शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

प्रियांका चोप्रा म्हणते, जगावरचं संकट गंभीर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 09:45 IST

जागतिक हवामानबदलाचे दृश्य परिणाम आता ठळकपणे दिसू लागले आहेत

“आज जगात ‘विश्वबंधुता’ या मूल्याची जितकी गरज  आहे तेवढी याआधी कधीही नव्हती.” असे विधान प्रियांका चोप्राने २० सप्टेंबर रोजी संयुक्त विश्वसंघाच्या संसदेत केले. प्रियांका चोप्रा गेल्या दहा वर्षांपासून अधिक काळ ‘युनिसेफ’ची सदिच्छादूत म्हणून काम करते. या काळात तिने अनेक सामाजिक संस्थांना भेटी दिल्या आहेत आणि अनेक ठिकाणी ‘युनिसेफ’ची प्रतिनिधी म्हणून भाषणदेखील केलेले आहे. मात्र, तिच्या २० सप्टेंबर रोजी केलेल्या या भाषणाकडे एका वेगळ्या दृष्टीने बघितले जाते आहे. कारण, या भाषणात तिने काही मूलभूत मुद्दे उपस्थित केले आहेत. या भाषणात प्रियांका चोप्रा म्हणाली,  “कोरोनानंतरच्या काळात जगात, माणसांच्या आयुष्यात फार जास्त उलथापालथ झाली आहे. काेरोनाने कित्येक लोकांचे बळी घेतले. त्यांच्या मागे राहिलेल्या कुटुंबीयांना पुढे टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेल्या रोजगाराच्या संधीदेखील या काळात त्यांच्याकडून हिरावल्या गेल्या. सगळ्या जगाची आर्थिक गणिते कोविडने उलटीपालटी करून टाकली; पण जगावरचे संकट काही फक्त तेवढेच नाहीये!’’प्रियांकाने या संकटाची तपशीलवार मांडणीही या व्यासपीठावरून केली.

जागतिक हवामानबदलाचे दृश्य परिणाम आता ठळकपणे दिसू लागले आहेत. बदलता पाऊस, खूप जास्त उन्हाळा किंवा थंडी या सगळ्यातून माणसांच्या आयुष्यावर अनेक नकारात्मक परिणाम होत आहेत. हवामानात होणाऱ्या बदलांमुळे शेती, पशुपालन अशा उद्योगांवर तर परिणाम होतोच आहे; पण अनेक उद्योगांना लागणाऱ्या कच्च्या मालापासून अनेक बाबींवर जागतिक हवामानबदलाचा परिणाम होतो आहे आणि त्यामुळे जगभर लोकांचे रोजगार जात आहेत. रोजगाराच्या शोधात लोकांना स्वतःचे मूळ ठिकाण सोडून स्थलांतर करणे भाग पडतेय. एकीकडे भूकबळी आणि दुसरीकडे उत्पन्नातील रुंदावणारी दरी यामुळे लोकांच्या मनात अशांतता खदखदते आहे.  या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून जगाचा मूळ आधारच डळमळीत झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

 ‘‘आज असलेले जग निर्माण करण्यासाठी अनेक पिढ्यांनी वर्षानुवर्षं कष्ट घेतले आहेत. मात्र, या पार्श्वभूमीवर हे सगळेच ढासळताना दिसते आहे. अर्थात ही सगळी संकटे काही आपोआप आलेली नाहीत. आपल्या सगळ्यांचीच यातील अनेक प्रश्नांकडे केलेली डोळेझाक त्याला काही प्रमाणात कारणीभूत आहे. हवामानबदल हे काही अचानक आलेले संकट नाही. तसेच गरीब आणि श्रीमंत यांच्या उत्पन्नातील दरी हे काही निसर्गनिर्मित संकट नाही. त्यामुळे आपण असं म्हणून शकत नाही की ही संकटे अचानक आली आहेत. ही संकटे निश्चितपणे सोडवता येऊ शकतात. मात्र, त्यासाठी सगळ्या जगाने एकत्र येऊन ठरलेला प्लॅन अमलात आणला पाहिजे. आपल्याकडे तो प्लॅन आहे! 

संयुक्त राष्ट्रसंघाचा सस्टेनेबल गोल्स ( शाश्वत मुल्य) हा तो प्लॅन आहे. जर सगळ्या जगाने या प्लॅनप्रमाणे वागायचं ठरवलं, तर आपण ही आलेली संकटे निश्चितपणे परतवून लावू शकतो” असा आशावादही प्रियांका चोप्राने व्यक्त केला. यापैकी प्रत्येक प्रश्नावर अनेक वेळा वेगवेगळे बोलले गेले आहे. मात्र प्रियांका चोप्राने या सगळ्या संकटांमधील अन्योन्य संबंध उलगडून दाखवल्यामुळे तिच्या या भाषणाची जगभर चर्चा होते आहे. त्याचबरोबर तिच्या या भाषणाच्या संबंधातील एक महत्त्वाचा भाग असा की बहुतेक लोकांची अपेक्षा असते की एखादी महिला, त्यातही एके काळी जगतसुंदरी असलेली महिला, त्यातही व्यावसायिक अभिनेत्री असेल तर ती जेव्हा बोलेल तेव्हा प्रामुख्याने महिलांचे प्रश्न मांडेल किंवा कुठलाही प्रश्न मांडताना महिलांना त्याच्या केंद्रस्थानी ठेवेल. मात्र, प्रियांका चोप्राने तसे केलेले नाही. तिने मांडलेला विषय हा संपूर्ण मानवजातीला संबोधित करणारा आहे. त्याअर्थी तिने अजून एक समजूत खोडून काढली आहे. ख्यातनाम स्त्री जागतिक व्यासपीठावरुन बोलते आहे म्हणजे ती केवळ स्त्रियांचे  प्रश्न मांडणार याही कल्पनेला तिने सुरुंग लावला आहे.

१७ शाश्वत विकास उद्दिष्टेगरिबी नाहीशी करणे, भूक मिटवणे, चांगले आरोग्य, उत्तम शिक्षण, स्त्री- पुरुष समानता, स्वच्छ पाणी व मलनिःस्सारण स्वस्त व स्वच्छ ऊर्जास्रोत, चांगले काम व आर्थिक वाढ, उद्योजकता, संशोधन व पायाभूत विकास, असमानता कमी करणे, शाश्वत शहरे व समाज, जबाबदार उत्पादन व वापर, हवामानबदलावर कृती, पाण्याखालील सृष्टी, जमिनीवरील सृष्टी, शांतता, न्याय व भक्कम यंत्रणा, व्यवस्था आणि ध्येय गाठण्यासाठी भागीदारी.

टॅग्स :Priyanka Chopraप्रियंका चोप्राUnited Statesअमेरिका