शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

दबाव वाढत जाणार

By admin | Updated: May 25, 2016 03:30 IST

तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची सलग दुसऱ्यांदा आणि एकूण सहाव्यांदा शपथ घेतल्यानंतर जयललिता यांनी जे तीन लोकानुनयी निर्णय जाहीर केले ते लक्षात घेता, आता देशभरातील विविध

तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची सलग दुसऱ्यांदा आणि एकूण सहाव्यांदा शपथ घेतल्यानंतर जयललिता यांनी जे तीन लोकानुनयी निर्णय जाहीर केले ते लक्षात घेता, आता देशभरातील विविध राज्य सरकारांवरील आणि विशेषत: महाराष्ट्रातील फडणवीस सरकारवरील दबाब वाढत जाणार यात शंका नाही. निवडून आल्यानंतर जे काही करण्याचे आश्वासन जयललिता यांनी दिले होते ते तत्काळ पूर्ण केले आहे. त्यांनी राज्य पणन महासंघातर्फे चालविली जाणारी दारुची पाचशे दुकाने तत्काळ बंद करण्याचा व उर्वरित दुकानांची विक्रीची वेळ दोन तासांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बिहारसारखे आर्थिकदृष्ट्या कमकुवत राज्य जर संपूर्ण दारुबंदी लागू करु शकते आणि तामिळनाडू व केरळसारखी राज्ये त्याच दिशेने वाटचाल करु शकतात तर मग महाराष्ट्र मागे का असा सवाल आता विचारलाच जाणार आहे. जयललिता यांनी अंशत: दारुबंदी लागू करतानाच घरगुती वीज वापर ग्राहकांना शंभर युनिटपर्यंतीच वीज मोफत देण्याचाही निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र वीज वितरण कंपनी वर्षाचे बाराही महिने वीजदर वाढवून मिळावा म्हणून नियामक समितीकडे धाव घेत असते. त्या पार्श्वभूमीवीर तामिळनाडूचा हा निर्णय वेगळेच काही सांगून जातो. पण महाराष्ट्र सरकारवरील दबाव मोठ्या प्रमाणावर वाढत जाईल तो जयललिता यांच्या तिसऱ्या निर्णयामुळे. त्यांनी मार्च २०१६अखेर शेतकऱ्यांनी सहकारी बँकांकरवी घेतलेली सर्व प्रकारची कर्जे लेखणीच्या एका फटकाऱ्यानिशी माफ करुन टाकली आहेत. असा धाडसी निर्णय महाराष्ट्रात कोणे एकेकाळी शरद पवारांनी घेतला होता व त्यांच्या अर्ध्या पावलावर चालताना अंतुले यांनी कर्जावरील व्याज माफ केले होते. जयललिता यांच्या कर्जमाफीच्या निर्णयाची महाराष्ट्रात मोठया प्रमाणावर प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. खुद्द शरद पवार यांनी या संदर्भात राज्य सरकारला निर्वाणीचा इशाराही देऊन ठेवला आहे. शेतकऱ्यांची कर्जे माफ केली तर त्याचा लाभ शेतकऱ्यांना नव्हे तर संबंधित बँकांनाच काय तो होईल हा महाराष्ट्र सरकारचा दावादेखील जयललिता यांनी एकप्रकारे निरंक ठरविला आहे.