शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
3
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
4
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
5
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
6
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
7
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
8
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
9
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
10
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
11
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
12
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
13
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
14
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
15
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
16
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
17
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
18
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
19
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान

दबाव वाढत जाणार

By admin | Updated: May 25, 2016 03:30 IST

तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची सलग दुसऱ्यांदा आणि एकूण सहाव्यांदा शपथ घेतल्यानंतर जयललिता यांनी जे तीन लोकानुनयी निर्णय जाहीर केले ते लक्षात घेता, आता देशभरातील विविध

तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची सलग दुसऱ्यांदा आणि एकूण सहाव्यांदा शपथ घेतल्यानंतर जयललिता यांनी जे तीन लोकानुनयी निर्णय जाहीर केले ते लक्षात घेता, आता देशभरातील विविध राज्य सरकारांवरील आणि विशेषत: महाराष्ट्रातील फडणवीस सरकारवरील दबाब वाढत जाणार यात शंका नाही. निवडून आल्यानंतर जे काही करण्याचे आश्वासन जयललिता यांनी दिले होते ते तत्काळ पूर्ण केले आहे. त्यांनी राज्य पणन महासंघातर्फे चालविली जाणारी दारुची पाचशे दुकाने तत्काळ बंद करण्याचा व उर्वरित दुकानांची विक्रीची वेळ दोन तासांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बिहारसारखे आर्थिकदृष्ट्या कमकुवत राज्य जर संपूर्ण दारुबंदी लागू करु शकते आणि तामिळनाडू व केरळसारखी राज्ये त्याच दिशेने वाटचाल करु शकतात तर मग महाराष्ट्र मागे का असा सवाल आता विचारलाच जाणार आहे. जयललिता यांनी अंशत: दारुबंदी लागू करतानाच घरगुती वीज वापर ग्राहकांना शंभर युनिटपर्यंतीच वीज मोफत देण्याचाही निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र वीज वितरण कंपनी वर्षाचे बाराही महिने वीजदर वाढवून मिळावा म्हणून नियामक समितीकडे धाव घेत असते. त्या पार्श्वभूमीवीर तामिळनाडूचा हा निर्णय वेगळेच काही सांगून जातो. पण महाराष्ट्र सरकारवरील दबाव मोठ्या प्रमाणावर वाढत जाईल तो जयललिता यांच्या तिसऱ्या निर्णयामुळे. त्यांनी मार्च २०१६अखेर शेतकऱ्यांनी सहकारी बँकांकरवी घेतलेली सर्व प्रकारची कर्जे लेखणीच्या एका फटकाऱ्यानिशी माफ करुन टाकली आहेत. असा धाडसी निर्णय महाराष्ट्रात कोणे एकेकाळी शरद पवारांनी घेतला होता व त्यांच्या अर्ध्या पावलावर चालताना अंतुले यांनी कर्जावरील व्याज माफ केले होते. जयललिता यांच्या कर्जमाफीच्या निर्णयाची महाराष्ट्रात मोठया प्रमाणावर प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. खुद्द शरद पवार यांनी या संदर्भात राज्य सरकारला निर्वाणीचा इशाराही देऊन ठेवला आहे. शेतकऱ्यांची कर्जे माफ केली तर त्याचा लाभ शेतकऱ्यांना नव्हे तर संबंधित बँकांनाच काय तो होईल हा महाराष्ट्र सरकारचा दावादेखील जयललिता यांनी एकप्रकारे निरंक ठरविला आहे.