निघतो. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस गेल्या खेपेस केवळ शनैश्चरशरण होते आता मात्र ते विश्वस्त मंडळशरणही झालेले दिसतात!