शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

राज्याचे सुदैव

By admin | Updated: May 26, 2017 01:34 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निलंगा येथे झालेल्या त्यांच्या हेलिकॉप्टरच्या अपघातातून सुखरूप बचावले असल्याच्या वृत्ताने सारा महाराष्ट्र सुखावला आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निलंगा येथे झालेल्या त्यांच्या हेलिकॉप्टरच्या अपघातातून सुखरूप बचावले असल्याच्या वृत्ताने सारा महाराष्ट्र सुखावला आहे. हा अपघात साधा नव्हता. त्यांना घेऊन निघालेले हेलिकॉप्टर ५० फुटांवरून जमिनीवर कोसळले होते व खाली येताना त्याला उच्च दाबाच्या विजेच्या तारांचा स्पर्श झाला होता. त्याचे दोन सुटे भाग जमिनीवरही आले होते. स्वाभाविकच पेट घेण्याच्या वा कोसळून तुटण्याच्या बेतात असलेले ते वाहन सुखरूप जमिनीवर येणे आणि फडणवीसांना त्यांच्यासोबतच्या साऱ्यांसह सुखरूप बाहेर पडता येणे ही राज्यावर झालेली नियतीची कृपाच म्हटली पाहिजे. सारे राज्य सूर्याच्या प्रकोपाने काळवंडत असताना फडणवीस मात्र त्याच्या तालुक्या-तालुक्यात जाऊन तेथील विकासकामांची पाहणी करीत व जनतेच्या तक्रारी समजून घेत आहेत. रत्नागिरीपासून गडचिरोलीपर्यंत आणि नाशिकपासून कोल्हापूर-सोलापूरपर्यंतची त्यांची ही उन्हाळी रपेट साऱ्यांच्या नजरेत भरण्याजोगी आहे. शिवाय ती पाहणाऱ्याच्या मनात त्यांच्याविषयीचा आदर व आत्मीयता वाढविणारीही आहे. आजवर कोणत्याही मुख्यमंत्र्याने राज्याच्या ग्रामीण भागात एवढ्या अल्पकाळात एवढे वास्तव्य केले नसेल आणि त्या क्षेत्रातील कामांचे एवढे सखोल निरीक्षणही केले नसेल. त्यांच्या परिश्रमांना येऊ घातलेले यशही महाराष्ट्राला आता दिसू लागले आहे. दरदिवशी राज्याच्या एका लांबवरच्या भागात जाण्याचा व तेथील लहानसहान कामांचा आढावा घेण्याचा त्यांचा उत्साह व त्याविषयीची त्यांची बांधीलकी मोठी आहे. आपली दैनंदिन जबाबदारी चोखपणे पार पाडून एवढे सारे करीत असलेल्या या तरुण मुख्यमंत्र्याचे साऱ्यांना कौतुकही आहे. त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात होणे व त्याचे स्वरूप गंभीर असणे हे त्याचमुळे साऱ्यांना धक्का देणारे आहे. हवेच्या वेगात त्वरेने झालेल्या बदलामुळे हा अपघात झाला आणि ते हेलिकॉप्टर टिनाचे पत्रे असलेल्या दोन घरांवर कोसळले हे वर्णनही त्याचे तीव्र स्वरूप सांगणारे आहे. अशा अपघातात या देशाने माधवराव शिंदे आणि वायएसआर रेड्डींसारखे महत्त्वाचे नेते याआधी गमावले आहेत. त्याचमुळेच फडणवीसांचे सुखरूप असणे त्यांच्या आप्तांएवढेच साऱ्या महाराष्ट्रालाही सुखावणारे आहे. या युवा नेत्याला त्याचमुळे प्रचंड दीर्घायुरारोग्य लाभावे आणि त्याच्या हातून महाराष्ट्राची आणखी मोठी सेवा घडावी, अशी शुभेच्छाच अशावेळी त्याला द्यायची आहे. त्याचवेळी ज्या हेलिकॉप्टरला हा अपघात झाला ते सरकारी मालकीचे असल्याने त्याची रीतसर चौकशी होणे व यापुढील काळात अशा उड्डाणांबाबत जास्तीची काळजी घेतली जाणेही आवश्यक ठरणार आहे.