शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
2
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
3
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
4
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
5
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
6
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
7
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
8
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
9
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
10
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
11
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
12
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
13
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
14
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
15
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
16
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
17
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
18
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
19
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
20
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका

राज्याचे सुदैव

By admin | Updated: May 26, 2017 01:34 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निलंगा येथे झालेल्या त्यांच्या हेलिकॉप्टरच्या अपघातातून सुखरूप बचावले असल्याच्या वृत्ताने सारा महाराष्ट्र सुखावला आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निलंगा येथे झालेल्या त्यांच्या हेलिकॉप्टरच्या अपघातातून सुखरूप बचावले असल्याच्या वृत्ताने सारा महाराष्ट्र सुखावला आहे. हा अपघात साधा नव्हता. त्यांना घेऊन निघालेले हेलिकॉप्टर ५० फुटांवरून जमिनीवर कोसळले होते व खाली येताना त्याला उच्च दाबाच्या विजेच्या तारांचा स्पर्श झाला होता. त्याचे दोन सुटे भाग जमिनीवरही आले होते. स्वाभाविकच पेट घेण्याच्या वा कोसळून तुटण्याच्या बेतात असलेले ते वाहन सुखरूप जमिनीवर येणे आणि फडणवीसांना त्यांच्यासोबतच्या साऱ्यांसह सुखरूप बाहेर पडता येणे ही राज्यावर झालेली नियतीची कृपाच म्हटली पाहिजे. सारे राज्य सूर्याच्या प्रकोपाने काळवंडत असताना फडणवीस मात्र त्याच्या तालुक्या-तालुक्यात जाऊन तेथील विकासकामांची पाहणी करीत व जनतेच्या तक्रारी समजून घेत आहेत. रत्नागिरीपासून गडचिरोलीपर्यंत आणि नाशिकपासून कोल्हापूर-सोलापूरपर्यंतची त्यांची ही उन्हाळी रपेट साऱ्यांच्या नजरेत भरण्याजोगी आहे. शिवाय ती पाहणाऱ्याच्या मनात त्यांच्याविषयीचा आदर व आत्मीयता वाढविणारीही आहे. आजवर कोणत्याही मुख्यमंत्र्याने राज्याच्या ग्रामीण भागात एवढ्या अल्पकाळात एवढे वास्तव्य केले नसेल आणि त्या क्षेत्रातील कामांचे एवढे सखोल निरीक्षणही केले नसेल. त्यांच्या परिश्रमांना येऊ घातलेले यशही महाराष्ट्राला आता दिसू लागले आहे. दरदिवशी राज्याच्या एका लांबवरच्या भागात जाण्याचा व तेथील लहानसहान कामांचा आढावा घेण्याचा त्यांचा उत्साह व त्याविषयीची त्यांची बांधीलकी मोठी आहे. आपली दैनंदिन जबाबदारी चोखपणे पार पाडून एवढे सारे करीत असलेल्या या तरुण मुख्यमंत्र्याचे साऱ्यांना कौतुकही आहे. त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात होणे व त्याचे स्वरूप गंभीर असणे हे त्याचमुळे साऱ्यांना धक्का देणारे आहे. हवेच्या वेगात त्वरेने झालेल्या बदलामुळे हा अपघात झाला आणि ते हेलिकॉप्टर टिनाचे पत्रे असलेल्या दोन घरांवर कोसळले हे वर्णनही त्याचे तीव्र स्वरूप सांगणारे आहे. अशा अपघातात या देशाने माधवराव शिंदे आणि वायएसआर रेड्डींसारखे महत्त्वाचे नेते याआधी गमावले आहेत. त्याचमुळेच फडणवीसांचे सुखरूप असणे त्यांच्या आप्तांएवढेच साऱ्या महाराष्ट्रालाही सुखावणारे आहे. या युवा नेत्याला त्याचमुळे प्रचंड दीर्घायुरारोग्य लाभावे आणि त्याच्या हातून महाराष्ट्राची आणखी मोठी सेवा घडावी, अशी शुभेच्छाच अशावेळी त्याला द्यायची आहे. त्याचवेळी ज्या हेलिकॉप्टरला हा अपघात झाला ते सरकारी मालकीचे असल्याने त्याची रीतसर चौकशी होणे व यापुढील काळात अशा उड्डाणांबाबत जास्तीची काळजी घेतली जाणेही आवश्यक ठरणार आहे.