शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

दबाव वाढत जाणार

By admin | Updated: May 25, 2016 03:30 IST

तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची सलग दुसऱ्यांदा आणि एकूण सहाव्यांदा शपथ घेतल्यानंतर जयललिता यांनी जे तीन लोकानुनयी निर्णय जाहीर केले ते लक्षात घेता, आता देशभरातील विविध

तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची सलग दुसऱ्यांदा आणि एकूण सहाव्यांदा शपथ घेतल्यानंतर जयललिता यांनी जे तीन लोकानुनयी निर्णय जाहीर केले ते लक्षात घेता, आता देशभरातील विविध राज्य सरकारांवरील आणि विशेषत: महाराष्ट्रातील फडणवीस सरकारवरील दबाब वाढत जाणार यात शंका नाही. निवडून आल्यानंतर जे काही करण्याचे आश्वासन जयललिता यांनी दिले होते ते तत्काळ पूर्ण केले आहे. त्यांनी राज्य पणन महासंघातर्फे चालविली जाणारी दारुची पाचशे दुकाने तत्काळ बंद करण्याचा व उर्वरित दुकानांची विक्रीची वेळ दोन तासांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बिहारसारखे आर्थिकदृष्ट्या कमकुवत राज्य जर संपूर्ण दारुबंदी लागू करु शकते आणि तामिळनाडू व केरळसारखी राज्ये त्याच दिशेने वाटचाल करु शकतात तर मग महाराष्ट्र मागे का असा सवाल आता विचारलाच जाणार आहे. जयललिता यांनी अंशत: दारुबंदी लागू करतानाच घरगुती वीज वापर ग्राहकांना शंभर युनिटपर्यंतीच वीज मोफत देण्याचाही निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र वीज वितरण कंपनी वर्षाचे बाराही महिने वीजदर वाढवून मिळावा म्हणून नियामक समितीकडे धाव घेत असते. त्या पार्श्वभूमीवीर तामिळनाडूचा हा निर्णय वेगळेच काही सांगून जातो. पण महाराष्ट्र सरकारवरील दबाव मोठ्या प्रमाणावर वाढत जाईल तो जयललिता यांच्या तिसऱ्या निर्णयामुळे. त्यांनी मार्च २०१६अखेर शेतकऱ्यांनी सहकारी बँकांकरवी घेतलेली सर्व प्रकारची कर्जे लेखणीच्या एका फटकाऱ्यानिशी माफ करुन टाकली आहेत. असा धाडसी निर्णय महाराष्ट्रात कोणे एकेकाळी शरद पवारांनी घेतला होता व त्यांच्या अर्ध्या पावलावर चालताना अंतुले यांनी कर्जावरील व्याज माफ केले होते. जयललिता यांच्या कर्जमाफीच्या निर्णयाची महाराष्ट्रात मोठया प्रमाणावर प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. खुद्द शरद पवार यांनी या संदर्भात राज्य सरकारला निर्वाणीचा इशाराही देऊन ठेवला आहे. शेतकऱ्यांची कर्जे माफ केली तर त्याचा लाभ शेतकऱ्यांना नव्हे तर संबंधित बँकांनाच काय तो होईल हा महाराष्ट्र सरकारचा दावादेखील जयललिता यांनी एकप्रकारे निरंक ठरविला आहे.