शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

खासगीकरणच ‘बेस्ट’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 02:17 IST

अखेर बेस्ट उपक्रम पांगळा झालाच. आता खासगीकरण हा मार्ग या उपक्रमाला जिवंत ठेवण्यासाठी ‘बेस्ट’ ठरतो का? हे येत्या काळातच स्पष्ट होईल. गेल्या काही दशकांत बेस्ट उपक्रमाने ‘स्वस्त आणि सुरक्षित’ प्रवासाने मुंबईकरांमध्ये नावलौकिक प्राप्त केला होता.

अखेर बेस्ट उपक्रम पांगळा झालाच. आता खासगीकरण हा मार्ग या उपक्रमाला जिवंत ठेवण्यासाठी ‘बेस्ट’ ठरतो का? हे येत्या काळातच स्पष्ट होईल. गेल्या काही दशकांत बेस्ट उपक्रमाने ‘स्वस्त आणि सुरक्षित’ प्रवासाने मुंबईकरांमध्ये नावलौकिक प्राप्त केला होता. कालांतराने शेअर रिक्षा व शेअर टॅक्सी, मग मेट्रो-मोनो रेल आणि आता वेब बेस्ड टॅक्सीने बेस्टचा प्रवासी वर्ग पळविला आणि तेथूनच बेस्टचे आर्थिक गणित चुकत गेले ते कायमचेच. बेस्ट बसेसना लागणारे इंधन आणि त्यांच्या देखभालीसाठी होणाºया खर्चावर बेस्ट प्रशासनाचे नियंत्रण राहिले नाही. अशा वेळी उत्पन्नाचे भक्कम नवीन स्रोत विकसित करणे अपेक्षित होते, पण आर्थिक संकटातून बाहेर पडण्याऐवजी हव्या तशा सवलतींची खैरात, फसलेल्या योजना आणि ढिसाळ नियोजनामुळे परिस्थिती बिघडत गेली. ‘ना नफा ना तोटा’ याच तत्त्वावर सार्वजनिक उपक्रम चालविले जात असतात. त्यामुळे बेस्टची तूट भरून निघेल, ही आशाच ठेवणे चुकीचे ठरते, पण डबघाईला आलेला देशातील हा पहिलाच सार्वजनिक उपक्रम नाही. मुंबई महापालिकेने मात्र जबाबदारी नाकारणे आणि राज्य सरकारने झिडकारणे, यामुळे बेस्ट उपक्रम एकाकी-एकटे पडले आहे. असे प्रयोग यापूर्वीच मुंबई महापालिकेने केले असते, तर कदाचित बेस्ट सावरली असती, पण बेस्ट पूर्ण कोलमडेपर्यंत त्यात हस्तक्षेप करणे मुंबई महापालिकेने टाळले. आजच्या घडीलाही महापालिकेकडून बेस्टला मदतीच्या नावाखाली केवळ हुलकावण्याच मिळत आहेत. याउलट स्वतंत्र प्रशासक नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. कोणत्याही आस्थापनेला तंदुरुस्त ठेवण्यासाठी त्याला आर्थिक शिस्त असणे आवश्यक असते. दुर्दैवाने या खासगीकरणाचा जन्मही त्या काटकसरीच्या कृती आराखड्यातून झाला. म्हणजेच खासगीकरणाचा मार्ग बेस्टच्या गळी उतरविण्यात आला आहे. वाहन चालकासह खासगी बस भाड्याने चालविणे, या नव्या अध्यायाला बेस्टमध्ये सुरुवात होत आहे. आज ४५० खासगी बसगाड्या बेस्टचे नाव वापरून रस्त्यावर धावणार आहेत. बस भाड्यात अतिरिक्त वाढ नाही, ‘या बसमध्ये कंडक्टर आपलाच,’ असे आश्वासन देऊनही, खासगीकरणाची मात्र पाठराखण केली जात आहे. मध्यंतरी बेस्टला वाचविण्यासाठी वाहतूक क्षेत्रातील जाणकारांच्या बैठका घेण्यात आल्या, पण अशा वरवरच्या प्रयत्नांव्यतिरिक्त बेस्ट वाचविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होताना दिसून येत नाहीत. त्यामुळे हा प्रयोग बेस्टला तारणार की मुळावर उठणार, हे भविष्यच ठरवेल.

टॅग्स :BESTबेस्ट