शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

नस्ती उठाठेव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:55 IST

लक्षावधी परीक्षार्थींमधून गुणवत्ता सिध्द करून निवडलेल्या उमेदवारांवर, अविश्वास व्यक्त करीत या व्यवस्थेत मूलभूत बदल करण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे.

सरकारी संस्थांच्या सुरळीत चाललेल्या कामकाजाचे उठसूठ रिपॅकेजिंग करण्याची मोदी सरकारला भारी हौस. या हौसेपोटी संघ लोकसेवा आयोगाद्वारे प्रतिवर्षी होणाऱ्या (यूपीएससी) स्पर्धा परीक्षांवर, लक्षावधी परीक्षार्थींमधून गुणवत्ता सिध्द करून निवडलेल्या उमेदवारांवर, अविश्वास व्यक्त करीत या व्यवस्थेत मूलभूत बदल करण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे. विविध सेवांसाठी निवडलेल्या अधिकाºयांची (त्यांना मिळालेल्या रँकनुसार) नियुक्ती न करता, प्रत्येकाची नियुक्ती कोणत्या सेवेत कुठे करायची, कोणाला कोणते कॅडर द्यायचे याचा निर्णय फाऊंडेशन कोर्सद्वारे पुनश्च गुणवत्ता तपासल्यावरच करण्याचे सरकारने ठरवलेले दिसते. अद्याप हा निर्णय झाला नसला तरी पंतप्रधान कार्यालयाकडून आलेल्या या प्रस्तावावर कार्मिक व प्रशिक्षण मंत्रालयाने संबंधित मंत्रालयांचे मत मागवले आहे. या प्रस्तावाचे वर्णन ‘नस्ती उठाठेव’ असेच करावे लागेल. आयएएस, आयपीएस, आयएफएससारख्या प्रथम दर्जाच्या सरकारी सेवांसह भारताच्या २४ प्रकारच्या विविध सेवांसाठी संघ लोकसेवा आयोगाद्वारे प्रतिवर्षी प्रीलिम्स, मेन्स व मुलाखती अशा तीन टप्प्यात परीक्षा घेतल्या जातात. लक्षावधी उमेदवार या परीक्षेला बसतात. हजाराच्या आसपास अधिकाºयांची निवड होते. अत्यंत पारदर्शक परीक्षा असा तिचा लौकिक आहे. या परीक्षांना कोणतेही गालबोट लागल्याचा आजवरचा इतिहास नाही. मग पुन्हा मूल्यमापनाची आवश्यकता काय? दुसºया बाजूला एक तक्रार अशीही आहे की, निवडलेल्या अधिकाºयांना जर त्यांच्या रँकनुसारच सेवा व कॅडरचे वाटप होत असेल, तर त्यानंतरचे प्रशिक्षण केवळ काही महिन्यात उरकायचा उपचार ठरतो. त्यापेक्षा प्रशिक्षण काळात अधिकाºयांच्या कौशल्याचे, कार्यक्षमतेचे व व्यावहारिक ज्ञानाचे मूल्यमापन फाऊंडेशन कोर्सद्वारे केले तर त्यात काय बिघडले? मुद्दा विचार करण्यासारखा असला तरी या प्रक्रियेत गुणवत्ता असलेल्या अधिकाºयांबाबत पक्षपात झाल्यास काय? बदललेल्या व्यवस्थेत यूपीएससी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणाºयालाही आयएएसचे पोस्टिंग व अपेक्षित कॅडर मिळणार नसेल तर प्रस्तुत बदलाविषयी अनेक शंका निर्माण होतात. फाऊंडेशन कोर्सच्या परीक्षेची विश्वासार्हता यूपीएससी इतकीच पारदर्शी असेल याची खात्री काय? ओबीसी, दलित व आदिवासी प्रवर्गातल्या यशस्वी अधिकाºयांना पूर्वीसारखी संधी मिळणेही दुरापास्त होईल. अशा विविध शंका व्यक्त होत असताना या संभाव्य धोक्याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल? अनेक वर्षे देशाचा कारभार चालवलेल्या काँग्रेससह देशातल्या बहुतांश विरोधी पक्षांनी, या नव्या प्रस्तावाला कडाडून विरोध केला आहे. कारण गेल्या चार वर्षात अनेक सरकारी संस्थांखेरीज विविध विद्यापीठे, कला व शिक्षण क्षेत्रातल्या नामवंत संस्था, इत्यादींमधे रा.स्व. संघाला अभिप्रेत विशिष्ट विचारसरणीची, मात्र सुमार गुणवत्तेची माणसे घुसवल्याचा अन् या संस्थांमधे अनावश्यक हस्तक्षेप केल्याचा दुर्लौकिक मोदी सरकारच्या खात्यावर जमा आहे. सत्तेच्या तद्दन दुरुपयोगातून घेतलेल्या अशा निर्णयांमुळे यापैकी कोणत्याही संस्थेची प्रतिष्ठा अथवा गौरव वाढल्याचे ऐकिवात नाही. मग भारताच्या लोकशाही व्यवस्थेचे सारथ्य करणाºया प्रशासकीय सेवांमधे असाच अप्रस्तुत हस्तक्षेप झाला, तर प्रचलित व्यवस्थेलाच तडा जाईल. राजकीय विचारसरणीत भिन्नता असली तरी भारताची लोकशाही मूल्ये, वर्षानुवर्षे जपलेले देशाचे ऐक्य व मजबूत लोकशाही व्यवस्था, साºया जगाने वारंवार वाखाणली आहे. संघ लोकसेवा आयोग ही त्यातलीच मजबूत व विश्वासार्ह व्यवस्था आहे. याद्वारेच अनेक नामवंत अधिकाºयांनी जागतिक बँकेसह, विविध आंतरराष्ट्रीय संस्थांमध्येही उत्तम काम करून भारताची शान वाढवली आहे. अशा विश्वासार्ह व्यवस्थेत हस्तक्षेप करण्याची ‘नस्ती उठाठेव’ न करणेच अधिक श्रेयस्कर ठरेल.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगexamपरीक्षा